शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

विखे-थोरातांनी इतर कारखान्यांचा ऊस पळवू नये; माजी आमदारांचे आवाहन

By शिवाजी पवार | Updated: August 8, 2023 16:17 IST

भानुदास मुरकुटे : आजी-माजी पालकमंत्र्यांनी सर्व कारखानदारांचे पालकत्व करावे

शिवाजी पवार

श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : संगमनेर व प्रवरा सहकारी साखर कारखान्यांनी जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणीची घुसखोरी करू नये, असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले आहे. संगमनेर साखर कारखाना हा गणेश कारखान्याचा ऊस नेणार नाही तसेच गणेश कारखान्याची काळजी असेल तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही 'गणेश' चा ऊस नेऊ नये, असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. या सूचनेबद्दल मुरकुटे यांनी थोरात यांचे कौतुक केले आहे. गणेशसह, अशोक, अगस्ती व अन्य कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमण न करण्याचा निर्णय थोरात यांनी घ्यावा, असे मुरकुटे यांनी सुचविले आहे.      

मुरकुटे म्हणाले, थोरात हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे हे पालकमंत्री आहेत. या नात्याने दोघांनीही जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना समान न्याय देऊन पालकत्व करायला हवे. कोणत्याही कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर अतिक्रमण करू नये. आमदार थोरात यांनी त्यांच्या  विधानात संगमनेर, संजीवनी कारखाना 'गणेश' चा ऊस नेणार नाहीत, तसेच प्रवरा कारखान्याने 'गणेश' चा ऊस नेऊ नये, असे म्हटले आहे. यावरून संगमनेर व प्रवरा दोन्हीही कारखाने गणेश कारखान्याचा ऊस नेत होते आणि त्यामुळे गणेश अडचणीत आला हे सिद्ध होते, असा आरोप मुरकुटे यांनी केला.             

संगमनेर व प्रवरा कारखाने हे स्वतःच्या कार्यक्षेत्रातील  ऊस तसाच ठेवून गणेश, अशोक, अगस्ती यासह अन्य कारखान्यांनी मेहनतीने आपापल्या क्षेत्रात वाढ केलेल्या उसावर डल्ला मारतात. बाहेरचा ऊस आधी तोडतात आणि कार्यक्षेत्रातील ऊस नंतर तोडतात. उशिरा ऊस तोडल्याने त्याच्या खोडक्या  होऊन उत्पादन घटते. त्यामुळे प्रवरा व संगमनेर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी ऊस लागवड करत नाहीत. विखे-थोरातांच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र वाढत नाही आणि कार्यक्षेत्राबाहेरील उसावर अवलंबून राहावे लागते. ऊस पळविल्याने कारखाने आजारी पडतात. संगमनेर व प्रवरा कारखाना एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील ऊस मात्र तोडत नाही. या दोघांची मिलीभगत आहे, अशी टीका मुरकुटे यांनी केली आहे.           

कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस नसताना संगमनेर व प्रवरेने गाळप क्षमता वाढविली. आपले पोट भरण्यासाठी दुसऱ्यांना उपाशी ठेवणे उचित नाही. दोन्ही कारखान्यांनी उसाबाबत स्वावलंबी व्हावे. अन्य कोणत्याही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करु नये. तशी सद्बुद्धी साईबाबांनी दोघांनाही द्यावी, टिप्पणी मुरकुटे यांनी केली आहे.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखाने