शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
3
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
4
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
5
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
6
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
7
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
8
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
9
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
10
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
11
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
12
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
13
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
14
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
15
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
16
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
17
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
18
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
19
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
20
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

वीज पुरवठा ८ तास, बिल आकारणी मात्र २४ तासांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:26 IST

शिवाजी पवार श्रीरामपूर : महावितरण कंपनीने शेतकऱ्यांकडील कृषी पंपाच्या थकबाकी वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याच्या सुरू केलेल्या मोहिमेला आता ...

शिवाजी पवार

श्रीरामपूर : महावितरण कंपनीने शेतकऱ्यांकडील कृषी पंपाच्या थकबाकी वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याच्या सुरू केलेल्या मोहिमेला आता विरोध होऊ लागला आहे. कायद्यानुसार पंधरा दिवसांची पूर्वसूचना न देता अचानकपणे रोहित्र बंद करण्याचा अधिकार महावितरण कंपनीला कोणी दिला? तसेच केवळ आठ तास वीजपुरवठा करून २४ तासांची बिल आकारणी करता येते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कृषी पंपांची वीजबिल वसुलीवरून शेतकरी विरूद्ध महावितरण असा संघर्ष उभा राहिला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वीज रोहित्र बंद करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे ऐन हातातोंडाशी आलेली पिके संकटात सापडली आहेत. शेतकरी संघटना या कारवाईविरोधात गावोगाव बैठका घेत असून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत आहेत.

---------

कृषी पंपांच्या वीज बिलांचे सूत्र

शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २००५ मध्ये एक सूत्र ठरविले होते. त्यानुसार कृषी पंपांच्या एकूण वीजबिल आकारणीच्या दोन तृतीयांश रक्कम ही राज्य सरकार महावितरण कंपनीला अनुदान स्वरुपात देते. एक तृतीयांश रक्कम ही शेतकऱ्यांनी भरावयाची असते. याचाच अर्थ एका अश्वशक्तीला २८५० रुपये (त्यावेळचे प्रचलित दर) आकारणीतील १८८० रुपये हे सरकार महावितरणला अनुदान स्वरुपात देणार तर उर्वरित ९४० रुपये शेतकरी बिलापोटी भरणार असे हे सूत्र सांगते. मात्र कृषी पंपांना २४ तास वीजपुरवठा केला जावा, असे गृहितक धरण्यात आले आहे. प्रत्यक्षात आता केवळ ८ तास वीज पुरविली जात आहे. त्यामुळे शेतकरी महावितरण कंपनीला देणे लागत नाही. १६ तासांच्या वीजपुरवठ्याचे पैसे सरकारकडून महावितरण कंपनीला मिळाले आहेत, असे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

-------------

१५ दिवसांची नोटीसही नाही

महावितरण कंपनीला कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी ५६ (१) प्रमाणे पंधरा दिवसांची नोटीस द्यावी लागते. मात्र नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना अशा नोटिसा न देताच पुरवठा खंडित करून शॉक देण्यात आला.

----------

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा अधिकार

वीज रोहित्र ४८ तास बंद राहिल्यास शेतकऱ्यांना ५० रुपये प्रती तास याप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार आहे. त्यामुळे महावितरणने सुरू केलेल्या या कारवाई विरोधात नुकसान भरपाईची मागणी करणार असल्याचे संघटनेचे पश्चिम विभागप्रमुख बाळासाहेब पटारे यांनी सांगितले.

----------