शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
4
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
5
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
6
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
7
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
8
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
9
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
11
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
12
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
13
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
14
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
15
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
16
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
17
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
18
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
19
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
20
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका

उद्धव ठाकरेंची ठोस कामे सांगा, महायुती सरकारची कामे शेतकरी हिताचीच: रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2024 13:16 IST

अमरापूर येथे मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ सभा

 लोकमत न्यूज नेटवर्क, शेवगाव : उद्धव ठाकरे यांच्या काळात झालेली सरकारची ठोस कामे सांगा. महायुतीच्या काळात झालेली कामे पाहा. दोन्ही सरकारच्या कामाची तुलना शेतकऱ्यांनी करावी. मागेल त्याला सौरपंप, शेती पंपाची वीजबिल माफी, शेतकऱ्यांना एक रुपयात विमा, लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजना ही महायुती सरकारची कामे शेतकरी हिताचीच आहेत. शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच चांगले निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे राज्यातही महायुतीचे सरकार आणण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा विधानसभेत पाठवा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

अमरापूर (ता. शेवगाव) येथे शनिवारी दुपारी भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, अभय आव्हाड, दिलीप भालसिंग, अश्विनी थोरात, सुवेंद्र गांधी, अशोकराव चोरमले, शिवसेना जिल्हाध्यक्ष शोभा अकोलकर, आशाताई गरड, बापूसाहेब पाटेकर, संदीप खरड, दिनेश लव्हाट, संदीप वाणी, भीमराज सागडे, राजेंद्र जमधडे, बापूसाहेब भोसले, शिवाजी समिंदर, गंगाभाऊ खेडकर, डॉ. मृत्युंजय गर्जे, अमोल गर्जे, मुकुंद गर्ने बाबा राजगुरू यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदेसेना, आरपीआय, मित्रपक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, महाभकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे सत्तेत होते. आता ते महिलांना तीन हजार देऊ म्हणतात. सत्तेत असताना का दिले नाहीत? तेव्हा झोपले होते का? पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री असताना या भागात मोठा निधी दिला. आमदार मोनिका राजळे यांनी शेवगाव, पाथर्डीचा विकास केला ही मोठी गोष्ट आहे. महिलेने नेतृत्व करावे ही अभिमानाची गोष्ट आहे. राजीव सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत मिसाळ यांनी आभार मानले.

ते अडीच वर्षे घरात बसले... 

मागील निवडणुकीत शिवसेना- भाजप युतीला जनतेने कॉल दिला. उद्धव ठाकरे यांनी लगेचच सर्व पर्याय खुले असल्याचे सांगून काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यासोबत अनैसर्गिक सरकार स्थापन केले. त्यांच्या काळात एक तरी शेतकरी हिताची योजना राबविली का, असा सवाल त्यांनी केला. माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. अडीच वर्षे घरात बसले. त्यांच्यात वाद होऊन एक गट फुटला आणि आमच्यात आला. मग महायुतीचे सरकार आले. या काळात शेतकरी जनहिताच्या योजना राबविल्या, असा दावा दानवे यांनी केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकshevgaon-acशेवगावraosaheb danveरावसाहेब दानवेMahayutiमहायुतीBJPभाजपा