शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

जामखेड शहरातील अतिक्रमण करणाऱ्या टपरीधारकांना मंत्री राम शिंदे यांचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 19:05 IST

जामखेड शहरातील सतत होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार टपरीधारकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढली आहेत. सर्वच जण अतिक्रमण काढण्याच्या बाजूने आहेत.

जामखेड : शहरातील सतत होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार टपरीधारकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढली आहेत. सर्वच जण अतिक्रमण काढण्याच्या बाजूने आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होईल तेव्हा होईल. तोपर्यंत या टपरीधारकांचे किती अतिक्रमण काढावे? याबाबत प्रशासनाने सर्वसमावेशक आराखडा तयार करून कोणावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊन अतिक्रमण काढावे, अशा सूचना पालकमंत्री राम शिंदे यांनी जामखेडच्या प्रशासनाला दिल्या आहेत.त्यामुळे टपरीधारकांना दिलासा मिळाला आहे. तहसीलमध्ये शहरातील अतिक्रमणांबाबत विशेष बैठकीत ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवडे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता लियाकत काझी, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती सूर्यकांत मोरे, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सलीम बागवान, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, ज्ञानेश्वर झेंडे, भाजपच्या सरपंच आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय काशिद, महारुद्र महारनवर, कृष्णा आहुजा, संजय कोठारी, सुनील कोठारी आदी उपस्थित होते.शहरातील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी १९ जूनला सर्वपक्षीय बैठकीत शहरातील वाहतूक कोंडी पाहता अतिक्रमण काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानुसार २० जूनला अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली. ८० टक्के टपरीधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढले. उर्वरित अतिक्रमणधारकांना सात दिवसांची नोटीस दिल्याचे तहसीलदार विशाल नाईकवडे यांनी सांगितले.जिव्हाळा फाऊंडेशनचे सचिव शहाजी डोके म्हणाले, प्रशासनाने अतिक्रमणावर हातोडा टाकण्यापूर्वी ८० टक्के अतिक्रमण काढले. परंतु तीन जणांसाठी उर्वरित अतिक्रमण हटाव मोहीम थांबली आहे. ते कोण आहेत, हे सर्वांना माहीत आहे. अतिक्रमण काढल्यावर पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे टपरीधारकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.अ‍ॅड. हिरालाल गुंदेचा यांनी भाडे भरणा-या टपरीधारकांची नगरपालिकेने काय व्यवस्था केली?, त्यांना नुकसानभरपाई कोण देणार?, या बाबी स्पष्ट केल्यावर अतिक्रमण काढावे. शामीर सय्यद यांनी अतिक्रमण काढताना टपरीधारकांची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली.अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. ७० टक्के भूसंपादन केल्याशिवाय राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करता येत नाही,असे प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeराम शिंदेJamkhedजामखेड