शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

नागवडे कारखाना विस्तारीकरणाबाबत साखर आयुक्तांकडे करणार तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:21 IST

श्रीगोंदा : नागवडे साखर कारखान्यावर २७२ कोटींचा बोजा आहे. कारखान्याची ऊस गाळप क्षमता पाच हजार मेट्रिक टन आहे. प्रत्यक्षात ...

श्रीगोंदा : नागवडे साखर कारखान्यावर २७२ कोटींचा बोजा आहे. कारखान्याची ऊस गाळप क्षमता पाच हजार मेट्रिक टन आहे. प्रत्यक्षात कारखाना सहवीज निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाही. त्यातच आता पाच हजार मेट्रिक टन विस्तारीकरणाचा निर्णय कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी घेतला आहे. याबाबत साखर आयुक्तांकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती राज्य साखर संघाचे संचालक घनश्याम शेलार यांनी दिली आहे.

नागवडे सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा गुरुवारी ऑनलाइन पार पडली. या सभेत विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी कारखाना निवडणूक बिनविरोध व विस्तारीकरण यावर भूमिका मांडली होती. या सभेत भूमिका मांडण्याची संधी मिळाली नाही, असे म्हणत नागवडे विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन कारखाना कारभारावर हल्ला चढविला. यावेळी शेलार बोलत होते.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर, जिजाबापू शिंदे, रावसाहेब काकडे, मोहन भिंताडे यावेळी उपस्थित होते.

नागवडे साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सभासदांच्या पैशातून स्व. शिवाजीराव नागवडे यांचे स्मारक उभे राहत आहे. या परिसरात टाकण्यात आलेल्या ४२ लाखांच्या मुरुमात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप जिल्हा अण्णासाहेब शेलार यांनी केला.

राजेंद्र नागवडे यांनी स्वतःच्या मालकीचे दोन खासगी कारखाने सुरू केले आहेत. त्यामुळे नागवडे यांना सहकारी साखर कारखान्यात काम करण्याचा नैतिक अधिकार नाही. राजेंद्र नागवडे हे कारखाना निवडणुकीत उमेदवारी करणार नसतील तर आमची ही निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी आहे.

कारखाना बंद असताना कायदा सल्लागार फी ७ लाख ५० हजार रुपये कशी दिली गेली? एफआरपीप्रमाणे पैसे दिले गेले नाहीत. कारखाना अडचणीत असल्याचे सांगितले जाते मग कायदा सल्लागाराची फी कशी दिली, साजन शुगर २३०० रुपये भाव देतो तर नागवडे साखर २१०० रुपयेच भाव कसा देतो, असा सवाल शेलार यांनी केला.

--

भ्रष्टाचारातून घेतले दोन कारखाने...

केशव मगर म्हणाले, राजेंद्र नागवडे यांनी नागवडे साखर कारखान्यात भ्रष्टाचार करून दोन खासगी साखर कारखाने आणि चार टेक्स्टाइल मिल सुरू केल्या आहेत. मग हा पैसा आला कोठून, असा सवाल त्यांनी केला.