शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

वंचित बहुजन आघाडीत तृतीय पंथीयांना स्थान - दिशा शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 11:07 IST

बहुजन वंचित आघाडीच्या प्रवक्तेपदी श्रीरामपूर येथील दिशा पिंकी शेख तृतीयपंथी साहित्यिका आणि कार्यकर्तीची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवाजी पवारबहुजन वंचित आघाडीच्या प्रवक्तेपदी श्रीरामपूर येथील दिशा पिंकी शेख तृतीयपंथी साहित्यिका आणि कार्यकर्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई, नाशिक, मालेगाव येथील त्यांच्या भाषणांना उपस्थितांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. बहुजन आणि वंचितांच्या आघाडीमध्ये आता तृतीय पंथीयांनाही स्थान मिळाल्याचे दिशा यांनी सांगितले. त्यांच्याशी ‘लोकमत’ने केलेली खास बातचीत..प्रश्न : वंचित आघाडीच्या प्रवक्तेपदी झालेल्या नियुक्तीला काय महत्त्व आहे?उत्तर : खरे तर मागील दोन महिन्यांपासूनच आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आपण संपर्कात होतो. मात्र, सध्याच्या राजकारणात मुक्तपणे विचार मांडण्याला आणि काम करायला कितपत वाव मिळेल, अशी मनात शंका होती. काहीशी भीती होती. त्यामुळे कुठल्या व्यासपीठावर जात नव्हते. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी मला मोठी संधी मिळवून दिली. आघाडीच्या सभांमध्ये आपल्याला कुठलेही निर्देश न देता मोकळेपणाने बोलू दिले जाते. राजकीय सत्तेचा विचार नंतर मात्र, सामाजिकीकरणाची प्रक्रिया यानिमित्ताने सुरू झाल्याचे समाधान आहे.प्रश्न : लोकांची काय प्रतिक्रिया आहे?उत्तर : तृतीयपंथी घटकातील व्यक्ती बलुतेदार, अलुतेदार, आदिवासींच्या प्रश्नावर पोटतिडकीने बोलते आहे हे पाहून सभा संपल्यानंतर बायका मला मिठी मारतात. तृतीयपंथीयांबद्दल समाजात असलेले पूर्वग्रह काही प्रमाणात दूर होण्यास त्यामुळे मदत होते आहे. याचा अनुभव मी स्वत: घेत आहे. अगदी एमआयएमनेही माझ्या नियुक्तीला जोरदार पाठिंबा दिला आहे.प्रश्न : तृतीय पंथीय समाजाचे प्रश्न काय आहेत.?उत्तर : मुळात तृतीयपंथीयांविषयी बोलायचे झाल्यास आम्हाला मागल्याचे (बाजारात पैैसे गोळा करणे) काम थांबविण्याचे सल्ले दिले जातात. उत्तर भारतात आमच्या काही रितीरिवाजांना बेगिंग अ‍ॅक्टखाली गुन्हा ठरविण्यात आला आहे. मात्र, सरकार जोपर्यंत आम्हाला जगण्याची साधने देत नाही, उपजिविकेचा प्रश्न सोडवत नाही, तोपर्यंत मूळ काम थांबवता येणार नाही.काँग्रेस पक्षाने अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी अप्सरा रेड्डी या तृतीयपंथीयाची नुकतीच नियुक्ती केली. खासदार सुप्रिया सुळे यांनीही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी उच्च शिक्षित असणाऱ्या चांदणी गोरे यांना राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मात्र, या प्रस्थापित राजकीय पक्षांमध्ये या नियुक्त्यांना केवळ जेवणातील सलाडपुरतेच महत्त्व आहे. बोलणाऱ्या प्रतिनिधीत्वाची आज खरी गरज आहे, असे दिशा पिंकी शेख यांनी सांगितले.राजकीय व्यवस्थामागील काँग्रेस आघाडीच्या सरकारने सन २०१३च्या अखेरीस तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाची स्थापना केली होती. मात्र त्याचे पुढे काय झाले माहीत नाही. या सरकारनेही अखेरच्या काळात आता महामंडळ स्थापन केले. मात्र, निवडणुकीत ते हरवून जाईल. सरकार आमच्याकरिता एक प्रमाणपत्र लवकरच जारी करणार आहे. आमची ओळख त्याद्वारे निश्चित केली जाणार आहे. मात्र, आमच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा आणि आमची ओळख निश्चित करण्याचा यांना अधिकार दिलाच कोणी? आमच्यातील अनेक गुणी लोक शिक्षित आहेत. मात्र, शिष्यवृत्ती-आरक्षणाअभावी त्यांना आपला प्रवास थांबवावा लागत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.भाजपची बी टीमवंचित आघाडी म्हणजे भाजपची बी टीम आहे का? यावर दिशा म्हणाल्या, खरं तर हा प्रश्न गुळगुळीत झाला आहे. राज्यात आम्ही २२ जागांवर वडार, होलार, कैकाडी, धनगर, माळी, मराठा समाजाला उमेदवारी दिली. प्रस्थापित पक्ष या वंचितांचा केवळ मतापुरता वापर करतो. मात्र, नेतृत्व द्यायला तयार नाही. तेव्हा डॉ.आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या राजकीय लोकशाहीच्या निर्मितीकरिता काँग्रेस आघाडीने आमच्याविरोधात उमेदवार देऊ नयेत. त्यांनीच ते भाजपची बी टीम नाही हे आता सिद्ध करावे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर