शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

काँग्रेस, भाजपमधील फरक जनतेला कामातून कळावा - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 05:22 IST

शिर्डीत पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनात मंत्री गडकरी रविवारी बोलत होते.

शिर्डी : भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत यशाचे सुवर्ण शिखर गाठले. मात्र, विजयाचे रूपांतर सुराज्यामध्ये करण्याची आता जबाबदारी आहे. काँग्रेसचे सरकार जाऊन भाजपचे आले, यातील फरक जनतेला सांगता आला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. केवळ निवडणुकीतील यशाने मोठेपण येत नाही, अशीही सूचना त्यांनी केली.

शिर्डीत पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनात मंत्री गडकरी रविवारी बोलत होते. गडकरी म्हणाले, निवडणुकांमध्ये नेते आमदार, खासदार होतात. मात्र, सर्वच आठवणीत राहत नाहीत. गुणांनी माणूस मोठा होतो. लोकांचे जीवन सुसह्य करणारे नेते हेच आठवणीत राहतात. भाजपच्या सत्तेत येण्याने काय झाले हे कामातून दाखवावे लागेल. जातीयता, सांप्रदायिकता नष्ट करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेने शिवशाही स्थापन करण्यासाठी संधी दिली आहे. भविष्याचा महाराष्ट्र निर्माण करावयाचा आहे. ग्रामीण भागातून तरुणांचे मोठ्या प्रमाणावर शहरात विस्थापन होत आहे. 

ऑटोमोबाइलमध्ये महाराष्ट्राची भरारीऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने मोठी भरारी घेतली आहे. हे क्षेत्र देशाला सर्वाधिक कर मिळवून देते. ऑटोमोबाइलमध्ये राज्याला जगात प्रथम क्रमांकावर येण्याची क्षमता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये २२ हजार कोटी रुपयांची टोयोटा कंपनी गुंतवणूक करत आहे, अशी माहितीही मंत्री गडकरी यांनी दिली.

खेडी ओस पडू देऊ नका खेडी ओस पडत आहेत. ते थांबवावे लागेल. प्रत्येक तालुका, गाव हे स्मार्ट झाले तरच विस्थापन रोखता येऊ शकते. गडचिरोली जिल्ह्यात भाजपने विकासाचे मॉडेल राबविले आहे.तो जिल्हा येत्या पाच वर्षांत सर्वाधिक महसुली उत्पन्न मिळवून देणारा ठरेल, असेही गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाshirdiशिर्डी