शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

"अजित दादांनी केलेली गद्दारी लोकांना पटलेली नाही, लोकं योग्यवेळी हिशोब घेतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 22:56 IST

अनिल देशमुख यांनी त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून अन्याय झाल्याचे म्हटले.

शिर्डी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी येथे "ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची" अंतर्गत पक्षाच्या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात शरद पवारांसह पक्षातील सर्वच प्रमुख नेत्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मात्र, या शिबिरातील पहिला दिवस गाजला तो राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याने. आव्हाड यांनी राम हा मांसाहारी होती, तो बहुजनांचा होता, असे विधान केल होते. मात्र, हे आव्हाड यांचे व्यक्तिगत मत असून पक्षाचे विधान नसल्याचे स्पष्टीकरण माजी मंत्री व आमदारअनिल देशमुख यांनी दिले. त्यानंतर, येथील मेळाव्यात बोलताना देशमुख यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला.

अनिल देशमुख यांनी त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून अन्याय झाल्याचे म्हटले. तसेच, खोट्या प्रकरणातून मला १४ महिने तुरुंगात डांबले. अखेर कुठलाही पुरावा न सापडल्याने जामीनावर माझी सुटका झाल्याचं त्यांनी सांगितलं. तर, राष्ट्रवादीतील फुटीवर भाष्य करताना मोदींसह अजित पवारांनाही लक्ष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक स्टेटमेंट दिलं की, शरद पवार सहाब ने क्या किया? पण पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एका मुलाखतीत साहेबांच्या कामांचे कौतुक केले होते व त्यांना शेतकऱ्यांच्या मसीहा असे म्हटले होते, असे म्हणत मोदींनी केलेल्या आरोपावरुन अनिल देशमुख यांनी भूमिका मांडली. त्यानंतर, अजित पवारांच्या बंडावरही त्यांनी भाष्य केलं. 

अजित दादांनी केलेली गद्दारी ही लोकांना पटलेली नाही, लोक त्याचा योग्य वेळी हिशोब घेतील. पुढील काळामध्ये आपल्याला सत्ताधाऱ्यांचे खोटी आश्वासने लोकांपुढे आणणे गरजेचे आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही, व त्यासाठी आपल्याला एकत्रित मिळून काम करणे अत्यंत गरजेचे आहे, असे म्हणत त्यांनी एक शायरीतील शेअरही म्हटलं. कुछ ही देर की खामोशी है, फिर शोर आयेगा; अरे आपका तो वक्त है, हमारा दौर आयेगा..!, असे अनिल देशमुख यांनी म्हटलं.

शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयारी नाही

गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचे राजकारण चालू आहे व ते महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. शेतकरी अडचणीत असताना सुद्धा हे सरकार त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक, कांदा उत्पादक, संत्रा उत्पादक शेतकरी आज प्रचंड अडचणीत आहे पण या झोपलेल्या सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही. विजेचा, पिक विम्याचा प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये आहे पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही, असेही देशमुख यांनी म्हटले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAnil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार