शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यातील पानमळे झाले नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST

‘खईके पान बनारस वाला, खुल जाये बंद अकल का ताला’ या डॉन चित्रपटातील गाण्याने नागवेलींच्या पानांची महती देशभरात पोहोचवली. ...

‘खईके पान बनारस वाला, खुल जाये बंद अकल का ताला’ या डॉन चित्रपटातील गाण्याने नागवेलींच्या पानांची महती देशभरात पोहोचवली. ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’ या बहारदार लावणीने त्यात आणखीच रंगत आणली. मराठी, हिंदी चित्रपटातील गाण्यांतून आणि लावण्यांमधून नागवेलींच्या पानात अक्षरशः गोडवा आणला. पण अगदी पुरातन काळापासून महत्त्व असलेल्या नागवेलींच्या पानाचे मळे आज घडीला सरकार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेवटच्या घटका मोजताहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नागवेलींच्या पानाचे मळे तर अक्षरशः नामशेष झाले आहेत. जिल्ह्यातील संगमनेर, राहाता, श्रीरामपूर तालुक्यात १९९९-२००० सालापर्यंत पानाचे शेकडो पानमळे अस्तित्वात होते. पण वातावरणात बदल झाला. पावसाचे प्रमाण कमी झाले. गारपिटीचा फटका बसू लागला आणि अशा परिस्थितीत सरकार आणि प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आजघडीला एखाद्या गावात क्वचितच एक-दोन पानमळे शिल्लक राहिले आहेत.

.............

नागवेलीच्या पानाचा मळा उभा करण्यासाठी अथक कष्ट घ्यावे लागतात. वेलींची लागवड करण्याआधी उंच वाढणाऱ्या शेवगा झाडाची लागवड करावी लागते. नंतर पानाच्या वेली लावाव्या लागतात. नंतर नागवेल या झाडांवर चढविली जाते. कमी पाण्यात वेली वाढण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर हमखास करावा लागतो. तारेच्या कंपाऊंड बरोबरच पानवेलींना वादळाचा फटका बसू नये म्हणून जाळ्यादेखील लावाव्या लागतात. अगदी पहिले उत्पन्न हातात येईपर्यंत लाखोंचा खर्च होतो.

.,......

पान खाल्ल्याने शरीराला आवश्यक असणारी कॅल्शियम, प्रोटीन्स, खनिजे, कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन सी मिळते. अनेकदा पान खाणे ही वाईट सवय समजली जाते. कारण अनेक लोक व्यसन म्हणून पान खातात. त्यामध्ये शरीराला हानिकारक अशा पदार्थांचा समावेश करण्यात येतो. असे केल्याने पानामधील शरीराला आवश्यक असणारी सर्व तत्त्वे नष्ट होतात. त्यामुळे असे न करता त्यामध्ये शरीराला आवश्यक असणाऱ्या पदार्थांचा समावेश करून पान खाणे फायदेशीर ठरते. पान खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी, दातांमध्ये लागलेली कीड, भूक वाढणे त्याचप्रमाणे पचन क्रियादेखील सुरळीत होण्यास मदत होते.

- डॉ. प्रणय रघुवंशी, सहाय्यक प्राध्यापक, प्रवरा मेडिकल ट्रस्ट.

......................

अहमदनगर जिल्ह्यासाठी २५० डप्पा (पाट्या) नागवेलींची पाने लागतात. तीन हजार पानांचा एक डप्पा असतो. एका डप्प्याची किंमत तीनशे रुपयांपासून ते २५०० रुपयांपर्यत असते. कोरोना लाॅकडाऊनपूर्वी जिल्ह्यात दररोज ५०० ते ६०० डप्पे लागत होते. सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने श्रीरामपूर येथील नागवेलींच्या पानांचा लिलाव बंद आहे.

-बी. डी. थोरात, पानांचे होलसेल विक्रेते, शिर्डी.