शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

महावितरणविरूद्ध भडका

By admin | Updated: May 22, 2014 00:03 IST

अहमदनगर : शहरासह उपनगरातील अनेक भागात सुरू असलेले भारनियमन, तसेच मंगळवारी मध्यरात्री दोन तास वीज खंडित झाल्याने महावितरणविरूद्ध संतप्त नागरिकांच्या उद्रेकाचा भडका उडाला.

अहमदनगर : शहरासह उपनगरातील अनेक भागात सुरू असलेले भारनियमन, तसेच मंगळवारी मध्यरात्री दोन तास वीज खंडित झाल्याने महावितरणविरूद्ध संतप्त नागरिकांच्या उद्रेकाचा भडका उडाला. केडगावला मध्यरात्री नागरिकांनी रास्ता रोको केला, तर आ. राठोड यांनी महावितरणचे अधिकारी कोंडून ठेवण्याचा इशारा दिला. शहरातील हातमपुरा, डावरे गल्ली, भिंगार, दरेवाडी आदी भागांत सध्या सहा तासांपेक्षा जास्त भारनियमन सुरू आहे. ते बंद करण्याची मागणी ग्राहकांनी अनेकदा केली. परंतु अधिकारी दाद देत नाहीत, त्यामुळे आ. राठोड यांनी कार्यकर्त्यांसह महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रभाकर हजारे यांची मंगळवारी भेट घेतली. थकबाकी व वसुलीच्या सूत्रानुसार जरी हे भारनियमन होत असले तरी त्यात नियमितपणे बिले भरणारे ग्राहक नाहक भरडले जातात. थकबाकी असेल तर ती वसूल करण्याचे व वीजचोरी होत असेल तर ती पकडण्याचे काम महावितरणचे आहे. त्यावर सरसकट भारनियमन हा उपाय होऊ शकत नाही. यात प्रामाणिक ग्राहकांनी का भरडायचे, असा सवाल करत आ. राठोड यांनी भारनियमन त्वरित बंद करा, अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. दुसरीकडे मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास अचानक अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे केडगाव येथील संतप्त नागरिकांनी नगरसेवक दिलीप सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली नगर-पुणे रस्त्यावर ठिय्या दिला. वाहतूक ठप्प झाल्याने काही वेळातच पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. नंतर महावितरणच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला असता हे तातडीचे भारनियमन असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तर लोकांचा पारा आणखी चढला. दरम्यान, बुधवारी पुन्हा आ. अनिल राठोड यांच्यासह हातमपुरा भागातील लोकांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. १०० टक्के वसुली असूनही या भागात कोणत्या नियमानुसार भारनियमन होते. हे फीडर त्वरित माळीवाडा केंद्रावर जोडा, अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यावर अधिकार्‍यांनी दोन दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी) दरेवाडी, भिंगारकरांचाही संताप दरेवाडी, भिंगारमध्ये सव्वासहा तास भारनियमन सुरू आहे. ४२ टक्क््यांपेक्षा जास्त गळती असल्याने ते होत असल्याचे अधिकारी सांगतात. परंतु वीजचोरीला आळा घालण्यासाठी काहीही उपाय होत नाहीत. जो नियमित बिल भरतो त्याला वीज मिळालीच पाहिजे, एकामुळे अनेकांना त्रास खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे त्वरित भारनियमन रद्द करावे, अन्यथा कार्यालयावर मोर्चा आणू, असा इशारा भिंगारचे वसंत राठोड यांनी दिला.