शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

विखे-थोरातांनी इतर कारखान्यांचा ऊस पळवू नये; माजी आमदारांचे आवाहन

By शिवाजी पवार | Updated: August 8, 2023 16:17 IST

भानुदास मुरकुटे : आजी-माजी पालकमंत्र्यांनी सर्व कारखानदारांचे पालकत्व करावे

शिवाजी पवार

श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : संगमनेर व प्रवरा सहकारी साखर कारखान्यांनी जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणीची घुसखोरी करू नये, असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले आहे. संगमनेर साखर कारखाना हा गणेश कारखान्याचा ऊस नेणार नाही तसेच गणेश कारखान्याची काळजी असेल तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही 'गणेश' चा ऊस नेऊ नये, असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. या सूचनेबद्दल मुरकुटे यांनी थोरात यांचे कौतुक केले आहे. गणेशसह, अशोक, अगस्ती व अन्य कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमण न करण्याचा निर्णय थोरात यांनी घ्यावा, असे मुरकुटे यांनी सुचविले आहे.      

मुरकुटे म्हणाले, थोरात हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे हे पालकमंत्री आहेत. या नात्याने दोघांनीही जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना समान न्याय देऊन पालकत्व करायला हवे. कोणत्याही कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर अतिक्रमण करू नये. आमदार थोरात यांनी त्यांच्या  विधानात संगमनेर, संजीवनी कारखाना 'गणेश' चा ऊस नेणार नाहीत, तसेच प्रवरा कारखान्याने 'गणेश' चा ऊस नेऊ नये, असे म्हटले आहे. यावरून संगमनेर व प्रवरा दोन्हीही कारखाने गणेश कारखान्याचा ऊस नेत होते आणि त्यामुळे गणेश अडचणीत आला हे सिद्ध होते, असा आरोप मुरकुटे यांनी केला.             

संगमनेर व प्रवरा कारखाने हे स्वतःच्या कार्यक्षेत्रातील  ऊस तसाच ठेवून गणेश, अशोक, अगस्ती यासह अन्य कारखान्यांनी मेहनतीने आपापल्या क्षेत्रात वाढ केलेल्या उसावर डल्ला मारतात. बाहेरचा ऊस आधी तोडतात आणि कार्यक्षेत्रातील ऊस नंतर तोडतात. उशिरा ऊस तोडल्याने त्याच्या खोडक्या  होऊन उत्पादन घटते. त्यामुळे प्रवरा व संगमनेर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी ऊस लागवड करत नाहीत. विखे-थोरातांच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र वाढत नाही आणि कार्यक्षेत्राबाहेरील उसावर अवलंबून राहावे लागते. ऊस पळविल्याने कारखाने आजारी पडतात. संगमनेर व प्रवरा कारखाना एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील ऊस मात्र तोडत नाही. या दोघांची मिलीभगत आहे, अशी टीका मुरकुटे यांनी केली आहे.           

कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस नसताना संगमनेर व प्रवरेने गाळप क्षमता वाढविली. आपले पोट भरण्यासाठी दुसऱ्यांना उपाशी ठेवणे उचित नाही. दोन्ही कारखान्यांनी उसाबाबत स्वावलंबी व्हावे. अन्य कोणत्याही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करु नये. तशी सद्बुद्धी साईबाबांनी दोघांनाही द्यावी, टिप्पणी मुरकुटे यांनी केली आहे.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखाने