शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विखे-थोरातांनी इतर कारखान्यांचा ऊस पळवू नये; माजी आमदारांचे आवाहन

By शिवाजी पवार | Updated: August 8, 2023 16:17 IST

भानुदास मुरकुटे : आजी-माजी पालकमंत्र्यांनी सर्व कारखानदारांचे पालकत्व करावे

शिवाजी पवार

श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : संगमनेर व प्रवरा सहकारी साखर कारखान्यांनी जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणीची घुसखोरी करू नये, असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले आहे. संगमनेर साखर कारखाना हा गणेश कारखान्याचा ऊस नेणार नाही तसेच गणेश कारखान्याची काळजी असेल तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही 'गणेश' चा ऊस नेऊ नये, असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. या सूचनेबद्दल मुरकुटे यांनी थोरात यांचे कौतुक केले आहे. गणेशसह, अशोक, अगस्ती व अन्य कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमण न करण्याचा निर्णय थोरात यांनी घ्यावा, असे मुरकुटे यांनी सुचविले आहे.      

मुरकुटे म्हणाले, थोरात हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे हे पालकमंत्री आहेत. या नात्याने दोघांनीही जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना समान न्याय देऊन पालकत्व करायला हवे. कोणत्याही कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर अतिक्रमण करू नये. आमदार थोरात यांनी त्यांच्या  विधानात संगमनेर, संजीवनी कारखाना 'गणेश' चा ऊस नेणार नाहीत, तसेच प्रवरा कारखान्याने 'गणेश' चा ऊस नेऊ नये, असे म्हटले आहे. यावरून संगमनेर व प्रवरा दोन्हीही कारखाने गणेश कारखान्याचा ऊस नेत होते आणि त्यामुळे गणेश अडचणीत आला हे सिद्ध होते, असा आरोप मुरकुटे यांनी केला.             

संगमनेर व प्रवरा कारखाने हे स्वतःच्या कार्यक्षेत्रातील  ऊस तसाच ठेवून गणेश, अशोक, अगस्ती यासह अन्य कारखान्यांनी मेहनतीने आपापल्या क्षेत्रात वाढ केलेल्या उसावर डल्ला मारतात. बाहेरचा ऊस आधी तोडतात आणि कार्यक्षेत्रातील ऊस नंतर तोडतात. उशिरा ऊस तोडल्याने त्याच्या खोडक्या  होऊन उत्पादन घटते. त्यामुळे प्रवरा व संगमनेर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी ऊस लागवड करत नाहीत. विखे-थोरातांच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र वाढत नाही आणि कार्यक्षेत्राबाहेरील उसावर अवलंबून राहावे लागते. ऊस पळविल्याने कारखाने आजारी पडतात. संगमनेर व प्रवरा कारखाना एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील ऊस मात्र तोडत नाही. या दोघांची मिलीभगत आहे, अशी टीका मुरकुटे यांनी केली आहे.           

कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस नसताना संगमनेर व प्रवरेने गाळप क्षमता वाढविली. आपले पोट भरण्यासाठी दुसऱ्यांना उपाशी ठेवणे उचित नाही. दोन्ही कारखान्यांनी उसाबाबत स्वावलंबी व्हावे. अन्य कोणत्याही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करु नये. तशी सद्बुद्धी साईबाबांनी दोघांनाही द्यावी, टिप्पणी मुरकुटे यांनी केली आहे.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखाने