नगर जिल्ह्याच्या राजकारणात अफवांचे पिक सुरू झाले आहे. पण काहीही झाले तरी नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही आणि श्रीगोंद्यात आमदार राहूल जगताप हेच उमेदवार राहतील, असा ठाम विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. ...
अकोले तालुक्यातील सांगवी धरणातून शेतीसाठी सोडण्यात येत असलेले पाणी अधिका-यांनी बंद केल्यामुळे समशेरपूर व सावरगाव येथील शेतक-यांनी आज, गुरुवारी सकाळी समशेरपूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन सुरु केले. ...
शिवाजीनगर येथील एएमटीचे वर्कशॉप.. या वर्कशॉपमध्ये रांगेत बस उभ्या आहेत. सर्व नादुरुस्त. एका बसचे पाठे तुटलेले तर दुस-या बसची चाके निखळलेली.. काहींच्या काचा फोडलेल्या तर काहींचे सीट तोडलेले.. अशी ही सारीच अवकळा.. ...
उत्तर प्रदेशातील मराठा समाजाच्या २०० शिवपे्रमींच्या शिवनेरी ते लखनौ दरम्यान दुचाकीवरून निघालेल्या शिवज्योत यात्रेचे कोकमठाणच्या आत्मा मालिक ध्यानपिठात बुधवारी जोरदार स्वागत करण्यात आले. ...
विवाहितेस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चुलत सासरे व अन्य तीन साथीदारांविरोधात न्यायालयाच्या आदेशानंतर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
अहमदनगर जिल्ह्यात ऊस गाळपाचे प्रमाण वाढत असतानाच साखरेच्या उता-यातही वाढ होऊ लागली आहे. या हंगामात उतारा वाढल्यास त्यानुसार पुढील हंगामात ऊस उत्पादकांना उता-याच्या प्रमाणात जादा दराने एफ. आर. पी. ची रक्कम मिळू शकणार आहे. ...
समाज प्रवाही असतो, तो स्वत:च घडतो. समाजाच्या या बदलत्या चक्राचे चित्रण साहित्यातून उमटत असते. त्यामुळे साहित्याला पुरोगामी अथवा प्रतिगामी अशी लेबल लावली जाऊ नयेत, असे प्रतिपादन संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी केले. ...
पाण्याचा टँकर व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये टँकर व ट्रक चालकाचा समावेश आहे. नगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघा ...
जर्मनीतील श्रीसाईआश्रम सहाशे एकर जागेत आहे. आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या प्रगत देश अशी जगभर ओळख असलेल्या जर्मनीतील जवळपास दीडशे शहरातील हजारो नागरिकांच्या दिवसाची सुरूवात साईनामाने होत आहे. ...
दत्तनगर येथील तरूणीस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तसेच मालेगाव येथे नेऊन तिचे बळजबरीने लग्न लावून देण्यात आले. याप्रकरणी सहा जणांविरूद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...