शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

संगमनेरात शिवसेनेचे आंदोलन; शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध

By शेखर पानसरे | Updated: June 12, 2023 14:31 IST

पोलिसांकडून वारकऱ्यांवर झालेला लाठी हल्ला अतिशय संतापजनक

शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर: श्री क्षेत्र आळंदी येथे दिंडी सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांवर पोलिसांकडून झालेला लाठी हल्ला अतिशय संतापजनक आहे. याप्रकरणी दोषींची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी. अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटाचे संगमनेर शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली. सोमवारी (दि. १२) संगमनेर बसस्थानकासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदाेलनात ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन अनेकांनी वारकऱ्यांची वेशभूषा केली होती.

शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेश माळवे, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, पठार भाग तालुका प्रमुख संजय फड, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, दीपक वन्नम, वेणुगोपाल लाहोटी, शहर संघटक दीपक साळुंखे, शहर कार्याध्यक्ष अजीज मोमीन, विभाग प्रमुख विजय भागवत, संभव लोढा, युवा सेना उपजिल्हाप्रमुख वैभव अभंग, तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ, युवासेना शहर प्रमुख गोविंद नागरे, युवा सेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, उपतालुकाप्रमुख जनार्दन नागरे, सागर भागवत, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य विजय सातपुते, उपशहर प्रमुख अक्षय गाडे, महिला आघाडी तालुकाप्रमुख शीतल हासे, संगीता गायकवाड, आशा केदारी, ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर प्रमुख योगेश बिचकर, तालुकाप्रमुख सदाशिव हासे, सुदर्शन इटप, घुलेवाडी गटप्रमुख रविंद्र गिरी, शाखाप्रमुख नितीन अनाप, संतोष कुटे, शोएब शेख, माधव फुलमाळी, मुकेश कचरे, प्रशांत खजुरे, अर्जुन आमले, राजेंद्र लोणारी, माधव अवसक, चंदू भागवत आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

शहरप्रमुख कतारी यांनी सांगितले, आम्ही शिंदे-फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करतो. काल आळंदी येथील श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या दरम्यान वारकरी व पोलिसांमध्ये मंदिर प्रवेशावरुन वाद उपस्थित झाला व त्याही पुढे जाऊन भगवा ध्वज खांद्यावर घेऊन हरिनामाचा गजर करणाऱ्या वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. ह्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याने थोडी तरी लाज बाळगावी. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी. असेही कतारी यांनी सांगितले.

टॅग्स :Sangamnerसंगमनेर