शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

उद्धव ठाकरेंची ठोस कामे सांगा, महायुती सरकारची कामे शेतकरी हिताचीच: रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2024 13:16 IST

अमरापूर येथे मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ सभा

 लोकमत न्यूज नेटवर्क, शेवगाव : उद्धव ठाकरे यांच्या काळात झालेली सरकारची ठोस कामे सांगा. महायुतीच्या काळात झालेली कामे पाहा. दोन्ही सरकारच्या कामाची तुलना शेतकऱ्यांनी करावी. मागेल त्याला सौरपंप, शेती पंपाची वीजबिल माफी, शेतकऱ्यांना एक रुपयात विमा, लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजना ही महायुती सरकारची कामे शेतकरी हिताचीच आहेत. शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच चांगले निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे राज्यातही महायुतीचे सरकार आणण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा विधानसभेत पाठवा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

अमरापूर (ता. शेवगाव) येथे शनिवारी दुपारी भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, अभय आव्हाड, दिलीप भालसिंग, अश्विनी थोरात, सुवेंद्र गांधी, अशोकराव चोरमले, शिवसेना जिल्हाध्यक्ष शोभा अकोलकर, आशाताई गरड, बापूसाहेब पाटेकर, संदीप खरड, दिनेश लव्हाट, संदीप वाणी, भीमराज सागडे, राजेंद्र जमधडे, बापूसाहेब भोसले, शिवाजी समिंदर, गंगाभाऊ खेडकर, डॉ. मृत्युंजय गर्जे, अमोल गर्जे, मुकुंद गर्ने बाबा राजगुरू यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदेसेना, आरपीआय, मित्रपक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, महाभकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे सत्तेत होते. आता ते महिलांना तीन हजार देऊ म्हणतात. सत्तेत असताना का दिले नाहीत? तेव्हा झोपले होते का? पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री असताना या भागात मोठा निधी दिला. आमदार मोनिका राजळे यांनी शेवगाव, पाथर्डीचा विकास केला ही मोठी गोष्ट आहे. महिलेने नेतृत्व करावे ही अभिमानाची गोष्ट आहे. राजीव सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत मिसाळ यांनी आभार मानले.

ते अडीच वर्षे घरात बसले... 

मागील निवडणुकीत शिवसेना- भाजप युतीला जनतेने कॉल दिला. उद्धव ठाकरे यांनी लगेचच सर्व पर्याय खुले असल्याचे सांगून काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यासोबत अनैसर्गिक सरकार स्थापन केले. त्यांच्या काळात एक तरी शेतकरी हिताची योजना राबविली का, असा सवाल त्यांनी केला. माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. अडीच वर्षे घरात बसले. त्यांच्यात वाद होऊन एक गट फुटला आणि आमच्यात आला. मग महायुतीचे सरकार आले. या काळात शेतकरी जनहिताच्या योजना राबविल्या, असा दावा दानवे यांनी केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकshevgaon-acशेवगावraosaheb danveरावसाहेब दानवेMahayutiमहायुतीBJPभाजपा