शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

नगर जिल्ह्यासाठी वाढीव ५०० पोलिसांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:20 IST

नगर जिल्ह्याची ५० लाखांच्या पुढे लोकसंख्या आहे. त्या तुलनेत जिल्ह्यात सध्या अवघे तीन हजार पोलीस बळ कार्यरत आहे. राज्य ...

नगर जिल्ह्याची ५० लाखांच्या पुढे लोकसंख्या आहे. त्या तुलनेत जिल्ह्यात सध्या अवघे तीन हजार पोलीस बळ कार्यरत आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालानुसार २०२० या वर्षांत गुन्हेगारीत नगर जिल्हा महाराष्ट्रात प्रथम स्थानी आहे. सर्व प्रकारचे गुन्हे नगर जिल्ह्यातच सर्वाधिक प्रमाणात घडत असल्याचे या अहवालात नमूद आहे. वाढती गुन्हेगारी रोखने, गुन्ह्यांचा तपास, व्हीआयपी बंदोबस्त, सन, उत्सव काळातील बंदोबस्त, तसेच गेल्या वर्षभरापासून कोरोना संदर्भात लागू करण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावणी आदी कामांचा पोलिसांवर मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत नगरसाठी वाढीव पोलीस द्यावेत, अशी मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे. वाढीव मनुष्यबळासह प्रस्तावित पोलीस ठाण्यांसाठीही शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

-------------------------

३८ हजार ८१६ गुन्ह्यांची नोंद

मागील वर्षात जिल्ह्यात आयपीसी कलमांतर्गत तब्बल ३८ हजार ८१६ गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये खून, दरोडा, चोऱ्या, जबरी चोऱ्या, हुंडाबळी अत्याचार आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच शरीराविरुद्धच्या गुन्ह्यातही नगर जिल्हा इतर जिल्ह्याच्या तुलनेत पुढे असल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालात नमूद आहे.

----------------------------------

नगर जिल्हा हा विस्ताराने मोठा व मध्यवर्ती आहे. नगरला सात जिल्ह्याच्या सीमा जोडलेल्या आहेत त्यामुळे येथील गुन्हेगार जसे बाहेर जाऊन गुन्हे करतात तसेच बाहेरील गुन्हेगारही नगरमध्ये येऊन गुन्हे करतात. अशा परिस्थितीत आहे त्या मनुष्यबळाचा योग्य वापर करून गुन्हे उघडकीस आणले जात आहेत. वाढीव ५०० पोलीस बळ मिळावे यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून प्रस्तावित पोलीस ठाणे कार्यरत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, अहमदनगर