शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सरकारच्या प्रतीकात्मक फलकावर चिखलफेक, जिल्हा काँग्रेसचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 20:52 IST

प्रशांत शिंदे, अहमदनगर : शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, दूध दरवाढ नाही. पेपर लीक होत आहे, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. ...

प्रशांत शिंदे, अहमदनगर : शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, दूध दरवाढ नाही. पेपर लीक होत आहे, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. गुन्हेगारांना बेड्या ठोकण्याऐवजी गृहखाते पाठीशी घालत आहे. राज्य सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले, असा आरोप करत जिल्हा काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतीकात्मक चिखलफेक आंदोलन केले.

यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, काँग्रेस नेते घनश्याम शेलार, नाजीर शेख, संभाजीराव रोहकले, किरण पाटील, समीर काझी, अरुण म्हस्के, संजय आनंदकर, उत्तमराव नागवडे, संपतराव म्हस्के, डॉ. अमोल फडके, शरद पवार, अंजुम शेख, किशोर तापकीर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

जयंत वाघ म्हणाले, राज्यातील जनता सुरक्षित नाही. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, कांदा, दूध दरवाढीचे प्रश्न प्रलंबित आहे. सरकार भ्रष्ट झाले असून विद्यार्थी, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनले आहेत.

घनश्याम शेलार म्हणाले की, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. स्पर्धा परीक्षा होत नाही. झालेले परीक्षेत भाजपा पदाधिकाऱ्यांनी पेपर लीक केले आहेत. भ्रष्ट सरकार पायउतार होईपर्यंत आमचे आंदोलन चालूच ठेवू.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा