शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
2
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
3
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
4
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
5
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
6
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
7
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
8
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
10
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
11
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
12
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
13
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
14
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
15
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
16
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
17
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
18
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
19
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

साईबाबांनी समानता शिकवली; तो विचार राजकारणातून गायब: प्रियंका गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2024 12:45 IST

शिर्डीत साईदर्शन; साईबाबांच्या विचारांचे स्मरण.

लोकमत न्यूज नेटवर्क, शिर्डी :शिर्डीच्या पवित्र भूमीत येऊन मला समाधान वाटले. साईबाबांनी समानता व मानवतेची शिकवण दिली. त्यांचा हा विचार आज राजकीय मंचावर जपला जात आहे का? हा प्रश्न आहे. सभांतील भाषणांत आज खरेपणा राहिलेला नाही. सर्रास खोटे बोलले जात आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केले. 

त्यांची जिल्ह्यातील आजवरची ही पहिलीच सभा होती. यावेळी त्यांनी साईसमाधीचेही दर्शन घेतले. विमानतळावर आगमन झाल्यानंतर गांधी साईमंदिरात गेल्या. तेथे दर्शन घेऊन त्या सभास्थानी आल्या. मंदिरात मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. सभेत त्यांनी पस्तीस मिनिटे भाषण केले.

त्या म्हणाल्या, मंदिरात जाऊन आपण दर्शन घेतो; पण मंदिरातील विचार आपण व्यवहारात मात्र जपत नाही. संत गाडेगाबाबांनीही आपणाला 'मनात डोकवा. मनातील दुर्गंधी साफ करा,' हा संदेश दिला होता. या जिल्ह्याच्या भूमीतून स्वातंत्र्याची लढाई लढली गेली. महाराष्ट्रात तंट्या भिल्ल, उमाजी नाईक, राघोजी भांगरे, राणी दुर्गावती हे क्रांतिकारक निर्माण झाले. या भूमीतून टिळक, आगरकर, काका कालेलकर, विनोबा भावे, अच्युतराव पटवर्धन, भाऊसाहेब थोरात, अण्णासाहेब शिंदे यांनी समाजसुधारणेचे विचार मांडले, असाही उल्लेख त्यांनी केला.

शिर्डीत दहशत आहे असे लोक म्हणतात. मात्र न घाबरता मतदान करा, असेही त्या शेवटी म्हणाल्या. जयश्री थोरात यांनी स्वागत केले. नामदेव कहांडाळ यांनी सूत्रसंचालन केले. शिवसेनेचे रावसाहेब खेवरे यांनी आभार मानले. व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, काँग्रेसच्या निरीक्षक आमदार रिटा चौधरी, तेलंगणा राज्यातील मंत्री सीताक्का, बाळासाहेब गायकवाड, करण ससाणे, मिलिंद कानवडे, अॅड. नारायण कार्ले, किरण काळे आदी उपस्थित होते. दिवंगत बी. जे. खताळ पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ-पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

भाजपकडून महिलांचा अवमान : थोरात 

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पाशा पटेल, महाडिक यांच्या भाषणांवर टीका केली. ते म्हणाले, 'भाजपचे नेते महिलांबद्दल सतत आक्षेपार्ह व अवमानकारक बोलत आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संगमनेरात दहशत असल्याचे सांगितले. आता माध्यमांनीच नेमकी संगमनेर की राहाता तालुक्यात दहशत आहे याचे सर्वेक्षण करावे. तसेच विकास कोणत्या तालुक्यात अधिक झाला आहे? याचीही तपासणी करावी, असे आवाहन थोरात यांनी केले.

किसान की बेटी, शिक्षकाचा मुलगा 

शिर्डीतील उमेदवार प्रभावती घोगरे यावेळी बोलताना म्हणाल्या, 'देश की बेटी किसान के बेटी के लिए मिलने शिर्डी आयी है...!' कोपरगावचे उमेदवार संदीप वर्षे म्हणाले, मी सामान्य शिक्षकाचा मुलगा आहे.

थोरातांना संधी द्या : हेमंत ओगले 

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर थोरात यांना संधी दिली जावी, अशी मागणी सभेत श्रीरामपूरचे उमेदवार हेमंत ओगले यांनी केली.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकPriyanka Gandhiप्रियंका गांधीshirdi-acशिर्डीcongressकाँग्रेस