शहरं
Join us  
Trending Stories
1
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
2
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
3
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
4
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
5
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
6
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
7
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
8
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
9
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
10
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
13
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
14
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
15
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
16
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
17
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
18
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
19
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
20
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...

महावितरणविरूद्ध भडका

By admin | Updated: May 22, 2014 00:03 IST

अहमदनगर : शहरासह उपनगरातील अनेक भागात सुरू असलेले भारनियमन, तसेच मंगळवारी मध्यरात्री दोन तास वीज खंडित झाल्याने महावितरणविरूद्ध संतप्त नागरिकांच्या उद्रेकाचा भडका उडाला.

अहमदनगर : शहरासह उपनगरातील अनेक भागात सुरू असलेले भारनियमन, तसेच मंगळवारी मध्यरात्री दोन तास वीज खंडित झाल्याने महावितरणविरूद्ध संतप्त नागरिकांच्या उद्रेकाचा भडका उडाला. केडगावला मध्यरात्री नागरिकांनी रास्ता रोको केला, तर आ. राठोड यांनी महावितरणचे अधिकारी कोंडून ठेवण्याचा इशारा दिला. शहरातील हातमपुरा, डावरे गल्ली, भिंगार, दरेवाडी आदी भागांत सध्या सहा तासांपेक्षा जास्त भारनियमन सुरू आहे. ते बंद करण्याची मागणी ग्राहकांनी अनेकदा केली. परंतु अधिकारी दाद देत नाहीत, त्यामुळे आ. राठोड यांनी कार्यकर्त्यांसह महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रभाकर हजारे यांची मंगळवारी भेट घेतली. थकबाकी व वसुलीच्या सूत्रानुसार जरी हे भारनियमन होत असले तरी त्यात नियमितपणे बिले भरणारे ग्राहक नाहक भरडले जातात. थकबाकी असेल तर ती वसूल करण्याचे व वीजचोरी होत असेल तर ती पकडण्याचे काम महावितरणचे आहे. त्यावर सरसकट भारनियमन हा उपाय होऊ शकत नाही. यात प्रामाणिक ग्राहकांनी का भरडायचे, असा सवाल करत आ. राठोड यांनी भारनियमन त्वरित बंद करा, अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. दुसरीकडे मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास अचानक अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे केडगाव येथील संतप्त नागरिकांनी नगरसेवक दिलीप सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली नगर-पुणे रस्त्यावर ठिय्या दिला. वाहतूक ठप्प झाल्याने काही वेळातच पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. नंतर महावितरणच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला असता हे तातडीचे भारनियमन असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तर लोकांचा पारा आणखी चढला. दरम्यान, बुधवारी पुन्हा आ. अनिल राठोड यांच्यासह हातमपुरा भागातील लोकांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. १०० टक्के वसुली असूनही या भागात कोणत्या नियमानुसार भारनियमन होते. हे फीडर त्वरित माळीवाडा केंद्रावर जोडा, अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यावर अधिकार्‍यांनी दोन दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी) दरेवाडी, भिंगारकरांचाही संताप दरेवाडी, भिंगारमध्ये सव्वासहा तास भारनियमन सुरू आहे. ४२ टक्क््यांपेक्षा जास्त गळती असल्याने ते होत असल्याचे अधिकारी सांगतात. परंतु वीजचोरीला आळा घालण्यासाठी काहीही उपाय होत नाहीत. जो नियमित बिल भरतो त्याला वीज मिळालीच पाहिजे, एकामुळे अनेकांना त्रास खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे त्वरित भारनियमन रद्द करावे, अन्यथा कार्यालयावर मोर्चा आणू, असा इशारा भिंगारचे वसंत राठोड यांनी दिला.