शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

उद्धव ठाकरेंची ठोस कामे सांगा, महायुती सरकारची कामे शेतकरी हिताचीच: रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2024 13:16 IST

अमरापूर येथे मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ सभा

 लोकमत न्यूज नेटवर्क, शेवगाव : उद्धव ठाकरे यांच्या काळात झालेली सरकारची ठोस कामे सांगा. महायुतीच्या काळात झालेली कामे पाहा. दोन्ही सरकारच्या कामाची तुलना शेतकऱ्यांनी करावी. मागेल त्याला सौरपंप, शेती पंपाची वीजबिल माफी, शेतकऱ्यांना एक रुपयात विमा, लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजना ही महायुती सरकारची कामे शेतकरी हिताचीच आहेत. शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच चांगले निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे राज्यातही महायुतीचे सरकार आणण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा विधानसभेत पाठवा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

अमरापूर (ता. शेवगाव) येथे शनिवारी दुपारी भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, अभय आव्हाड, दिलीप भालसिंग, अश्विनी थोरात, सुवेंद्र गांधी, अशोकराव चोरमले, शिवसेना जिल्हाध्यक्ष शोभा अकोलकर, आशाताई गरड, बापूसाहेब पाटेकर, संदीप खरड, दिनेश लव्हाट, संदीप वाणी, भीमराज सागडे, राजेंद्र जमधडे, बापूसाहेब भोसले, शिवाजी समिंदर, गंगाभाऊ खेडकर, डॉ. मृत्युंजय गर्जे, अमोल गर्जे, मुकुंद गर्ने बाबा राजगुरू यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदेसेना, आरपीआय, मित्रपक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, महाभकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे सत्तेत होते. आता ते महिलांना तीन हजार देऊ म्हणतात. सत्तेत असताना का दिले नाहीत? तेव्हा झोपले होते का? पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री असताना या भागात मोठा निधी दिला. आमदार मोनिका राजळे यांनी शेवगाव, पाथर्डीचा विकास केला ही मोठी गोष्ट आहे. महिलेने नेतृत्व करावे ही अभिमानाची गोष्ट आहे. राजीव सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत मिसाळ यांनी आभार मानले.

ते अडीच वर्षे घरात बसले... 

मागील निवडणुकीत शिवसेना- भाजप युतीला जनतेने कॉल दिला. उद्धव ठाकरे यांनी लगेचच सर्व पर्याय खुले असल्याचे सांगून काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यासोबत अनैसर्गिक सरकार स्थापन केले. त्यांच्या काळात एक तरी शेतकरी हिताची योजना राबविली का, असा सवाल त्यांनी केला. माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. अडीच वर्षे घरात बसले. त्यांच्यात वाद होऊन एक गट फुटला आणि आमच्यात आला. मग महायुतीचे सरकार आले. या काळात शेतकरी जनहिताच्या योजना राबविल्या, असा दावा दानवे यांनी केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकshevgaon-acशेवगावraosaheb danveरावसाहेब दानवेMahayutiमहायुतीBJPभाजपा