शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

वंचित बहुजन आघाडीत तृतीय पंथीयांना स्थान - दिशा शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 11:07 IST

बहुजन वंचित आघाडीच्या प्रवक्तेपदी श्रीरामपूर येथील दिशा पिंकी शेख तृतीयपंथी साहित्यिका आणि कार्यकर्तीची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवाजी पवारबहुजन वंचित आघाडीच्या प्रवक्तेपदी श्रीरामपूर येथील दिशा पिंकी शेख तृतीयपंथी साहित्यिका आणि कार्यकर्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई, नाशिक, मालेगाव येथील त्यांच्या भाषणांना उपस्थितांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. बहुजन आणि वंचितांच्या आघाडीमध्ये आता तृतीय पंथीयांनाही स्थान मिळाल्याचे दिशा यांनी सांगितले. त्यांच्याशी ‘लोकमत’ने केलेली खास बातचीत..प्रश्न : वंचित आघाडीच्या प्रवक्तेपदी झालेल्या नियुक्तीला काय महत्त्व आहे?उत्तर : खरे तर मागील दोन महिन्यांपासूनच आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आपण संपर्कात होतो. मात्र, सध्याच्या राजकारणात मुक्तपणे विचार मांडण्याला आणि काम करायला कितपत वाव मिळेल, अशी मनात शंका होती. काहीशी भीती होती. त्यामुळे कुठल्या व्यासपीठावर जात नव्हते. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी मला मोठी संधी मिळवून दिली. आघाडीच्या सभांमध्ये आपल्याला कुठलेही निर्देश न देता मोकळेपणाने बोलू दिले जाते. राजकीय सत्तेचा विचार नंतर मात्र, सामाजिकीकरणाची प्रक्रिया यानिमित्ताने सुरू झाल्याचे समाधान आहे.प्रश्न : लोकांची काय प्रतिक्रिया आहे?उत्तर : तृतीयपंथी घटकातील व्यक्ती बलुतेदार, अलुतेदार, आदिवासींच्या प्रश्नावर पोटतिडकीने बोलते आहे हे पाहून सभा संपल्यानंतर बायका मला मिठी मारतात. तृतीयपंथीयांबद्दल समाजात असलेले पूर्वग्रह काही प्रमाणात दूर होण्यास त्यामुळे मदत होते आहे. याचा अनुभव मी स्वत: घेत आहे. अगदी एमआयएमनेही माझ्या नियुक्तीला जोरदार पाठिंबा दिला आहे.प्रश्न : तृतीय पंथीय समाजाचे प्रश्न काय आहेत.?उत्तर : मुळात तृतीयपंथीयांविषयी बोलायचे झाल्यास आम्हाला मागल्याचे (बाजारात पैैसे गोळा करणे) काम थांबविण्याचे सल्ले दिले जातात. उत्तर भारतात आमच्या काही रितीरिवाजांना बेगिंग अ‍ॅक्टखाली गुन्हा ठरविण्यात आला आहे. मात्र, सरकार जोपर्यंत आम्हाला जगण्याची साधने देत नाही, उपजिविकेचा प्रश्न सोडवत नाही, तोपर्यंत मूळ काम थांबवता येणार नाही.काँग्रेस पक्षाने अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी अप्सरा रेड्डी या तृतीयपंथीयाची नुकतीच नियुक्ती केली. खासदार सुप्रिया सुळे यांनीही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी उच्च शिक्षित असणाऱ्या चांदणी गोरे यांना राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मात्र, या प्रस्थापित राजकीय पक्षांमध्ये या नियुक्त्यांना केवळ जेवणातील सलाडपुरतेच महत्त्व आहे. बोलणाऱ्या प्रतिनिधीत्वाची आज खरी गरज आहे, असे दिशा पिंकी शेख यांनी सांगितले.राजकीय व्यवस्थामागील काँग्रेस आघाडीच्या सरकारने सन २०१३च्या अखेरीस तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाची स्थापना केली होती. मात्र त्याचे पुढे काय झाले माहीत नाही. या सरकारनेही अखेरच्या काळात आता महामंडळ स्थापन केले. मात्र, निवडणुकीत ते हरवून जाईल. सरकार आमच्याकरिता एक प्रमाणपत्र लवकरच जारी करणार आहे. आमची ओळख त्याद्वारे निश्चित केली जाणार आहे. मात्र, आमच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा आणि आमची ओळख निश्चित करण्याचा यांना अधिकार दिलाच कोणी? आमच्यातील अनेक गुणी लोक शिक्षित आहेत. मात्र, शिष्यवृत्ती-आरक्षणाअभावी त्यांना आपला प्रवास थांबवावा लागत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.भाजपची बी टीमवंचित आघाडी म्हणजे भाजपची बी टीम आहे का? यावर दिशा म्हणाल्या, खरं तर हा प्रश्न गुळगुळीत झाला आहे. राज्यात आम्ही २२ जागांवर वडार, होलार, कैकाडी, धनगर, माळी, मराठा समाजाला उमेदवारी दिली. प्रस्थापित पक्ष या वंचितांचा केवळ मतापुरता वापर करतो. मात्र, नेतृत्व द्यायला तयार नाही. तेव्हा डॉ.आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या राजकीय लोकशाहीच्या निर्मितीकरिता काँग्रेस आघाडीने आमच्याविरोधात उमेदवार देऊ नयेत. त्यांनीच ते भाजपची बी टीम नाही हे आता सिद्ध करावे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर