शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणविरूद्ध भडका

By admin | Updated: May 22, 2014 00:03 IST

अहमदनगर : शहरासह उपनगरातील अनेक भागात सुरू असलेले भारनियमन, तसेच मंगळवारी मध्यरात्री दोन तास वीज खंडित झाल्याने महावितरणविरूद्ध संतप्त नागरिकांच्या उद्रेकाचा भडका उडाला.

अहमदनगर : शहरासह उपनगरातील अनेक भागात सुरू असलेले भारनियमन, तसेच मंगळवारी मध्यरात्री दोन तास वीज खंडित झाल्याने महावितरणविरूद्ध संतप्त नागरिकांच्या उद्रेकाचा भडका उडाला. केडगावला मध्यरात्री नागरिकांनी रास्ता रोको केला, तर आ. राठोड यांनी महावितरणचे अधिकारी कोंडून ठेवण्याचा इशारा दिला. शहरातील हातमपुरा, डावरे गल्ली, भिंगार, दरेवाडी आदी भागांत सध्या सहा तासांपेक्षा जास्त भारनियमन सुरू आहे. ते बंद करण्याची मागणी ग्राहकांनी अनेकदा केली. परंतु अधिकारी दाद देत नाहीत, त्यामुळे आ. राठोड यांनी कार्यकर्त्यांसह महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रभाकर हजारे यांची मंगळवारी भेट घेतली. थकबाकी व वसुलीच्या सूत्रानुसार जरी हे भारनियमन होत असले तरी त्यात नियमितपणे बिले भरणारे ग्राहक नाहक भरडले जातात. थकबाकी असेल तर ती वसूल करण्याचे व वीजचोरी होत असेल तर ती पकडण्याचे काम महावितरणचे आहे. त्यावर सरसकट भारनियमन हा उपाय होऊ शकत नाही. यात प्रामाणिक ग्राहकांनी का भरडायचे, असा सवाल करत आ. राठोड यांनी भारनियमन त्वरित बंद करा, अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. दुसरीकडे मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास अचानक अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे केडगाव येथील संतप्त नागरिकांनी नगरसेवक दिलीप सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली नगर-पुणे रस्त्यावर ठिय्या दिला. वाहतूक ठप्प झाल्याने काही वेळातच पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. नंतर महावितरणच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला असता हे तातडीचे भारनियमन असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तर लोकांचा पारा आणखी चढला. दरम्यान, बुधवारी पुन्हा आ. अनिल राठोड यांच्यासह हातमपुरा भागातील लोकांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. १०० टक्के वसुली असूनही या भागात कोणत्या नियमानुसार भारनियमन होते. हे फीडर त्वरित माळीवाडा केंद्रावर जोडा, अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यावर अधिकार्‍यांनी दोन दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी) दरेवाडी, भिंगारकरांचाही संताप दरेवाडी, भिंगारमध्ये सव्वासहा तास भारनियमन सुरू आहे. ४२ टक्क््यांपेक्षा जास्त गळती असल्याने ते होत असल्याचे अधिकारी सांगतात. परंतु वीजचोरीला आळा घालण्यासाठी काहीही उपाय होत नाहीत. जो नियमित बिल भरतो त्याला वीज मिळालीच पाहिजे, एकामुळे अनेकांना त्रास खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे त्वरित भारनियमन रद्द करावे, अन्यथा कार्यालयावर मोर्चा आणू, असा इशारा भिंगारचे वसंत राठोड यांनी दिला.