शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये मतदारांवर कुणाची मात्रा; ‘आयुर्वेद’ की ‘अ‍ॅलोपॅथी’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 12:41 IST

राष्ट्रवादीने वाणिज्य विषयात पदवी मिळविणा-या आमदार संग्राम जगताप यांना तर भाजपने न्युरोसर्जन असलेल्या डॉ. सुजय विखे यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे

अण्णा नवथरअहमदनगर : राष्ट्रवादीने वाणिज्य विषयात पदवी मिळविणा-या आमदार संग्राम जगताप यांना तर भाजपने न्युरोसर्जन असलेल्या डॉ. सुजय विखे यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. त्यात संग्राम यांचे वडील आमदार अरुण जगतापही आयुर्वेद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील मतदारांवर कुणाची मात्रा लागू होणार ‘आयुर्वेद की अ‍ॅलोपॅथी’ याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे.अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आमदार संग्राम जगताप विरुध्द डॉ. सुजय विखे अशी सरळ लढत होत असली तरी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रतिष्ठेचीच ही लढाई आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे राज्याच्याच नव्हे, तर देशातील नेत्यांचे लक्ष लागून आहे. दोन्ही पक्षांनी तरुण आणि उच्च शिक्षित उमेदवार दिले आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय डॉक्टर आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांचे पुत्र संंग्राम विद्यमान आमदार आहेत. त्यांचे शिक्षण बी.कॉम. आहे.  या दोन्ही उमेदवारांच्या पदव्या पाहता ते उच्च शिक्षित आहेत. एक डॉक्टर आहे, तर दुसऱ्याने वाणिज्यमध्ये पदवी मिळविलेली आहे. डॉ. सुजय विखे यांनी मतदारसंघात अनेक आरोग्य शिबीर घेऊन मतदारांवर उपचार केलेले आहेत. हाच मुद्दा विखे प्रचारात वारंवार सांगत आहेत. त्याआधारे ते मते मागत आहेत. विखे उच्च शिक्षित आणि तरुण असल्यानेच राष्ट्रवादीनेही तरुण उमेदवाराची निवड केली आहे. डॉक्टर असलेल्या विखे यांनी मतदारसंघात अनेक राजकीय सर्जरी केल्याची चर्चा आहे़ परंतु, मतांची गोळाबेरीज करण्यात संग्राम जगताप चांगलेच पारंगत आहेत़ ते गेल्या विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत दिसले आहे़ मतांची जुळवाजुळव कशी करायची आणि जादुई आकडा कसा गाठायचा, यात त्यांचा हातखंडा आहे. पण, विखे यांनी गेल्या तीन वर्षात अनेक सर्जरी मतदारसंघात केल्या आहेत. विखे यांनी एकदा सर्जरी केली की पुन्हा दुखणे डोके वर काढत नाही, असेही अनेकांचे म्हणणे आहे.‘विखे बाहेरचे उमेदवार आहेत’, अशी टीका जगताप यांच्याकडून होऊ लागली आहे. ‘घरचा खासदार, नगरचा खासदार’, अशा पोस्ट सध्या राष्ट्रवादीकडून व्हायरल केल्या जात आहेत. त्यामुळे मतदारांना या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांनाही इलाज करावे लागतील. नगर शहरातील मतांवरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. संग्राम जगताप शहराचे आमदार आहेत. ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे त्यांच्या मतांची गोळाबेरीज नगर शहरापासूनच सुरू होते. पण, विखे उत्तरेतील असल्याने त्यांना सुरुवात कुठून करावी आणि कुठे संपवावी, असा पेच त्यांच्या समोर आहे. त्यामुळेच ते सकाळी पाथर्डीत तर दुपारी कर्जत- जामखेडमध्ये असतात़ त्यांचे वडील श्रीगोंद्यात असतात. त्यांना एकूणच कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी सर्जरी करत फिरावे लागणार असल्याचे दिसते. आमदार जगताप यांचे पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेडमध्ये नातेवाईक आहेत.  त्यामुळे तिथे त्यांना गोळाबेरीज करावी लागणार आहे. इकडे शेवगावमध्ये घुले बंधुही लिड कितीचा देणार, याचा आकडा त्यांनीच आधीच सांगून टाकला आहे. त्यामुुळे मतदारांवर कोणाची मात्रा चालली, हे २३ मे रोजीच स्पष्ट होईल.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९