शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

उद्धव ठाकरेंची ठोस कामे सांगा, महायुती सरकारची कामे शेतकरी हिताचीच: रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2024 13:16 IST

अमरापूर येथे मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ सभा

 लोकमत न्यूज नेटवर्क, शेवगाव : उद्धव ठाकरे यांच्या काळात झालेली सरकारची ठोस कामे सांगा. महायुतीच्या काळात झालेली कामे पाहा. दोन्ही सरकारच्या कामाची तुलना शेतकऱ्यांनी करावी. मागेल त्याला सौरपंप, शेती पंपाची वीजबिल माफी, शेतकऱ्यांना एक रुपयात विमा, लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजना ही महायुती सरकारची कामे शेतकरी हिताचीच आहेत. शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच चांगले निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे राज्यातही महायुतीचे सरकार आणण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा विधानसभेत पाठवा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

अमरापूर (ता. शेवगाव) येथे शनिवारी दुपारी भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, अभय आव्हाड, दिलीप भालसिंग, अश्विनी थोरात, सुवेंद्र गांधी, अशोकराव चोरमले, शिवसेना जिल्हाध्यक्ष शोभा अकोलकर, आशाताई गरड, बापूसाहेब पाटेकर, संदीप खरड, दिनेश लव्हाट, संदीप वाणी, भीमराज सागडे, राजेंद्र जमधडे, बापूसाहेब भोसले, शिवाजी समिंदर, गंगाभाऊ खेडकर, डॉ. मृत्युंजय गर्जे, अमोल गर्जे, मुकुंद गर्ने बाबा राजगुरू यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदेसेना, आरपीआय, मित्रपक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, महाभकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे सत्तेत होते. आता ते महिलांना तीन हजार देऊ म्हणतात. सत्तेत असताना का दिले नाहीत? तेव्हा झोपले होते का? पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री असताना या भागात मोठा निधी दिला. आमदार मोनिका राजळे यांनी शेवगाव, पाथर्डीचा विकास केला ही मोठी गोष्ट आहे. महिलेने नेतृत्व करावे ही अभिमानाची गोष्ट आहे. राजीव सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत मिसाळ यांनी आभार मानले.

ते अडीच वर्षे घरात बसले... 

मागील निवडणुकीत शिवसेना- भाजप युतीला जनतेने कॉल दिला. उद्धव ठाकरे यांनी लगेचच सर्व पर्याय खुले असल्याचे सांगून काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यासोबत अनैसर्गिक सरकार स्थापन केले. त्यांच्या काळात एक तरी शेतकरी हिताची योजना राबविली का, असा सवाल त्यांनी केला. माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. अडीच वर्षे घरात बसले. त्यांच्यात वाद होऊन एक गट फुटला आणि आमच्यात आला. मग महायुतीचे सरकार आले. या काळात शेतकरी जनहिताच्या योजना राबविल्या, असा दावा दानवे यांनी केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकshevgaon-acशेवगावraosaheb danveरावसाहेब दानवेMahayutiमहायुतीBJPभाजपा