शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

काँग्रेस-राष्ट्रवादी लोकांचा विचार करणारे पक्ष, त्यांच्यासोबत काम करणं सोपं; आदित्य ठाकरेंचे 'महासंकेत' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 15:03 IST

'आम्ही कुठल्याही युतीत असलो तरी खरे फॅमिली फ्रेंड आहोत'

अहमदनगर : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन टोकाचे पक्ष म्हटले जातात. पण वेगवेगळ्या विचारधारा एकत्र येऊन काम करतात, तीच खरी लोकशाही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकांचा विचार करणारे पक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे सोपे आहे, असे सांगत शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी आगामी  मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. 

संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा-२०२० युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात राज्यातल्या तरुण आमदारांसोबत सुसंवाद साधण्यात आला. या कार्यक्रमात मंत्री आदित्य ठाकरे, रोहित पवार, आदिती तटकरे, ऋतुराज पाटील, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे यांना आगामी निवडणुकांचे संकेत देत मित्रपक्षांशी अशीच दोस्ती कायम असणार का? असा सवाल केला. 

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, "आम्ही युतीत असलो तरी खरे फॅमिली फ्रेंड आहोत. मित्र काँग्रेस-राष्ट्रवादीत होते. विलासराव देशमुखांनी कधीही 'ग्रेस' सोडली नाही. आम्ही विरोधात असतानाही त्यांच्यासोबतच आहोत, असे वाटायचे. याशिवाय शरद पवार साहेब आणि माझे आजोबा (बाळासाहेब ठाकरे) यांची मैत्री जगजाहीर आहे. या मैत्रीत वेगळच प्रेम होते. आता आमचेही वेगळे नाते निर्माण झाले आहे."  

(...तर जगातील कोणतीच ताकद हरवू शकत नाही; शरद पवारांनी रोहितला दिला होता सल्ला)

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन टोकाचे पक्ष म्हटले जातात. पण वेगवेगळ्या विचारधारा एकत्र येऊन काम करतात, तीच खरी लोकशाही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकांचा विचार करणारे पक्ष आहेत. महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी मैत्री, नाती एकत्र आली आहेत. महाराष्ट्रानंतर झारखंडमध्येही बदल घडला आहे. देशाचे चित्र बदलायला लागले आहे. भविष्यात आणखीच बदल घडेल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. त्यावरून असे लक्षात येते की,  राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांपाठोपाठ आगामी मुंबईसह इतर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे.  याचबरोबर गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली होती. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मी राहुल गांधींना भेटलो, त्यांच्याशी बोललो. विचार वेगळे असतील. मात्र विकास हे ध्येय समान आहे. 

('मला आदित्यच म्हणत जा, साहेब वगैरे म्हणू नका!')

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनाही आगामी निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याचे संकेत दिले आहे. जे समीकरण आत्ता झाले आहे, ते एका विचाराचे आहे. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे आणि विलासराव देशमुख यांच्या मनात कदाचित हे समीकरण असेल. पण, त्यांच्यापैकी कोणी बोलले नसावे. मात्र, ज्या गोष्टी त्यांचा मनात होत्या, त्या तीन महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेऊन केल्या, असे रोहित पवार म्हणाले. याशिवाय, लोकांची सत्ता आहे. तिन्ही पक्षांची मनं एकत्र आली आहेत. पुढच्या काळातील निवडणुका म्हणजे सर्वसामान्यांना योग्य असे समीकरण असेल. अहंकारी विचाराला आम्ही सगळ्यांनी मिळून पाडले. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी असे समीकरण जुळू शकते, असे रोहित पवार यांनी सांगितले. 

आणखी बातम्या..

संजय राऊतांच्या निषेधार्थ संभाजी भिडेंकडून आज 'सांगली बंद'चे आवाहन

गुजरातवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी प्रवासी लक्झरी बसला आग, चालक अन् प्रवासी सुखरूप

मध्य रेल्वे विस्कळीत; सायन-माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळाला तडे

इस्रोची पुन्हा एकदा गगनभरारी, GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरे