शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : अहमदनगर तालुक्यात आघाडीत फूट : शिवसेनेच्या मेळाव्यात काँग्रेसच्या नेत्यांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 19:16 IST

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीकडून आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले आहे.

केडगाव : काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीकडून आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले आहे. असे असतानाच नगर तालुक्यातील आघाडीत बिघाडी झाली आहे.नगर तालुक्यातील काँग्रेसचे नेते जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब बाहासाहेब हराळ यांनी युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना जाहीर मेळाव्यात पाठिंबा दिला. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य रविंद्र भापकर यांनी मेळाव्यास हजेरी लावली. त्यामुळे कॉग्रेस आघाडीत नगर तालुक्यात मोठी फूट पडली आहे.युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात नगर तालुक्यातील शिवसेना महाआघाडीच्यावतीने शहरातील नक्षत्र लॉन येथे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते, डॉ. सुजय विखे, शिवसेना उपनेते अनिल राठोड, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ, अरुण होळकर, जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले, गोविंद मोकाटे, सभापती रामदास भोर, उपसभापती प्रविण कोकाटे, काँग्रेसचे पंचायत समिति सदस्य रविंद्र भापकर, खरेदी विक्री संघाचे संचालक संजय गिरवले यांच्यासह महाआघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बाळासाहेब हराळ म्हणाले, आज डॉ. सुजय विखेंसाठी नगर तालुक्यातील महाआघाडीचा मेळावा आहे. म्हणून मेळाव्याला गर्दी होवू नये म्हणून विरोधकांनी छावणीत ऊसाची वाटप उशीरा केली. मी काँग्रेसचाच माणूस आहे. विखे घराणे हे आमचे दैवत आहे. नगर तालुक्यात शिवसेना- काँग्रेस व इतर मित्र पक्ष यांंची महाआघाडी आहे. ही महाआघाडी फेव्हीकोलचा जोड आहे. ती आत्ताही आणि विधानसभेलाही अशीच कायम राहणार आहे. डॉ. विखेंनी नगर तालुक्यातील जनतेला साकळाई योजनेचे पाणी द्यावे. नगर तालुक्यातील जनता त्यांना कदापि विसरणार नाही.वॉर्डात पाणी प्रश्न न सोडविणारे ‘साकळाई’ कशी मार्गी लावणार?डॉ. सुजय विखे यांनी आ. संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधला. नगर तालुक्यासह दक्षिण भागातील पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. दुष्काळाचे प्रश्न आहेत. साकळाई योजनांसह इतर योजना मार्गी लावण्यासाठी केंद्रातूनच निधी आणावा लागणार आहे. स्थानिक-बाहेरचा वाद करण्यापेक्षा या विषयावर चर्चा होणे आवश्यक आहे. चार वर्षे आमदार, अनेकवेळा महापौर असतानाही जे स्वतच्या वॉर्डात आजही टँकरने पाणी देतात, वॉडार्तील पाणी प्रश्?न न सोडविणारे ते साकळाई योजना कशी मार्गी लावणार? असा सवाल डॉ. सुजय विखे यांनी केला .

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९