शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

"राम आपलाय, बहुजनांचा; शिकार करुन खाणारा मांसाहारी राम"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 23:40 IST

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक विधान करुन नवा वाद निर्माण केला आहे.

मुंबई - अयोध्येतील प्रभू रामाचे मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते रामलला भव्य-दिव्य मंदिरात विराजमान होतील. देशभरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून गावागावात हा सोहळा आयोजित केला जात आहे. पंतप्रधान मोदींनीही या दिवशी दिवाळी साजरी करण्याचं आवाहन देशावासीयांना केलं आहे. त्यामुळे, प्रभू श्रीराम आणि अयोध्या हा सध्या राजकीय मुद्दा बनला आहे. भाजपासह विरोधकही राम सांगत आहेत. त्यातच, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक विधान करुन नवा वाद निर्माण केला आहे.

प्रभू श्रीराम हे बहुजनांचे होते, तसेच ते मांसाहारी होते, असे म्हणत आव्हाड यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नवीन वाद निर्माण केला आहे. आता, त्यांच्या या विधानावर भाजपा नेते किंवा रामभक्त काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे. 

शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी, आव्हाड व्यासपीठावरुन बोलत होते. ''आपण हा इतिहास तुम्ही वाचत नाही. राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम. शिकार करुन खाणारा राम तो आमचा आहे, बहुजनांचा. तुम्ही तिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात. पण, त्या रामाचा आम्ही आदर्श पाळतो आणि मटन खातो आहोत, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. राम हा शाकाहारी नव्हताच, तो मांसाहारी होता. १४ वर्षे जंगलात जाणारा माणूस कुठे जाणार शाकाहारी अन्न शोधायला, मी जे बोलतो ते खरंच बोलत असतो'', असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नवा वाद निर्माण केला आहे. 

दरम्यान, राम मंदिर सोहळ्याला केवळ व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण देण्यात आल्याचं विधान भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावरही जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार करताना राम मंदिरा कुणाच्या बापाची जहागीर नाही, असे म्हटले होते. 

निमंत्रणावरुन काय म्हणाले होते आव्हाड

मंदिर कुणाच्या बापाची मालमत्ता नाही. ही बापाची मालमत्ता होती तेव्हाच चार्तुवर्ण, क्षुद्र जन्माला आले आणि त्यांना देवळाच्या बाहेर उभं करण्यात आले. तुम्ही आजपण आम्हाला देवळाच्या बाहेर उभं करणार?, तुम्ही आजपण आम्हाला आमंत्रण देणार नाही? आणि परत चार्तुवर्णाची निर्मिती होणार. तुमच्या आमंत्रणाची आणि तुम्ही बोलवण्याची वाट बघणारे आम्ही नाही. आम्हाला जेव्हा जायचे असेल तेव्हा रामाचे नाव घेऊन राम मंदिरात जाऊ. राम कुणाच्या बापाची मालमत्ता नाही. आमंत्रण आलं का? ही कुठली नवीन संस्कृती, तुमच्या आमंत्रणाची वाट बघणार नाही. आम्हाला जायचे तेव्हा मंदिरात जाऊ, असं त्यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNCPराष्ट्रवादी काँग्रेस