शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

Lok Sabha Election 2019 : अहमदनगर तालुक्यात आघाडीत फूट : शिवसेनेच्या मेळाव्यात काँग्रेसच्या नेत्यांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 19:16 IST

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीकडून आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले आहे.

केडगाव : काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीकडून आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले आहे. असे असतानाच नगर तालुक्यातील आघाडीत बिघाडी झाली आहे.नगर तालुक्यातील काँग्रेसचे नेते जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब बाहासाहेब हराळ यांनी युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना जाहीर मेळाव्यात पाठिंबा दिला. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य रविंद्र भापकर यांनी मेळाव्यास हजेरी लावली. त्यामुळे कॉग्रेस आघाडीत नगर तालुक्यात मोठी फूट पडली आहे.युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात नगर तालुक्यातील शिवसेना महाआघाडीच्यावतीने शहरातील नक्षत्र लॉन येथे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते, डॉ. सुजय विखे, शिवसेना उपनेते अनिल राठोड, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ, अरुण होळकर, जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले, गोविंद मोकाटे, सभापती रामदास भोर, उपसभापती प्रविण कोकाटे, काँग्रेसचे पंचायत समिति सदस्य रविंद्र भापकर, खरेदी विक्री संघाचे संचालक संजय गिरवले यांच्यासह महाआघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बाळासाहेब हराळ म्हणाले, आज डॉ. सुजय विखेंसाठी नगर तालुक्यातील महाआघाडीचा मेळावा आहे. म्हणून मेळाव्याला गर्दी होवू नये म्हणून विरोधकांनी छावणीत ऊसाची वाटप उशीरा केली. मी काँग्रेसचाच माणूस आहे. विखे घराणे हे आमचे दैवत आहे. नगर तालुक्यात शिवसेना- काँग्रेस व इतर मित्र पक्ष यांंची महाआघाडी आहे. ही महाआघाडी फेव्हीकोलचा जोड आहे. ती आत्ताही आणि विधानसभेलाही अशीच कायम राहणार आहे. डॉ. विखेंनी नगर तालुक्यातील जनतेला साकळाई योजनेचे पाणी द्यावे. नगर तालुक्यातील जनता त्यांना कदापि विसरणार नाही.वॉर्डात पाणी प्रश्न न सोडविणारे ‘साकळाई’ कशी मार्गी लावणार?डॉ. सुजय विखे यांनी आ. संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधला. नगर तालुक्यासह दक्षिण भागातील पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. दुष्काळाचे प्रश्न आहेत. साकळाई योजनांसह इतर योजना मार्गी लावण्यासाठी केंद्रातूनच निधी आणावा लागणार आहे. स्थानिक-बाहेरचा वाद करण्यापेक्षा या विषयावर चर्चा होणे आवश्यक आहे. चार वर्षे आमदार, अनेकवेळा महापौर असतानाही जे स्वतच्या वॉर्डात आजही टँकरने पाणी देतात, वॉडार्तील पाणी प्रश्?न न सोडविणारे ते साकळाई योजना कशी मार्गी लावणार? असा सवाल डॉ. सुजय विखे यांनी केला .

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९