शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात उसाच्या एफआरपीत यंदा मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 12:44 IST

मागील वर्षाच्या दुष्काळी स्थितीमुळे घटलेल्या साखर उताऱ्याचा फटका यंदाच्या ऊस दराला बसला आहे. त्यामुळे यंदा बहुतांश कारखान्यांचा एफआरपी कमी निघाला आहे. मागील हंगामात टनाला अडीच हजार रुपयांवर दर मिळालेल्या शेतकऱ्यांना यावेळी मोठी झळ सोसावी लागणार आहे.

शिवाजी पवार

श्रीरामपूर : मागील वर्षाच्या दुष्काळी स्थितीमुळे घटलेल्या साखर उताऱ्याचा फटका यंदाच्या ऊस दराला बसला आहे. त्यामुळे यंदा बहुतांश कारखान्यांचा एफआरपी कमी निघाला आहे. मागील हंगामात टनाला अडीच हजार रुपयांवर दर मिळालेल्या शेतकऱ्यांना यावेळी मोठी झळ सोसावी लागणार आहे.

नगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांना त्यांचा एफआरपी निश्चित करून पत्रे पाठवली आहेत. कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला तरी शेतकऱ्यांना उसाचे दर माहिती झाले नव्हते. त्यामुळे एफआरपीबाबत उत्सुकता होती. जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस दराबाबत मौन पाळले होते. त्यामागील कारण याच पत्रात दडले आहे. शेतकरी व सभासदांची नाराजी नको म्हणून कोणीही दर जाहीर करण्याचे धाडस दाखविले नाही. पूर्वी अनेक कारखाने हंगामाच्या प्रारंभी दर जाहीर करून उसाची पळवापळवी करीत होते.

चालू गाळप हंगामात सर्वच कारखान्यांकडे मुबलक व किंबहुना वाढीव ऊस आहे. त्यामुळे वाढीव दराच्या स्पर्धेपासून कारखानदार दूर राहिले. मागील हंगामात दुष्काळी स्थितीमुळे कारखान्यांनी पंढरपूर, नंदूरबार, धुळे जिल्ह्यांतून ऊस मिळवला. त्यामुळे तोडणी व वाहतूक खर्च ७०० ते ८०० रुपयांवर गेले. त्याचाही भुर्दंड आता शेतकऱ्यांना कमी दराच्या रूपात बसला आहे.

यावर्षी श्रीगोंदा येथील नागवडे सहकारी साखर कारखान्याचा एफआरपी (२ हजार ६६१) सर्वाधिक ठरला आहे. त्या खालोखाल तनपुरे (२ हजार ५७५) व अंबालिका (२ हजार ५१३) कारखान्यांचा दर निघाला आहे. वृद्धेश्वर व युटेकचे दर २ हजार रुपयांखाली आहेत.

असा ठरतो ऊस दर

केंद्र सरकारने १० टक्के साखर उताऱ्याला दोन हजार ८५० रुपये दर जाहीर केला आहे. त्यापुढील प्रत्येक टक्क्यावर २८६ रुपये दर मिळतो. मात्र, त्यातून ऊसतोडणी व वाहतूक खर्च वजा केला जातो.

का घटला उतारा

मागील हंगामात दुष्काळी स्थितीमुळे कारखान्यांनी राज्यभरातून मिळेल तसा ऊस उपलब्ध केला. त्यामुळे कुठूनही गुणवत्तापूर्ण ऊस मिळाला नाही. कार्यक्षेत्रातसुद्धा उसाला पाण्याची कमतरता भासली. त्यामुळे साखर उतारा घटला.

कारखाने व त्यांचा एफआरपी -

अगस्ती : २,४५५, अशोक : २,१८८, ज्ञानेश्वर : २,०७४, कुकडी : २,४९५, प्रसाद शुगर : २,०९५, प्रवरा : २,२१९, गणेश : २,२२९, नागवडे : २,६६१, तनपुरे : २,५७५, कोपरगाव : २,३५५, संगमनेर : २,२४५, संजीवनी : २,०४५, केदारेश्वर : २,०५७, साईजन : २,३०५, गंगामाई : २,०३६.

एफआरपी अंतिम दर नाही

एफआरपी हा उसाचा अंतिम दर नाही. सी. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार कारखान्याच्या महसुली उत्पन्नावर आधारित दर देणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार साखर व उपपदार्थांच्या एकूण उत्पन्नातील ७५ टक्के पैसे शेतकऱ्यांना द्यावे लागतात. तोच अंतिम भाव ठरतो.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी