शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नगर जिल्ह्यात उसाच्या एफआरपीत यंदा मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 12:44 IST

मागील वर्षाच्या दुष्काळी स्थितीमुळे घटलेल्या साखर उताऱ्याचा फटका यंदाच्या ऊस दराला बसला आहे. त्यामुळे यंदा बहुतांश कारखान्यांचा एफआरपी कमी निघाला आहे. मागील हंगामात टनाला अडीच हजार रुपयांवर दर मिळालेल्या शेतकऱ्यांना यावेळी मोठी झळ सोसावी लागणार आहे.

शिवाजी पवार

श्रीरामपूर : मागील वर्षाच्या दुष्काळी स्थितीमुळे घटलेल्या साखर उताऱ्याचा फटका यंदाच्या ऊस दराला बसला आहे. त्यामुळे यंदा बहुतांश कारखान्यांचा एफआरपी कमी निघाला आहे. मागील हंगामात टनाला अडीच हजार रुपयांवर दर मिळालेल्या शेतकऱ्यांना यावेळी मोठी झळ सोसावी लागणार आहे.

नगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांना त्यांचा एफआरपी निश्चित करून पत्रे पाठवली आहेत. कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला तरी शेतकऱ्यांना उसाचे दर माहिती झाले नव्हते. त्यामुळे एफआरपीबाबत उत्सुकता होती. जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस दराबाबत मौन पाळले होते. त्यामागील कारण याच पत्रात दडले आहे. शेतकरी व सभासदांची नाराजी नको म्हणून कोणीही दर जाहीर करण्याचे धाडस दाखविले नाही. पूर्वी अनेक कारखाने हंगामाच्या प्रारंभी दर जाहीर करून उसाची पळवापळवी करीत होते.

चालू गाळप हंगामात सर्वच कारखान्यांकडे मुबलक व किंबहुना वाढीव ऊस आहे. त्यामुळे वाढीव दराच्या स्पर्धेपासून कारखानदार दूर राहिले. मागील हंगामात दुष्काळी स्थितीमुळे कारखान्यांनी पंढरपूर, नंदूरबार, धुळे जिल्ह्यांतून ऊस मिळवला. त्यामुळे तोडणी व वाहतूक खर्च ७०० ते ८०० रुपयांवर गेले. त्याचाही भुर्दंड आता शेतकऱ्यांना कमी दराच्या रूपात बसला आहे.

यावर्षी श्रीगोंदा येथील नागवडे सहकारी साखर कारखान्याचा एफआरपी (२ हजार ६६१) सर्वाधिक ठरला आहे. त्या खालोखाल तनपुरे (२ हजार ५७५) व अंबालिका (२ हजार ५१३) कारखान्यांचा दर निघाला आहे. वृद्धेश्वर व युटेकचे दर २ हजार रुपयांखाली आहेत.

असा ठरतो ऊस दर

केंद्र सरकारने १० टक्के साखर उताऱ्याला दोन हजार ८५० रुपये दर जाहीर केला आहे. त्यापुढील प्रत्येक टक्क्यावर २८६ रुपये दर मिळतो. मात्र, त्यातून ऊसतोडणी व वाहतूक खर्च वजा केला जातो.

का घटला उतारा

मागील हंगामात दुष्काळी स्थितीमुळे कारखान्यांनी राज्यभरातून मिळेल तसा ऊस उपलब्ध केला. त्यामुळे कुठूनही गुणवत्तापूर्ण ऊस मिळाला नाही. कार्यक्षेत्रातसुद्धा उसाला पाण्याची कमतरता भासली. त्यामुळे साखर उतारा घटला.

कारखाने व त्यांचा एफआरपी -

अगस्ती : २,४५५, अशोक : २,१८८, ज्ञानेश्वर : २,०७४, कुकडी : २,४९५, प्रसाद शुगर : २,०९५, प्रवरा : २,२१९, गणेश : २,२२९, नागवडे : २,६६१, तनपुरे : २,५७५, कोपरगाव : २,३५५, संगमनेर : २,२४५, संजीवनी : २,०४५, केदारेश्वर : २,०५७, साईजन : २,३०५, गंगामाई : २,०३६.

एफआरपी अंतिम दर नाही

एफआरपी हा उसाचा अंतिम दर नाही. सी. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार कारखान्याच्या महसुली उत्पन्नावर आधारित दर देणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार साखर व उपपदार्थांच्या एकूण उत्पन्नातील ७५ टक्के पैसे शेतकऱ्यांना द्यावे लागतात. तोच अंतिम भाव ठरतो.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी