शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

नागवडे कारखाना विस्तारीकरणाबाबत साखर आयुक्तांकडे करणार तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:21 IST

श्रीगोंदा : नागवडे साखर कारखान्यावर २७२ कोटींचा बोजा आहे. कारखान्याची ऊस गाळप क्षमता पाच हजार मेट्रिक टन आहे. प्रत्यक्षात ...

श्रीगोंदा : नागवडे साखर कारखान्यावर २७२ कोटींचा बोजा आहे. कारखान्याची ऊस गाळप क्षमता पाच हजार मेट्रिक टन आहे. प्रत्यक्षात कारखाना सहवीज निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाही. त्यातच आता पाच हजार मेट्रिक टन विस्तारीकरणाचा निर्णय कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी घेतला आहे. याबाबत साखर आयुक्तांकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती राज्य साखर संघाचे संचालक घनश्याम शेलार यांनी दिली आहे.

नागवडे सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा गुरुवारी ऑनलाइन पार पडली. या सभेत विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी कारखाना निवडणूक बिनविरोध व विस्तारीकरण यावर भूमिका मांडली होती. या सभेत भूमिका मांडण्याची संधी मिळाली नाही, असे म्हणत नागवडे विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन कारखाना कारभारावर हल्ला चढविला. यावेळी शेलार बोलत होते.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर, जिजाबापू शिंदे, रावसाहेब काकडे, मोहन भिंताडे यावेळी उपस्थित होते.

नागवडे साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सभासदांच्या पैशातून स्व. शिवाजीराव नागवडे यांचे स्मारक उभे राहत आहे. या परिसरात टाकण्यात आलेल्या ४२ लाखांच्या मुरुमात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप जिल्हा अण्णासाहेब शेलार यांनी केला.

राजेंद्र नागवडे यांनी स्वतःच्या मालकीचे दोन खासगी कारखाने सुरू केले आहेत. त्यामुळे नागवडे यांना सहकारी साखर कारखान्यात काम करण्याचा नैतिक अधिकार नाही. राजेंद्र नागवडे हे कारखाना निवडणुकीत उमेदवारी करणार नसतील तर आमची ही निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी आहे.

कारखाना बंद असताना कायदा सल्लागार फी ७ लाख ५० हजार रुपये कशी दिली गेली? एफआरपीप्रमाणे पैसे दिले गेले नाहीत. कारखाना अडचणीत असल्याचे सांगितले जाते मग कायदा सल्लागाराची फी कशी दिली, साजन शुगर २३०० रुपये भाव देतो तर नागवडे साखर २१०० रुपयेच भाव कसा देतो, असा सवाल शेलार यांनी केला.

--

भ्रष्टाचारातून घेतले दोन कारखाने...

केशव मगर म्हणाले, राजेंद्र नागवडे यांनी नागवडे साखर कारखान्यात भ्रष्टाचार करून दोन खासगी साखर कारखाने आणि चार टेक्स्टाइल मिल सुरू केल्या आहेत. मग हा पैसा आला कोठून, असा सवाल त्यांनी केला.