शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

राधाकृष्ण विखेंच्या प्रवेशाने नगर जिल्ह्यातील युतीचे जागावाटप बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 14:30 IST

राधाकृष्ण विखेंनी भाजपात प्रवेश केला आहे. ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी ही निवडून येत असल्याने शिर्डी मतदार संघ हा भाजपास सोडण्यात येऊ शकतो.

ठळक मुद्देशिर्डी मतदार संघ हा भाजपास सोडण्यात येऊ शकतो. इतरही ठिकाणी विधानसभेसाठी नव्याने जागा वाटप होतील, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ही नगर जिल्ह्यात २५ व २६ ऑगस्टला येत आहे.

अहमदनगर -  राधाकृष्ण विखेंनी भाजपात प्रवेश केला आहे. ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी ही निवडून येत असल्याने शिर्डी मतदार संघ हा भाजपास सोडण्यात येऊ शकतो. तसेच इतरही ठिकाणी विधानसभेसाठी नव्याने जागा वाटप होतील, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. यावेळी खा. सुजय विखे, माजी खा. दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे, आ. शिवाजी कर्डीले, बाळासाहेब मुरकुटे, बबनराव पाचपुते आदीसह भाजपाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ही नगर जिल्ह्यात २५ व २६ ऑगस्टला येत आहे. २५ तारखेला सकाळी शिर्डी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार असून लोणी येथे जाऊन राधाकृष्ण विखे यांची सांत्वन भेट घेणार आहेत. यानंतर अकोल्यात दुपारी २ वाजता महाजनादेश सभा होणार. ३  वाजता संगमनेर येथे मालपाणी लॉनमध्ये सभा होईल. राहुरी येथे सभा होऊन नगरला मार्गस्थ होणार आहे. सावेडी एमआयडीसी येथे भाजपाचे पदाधिकारी मुख्यमंत्री यांचे स्वागत करणार आहेत. शहरातून रॅली काढण्यात आल्यावर सायंकाळी सात वाजता गांधी मैदानात त्यांची सभा होणार आहे.

२५ तारखेला मुख्यमंत्री हे नगर विश्रामगृहावर मुक्कामाला थांबणार आहेत. २६ ला ते महाजनादेश यात्रा पाथर्डी कडे जाणार असून तेथे मार्केट यार्ड येथे ११.३० वाजता सभा होणार आहे. मात्र त्याआधी भिंगार, करंजी, तिसगाव येथे त्यांचे स्वागत होणार आहे. माणिकदौंडी मार्गे आष्टीला सभेनंतर जामखेड सभा होणार आहे, यानंतर बीड येथे सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. महाजनादेश यात्रा शिवसेनेच्याच मतदारसंघातून जात आहे, याकडे लक्ष वेधले असता राम शिंदे  यांनी ही यात्रा महायुतीची आहे. त्यामुळे शिवसेना देखील यात सहभागी आहेच असं म्हटलं आहे. 

तर भाजपा बारा जागा लढवेल...

नगर जिल्ह्यात महायुतीच्याच बारा जागा येतील. तसेच युती झाली नाही तर बाराही जागा लढवून भाजपा जिंकेल असे खासदार सुजय विखे यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRam Shindeराम शिंदे