शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

कोयता हाच देव... उसाचे थळ हेच मंदिर; ऊस तोडणी मजुरांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 12:03 IST

लेकरांचे भविष्य घडविण्यासाठी मुकादमाकडून उचल घेऊन वर्षातील सहा महिने कारखान्यावर ऊस तोडायला यावे लागते. अशी भावना ऊस तोडणी मजुरांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे व्यक्त केली. कोयता हाच देव, उसाचे थळ हेच मंदिर अन् सपासप ऊस तोडणी करणे हीच पूजा या भावनेतून आम्ही काम करतो, असेही त्यांनी सांगितले.

अनिल साठे । शेवगाव : गावाकडे सततचा दुष्काळ पाठीला पूजलेला, पाण्याअभावी रानं पडीक पडले आहेत, हाताला काम नाही. लेकरांचे भविष्य घडविण्यासाठी मुकादमाकडून उचल घेऊन वर्षातील सहा महिने कारखान्यावर ऊस तोडायला यावे लागते. अशी भावना ऊस तोडणी मजुरांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे व्यक्त केली. कोयता हाच देव, उसाचे थळ हेच मंदिर अन् सपासप ऊस तोडणी करणे हीच पूजा या भावनेतून आम्ही काम करतो, असेही त्यांनी सांगितले.‘लोकमत’ प्रतिनिधीने गंगामाई (ता. शेवगाव) साखर कारखान्याच्या एका सात कोयत्याच्या टोळीत ऊस तोडणी मजुरांच्या सानिध्यात दोन दिवस राहुन त्यांचे काम अनुभवले. मजूर हे चिंचपूर (ता. पाथर्डी) येथील होते. त्यांच्यासोबत काम करून त्यांच्या व्यथा, अडचणी जाणून घेतल्या. वीज, पाणी, स्वच्छता गृह, किराणा, पंक्चर दुकान, हॉटेल, कटाई, पिठाची गिरणी आदी सुविधा कारखाना परिसरात होत्या. मात्र आरोग्य, प्राथमिक उपचार, जनावरांचा डॉक्टर, साखर शाळा आदी सुविधांचा अभाव दिसला. वाहनांची रहदारी असलेल्या रस्त्यावर पुरेशी वीज व्यवस्था होती. मात्र कामगारांच्या कोप्या भोवताली अंधारच होता.ऊस तोडणी मजुरांचा दिवस मध्य प्रहरी एकच्या सुमारास होतो. महिला उठून न्याहारीसाठी सायंकाळी केलेली भाकरी, भाजी कापडी फडक्यात बांधून घेतात. सोबत पिण्यासाठी पाणी दुधाच्या कॅनमधे घेतले जाते  अन् सुरू होतो उसाच्या फडाकडे प्रवास. मुकादम विष्णू दशरथ बडे यांच्यासह टोळीतील त्यांचे सहकारी बुवासाहेब बडे, अशोक त्रिंबक बडे, गणेश आजीनाथ बडे, संजय होडशीळ, शाहीराम महादेव बडे, मारुती अर्जुन कावळे हे पत्नीसह कारखान्यापासून रात्री १ वाजून ३६ मिनिटांनी घोटण, खुंटेफळमार्गे दादेगावकडे बैलगाड्यांचा ताफा घेऊन निघाले. पहाटे ४ वाजता उसाच्या फडावर पोहोचले. तेथे बैलांना वाढे टाकून सर्वांनी कोयत्याने सापसप ऊस तोडायला सुरवात केली. प्रत्येक जोडप्याने सºया वाटून घेतल्या होत्या. सकाळी सूर्य उगवल्यावर सातच्या सुमारास ऊस तोडायचे थांबवले. महिलांनी उसापासून वेगळे केलेले वाढे गोळा करत पेंढ्या बांधण्यास सुरवात केली. पुरुषांनी ऊस बांधत बैल गाडीत टाकण्यास सुरवात केली. मध्ये पाच मिनिटाचा ब्रेक घेत सोबत आणलेले बिस्किट पाण्याबरोबर खाल्ले व पुन्हा काम सुरू केले. पुरुष मंडळींइतकीच मेहनत महिलाही घेत होत्या.दहाच्या सुमारास गाडीत भरलेला ऊस दोरीच्या सहाय्याने बांधत बैलांना जुंपले. पुन्हा कारखान्याकडे परतीचा प्रवास सुरू झाला. प्रवासात न्याहारी करत दुपारी साडेबाराच्या सुमारास कारखान्याच्या वजन काट्यावर गाड्या पोहोचल्या. जवळपास सगळ्यांनी दोन टन ऊस गव्हाणीत टाकला होता. ९०० ते १००० रूपयांची कमाई झाली होती. ती कमाई दोघांची नव्हती तर चौघांची होती. दोन टनापेक्षा जास्त ओझे बैलांच्या मानगुटीवर होते. त्यांचीही मेहनत त्यात होती. बारा तासात प्रत्येकाने २०० ते २५० रूपये कमावले होते. कोपीमध्ये परतल्यावर बैलाच्या पाठीवर थाप टाकून प्रत्येकाने त्यांना पेंड खायला दिली.बैलगाडीचे कार्यक्षेत्र १७ किलोमीटरचे...कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील १७ किमीपर्यंतच ऊस टायर बैल गाडीला आणता येतो. ऊस तोडणे आणि भरणे यासाठी १२ किलोमीटरला प्रतिटन ४४०.४ रूपये मिळतात. वाढीव प्रत्येक किलोमीटर मागे १२ रूपये जास्त मिळतात. ट्रॅक्टर, जिटी, ट्रक वरील टोळ्यांना वेगळा दर मिळतो. ऊस तोडणे व भरणे यासाठी ट्रॅक्टर टोळीला प्रतिटन २६७ रूपये मिळतात. ऊस खाली करण्यासाठी प्रत्येकाच्या वेगळ्या रांगा व नंबर दिला जातो.कोणत्याच योजनेबद्दल माहिती नाहीऊस तोडणी मजुरांच्या योजनांबद्दल किंचितही कल्पना त्यांना नव्हती. केवळ ऊस तोडायचा, किती वजन भरले अन् किती रूपये मिळाले इतकेच त्यांच्या रोजच्या जगण्यातील गणित आहे. कष्ट करतांना मोलाची साथ देणाºया बैलाच्या जोडीची प्रचंड काळजी त्यांच्यात दिसली.घेतलेली उचल फे डायची कशी?बहुतांश मजूर जोडप्यांनी मुलांना घरी आई, वडिलांच्या जवळ ठेवलेले होते. काहींनी वसतिगृहामध्ये ठेवले होते. उसाच्या कमतरतेमुळे गळीत हंगाम यंदा लवकर उरकणार याची चिंता सतावत होती. मुकादमाकडून घेतलेली उचल फेडायची तरी कशी अन् पट्टा पडल्यावर घरी जाऊन करायचे तरी काय? महिनाभरानंतर दुसरे काम शोधावे लागणार या काळजीत मजूर दिसत होते. लोकमत प्रतिनिधी २७ तास उसाच्या थळात‘लोकमत’ प्रतिनिधी अनिल साठे हे गंगामाई (ता. शेवगाव) साखर कारखान्याच्या एका सात कोयत्याच्या टोळीत ऊस तोडणी मजुरांच्या सानिध्यात तब्बल २७ तास राहिले. त्यांच्यासोबत राहुन मजुरांचे काम अनुभवले. चिंचपूर (ता. पाथर्डी) येथील मजूर त्यांच्यासोबत होते. त्यांच्यासोबत काम करून, त्यांच्यासोबत भाजी-भाकरी खात त्यांच्या व्यथा, अडचणी जाणून घेतल्या. अंधार, रात्रीची थंडी मजुरांसोबत अनुभवत त्यांचे जीवन किती खडतर आहे, प्रत्यक्ष अनुभवले. त्यांच्या या आपुलकीचे मजुरांनीही कौतुक केले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेShevgaonशेवगावLabourकामगार