शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोयता हाच देव... उसाचे थळ हेच मंदिर; ऊस तोडणी मजुरांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 12:03 IST

लेकरांचे भविष्य घडविण्यासाठी मुकादमाकडून उचल घेऊन वर्षातील सहा महिने कारखान्यावर ऊस तोडायला यावे लागते. अशी भावना ऊस तोडणी मजुरांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे व्यक्त केली. कोयता हाच देव, उसाचे थळ हेच मंदिर अन् सपासप ऊस तोडणी करणे हीच पूजा या भावनेतून आम्ही काम करतो, असेही त्यांनी सांगितले.

अनिल साठे । शेवगाव : गावाकडे सततचा दुष्काळ पाठीला पूजलेला, पाण्याअभावी रानं पडीक पडले आहेत, हाताला काम नाही. लेकरांचे भविष्य घडविण्यासाठी मुकादमाकडून उचल घेऊन वर्षातील सहा महिने कारखान्यावर ऊस तोडायला यावे लागते. अशी भावना ऊस तोडणी मजुरांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे व्यक्त केली. कोयता हाच देव, उसाचे थळ हेच मंदिर अन् सपासप ऊस तोडणी करणे हीच पूजा या भावनेतून आम्ही काम करतो, असेही त्यांनी सांगितले.‘लोकमत’ प्रतिनिधीने गंगामाई (ता. शेवगाव) साखर कारखान्याच्या एका सात कोयत्याच्या टोळीत ऊस तोडणी मजुरांच्या सानिध्यात दोन दिवस राहुन त्यांचे काम अनुभवले. मजूर हे चिंचपूर (ता. पाथर्डी) येथील होते. त्यांच्यासोबत काम करून त्यांच्या व्यथा, अडचणी जाणून घेतल्या. वीज, पाणी, स्वच्छता गृह, किराणा, पंक्चर दुकान, हॉटेल, कटाई, पिठाची गिरणी आदी सुविधा कारखाना परिसरात होत्या. मात्र आरोग्य, प्राथमिक उपचार, जनावरांचा डॉक्टर, साखर शाळा आदी सुविधांचा अभाव दिसला. वाहनांची रहदारी असलेल्या रस्त्यावर पुरेशी वीज व्यवस्था होती. मात्र कामगारांच्या कोप्या भोवताली अंधारच होता.ऊस तोडणी मजुरांचा दिवस मध्य प्रहरी एकच्या सुमारास होतो. महिला उठून न्याहारीसाठी सायंकाळी केलेली भाकरी, भाजी कापडी फडक्यात बांधून घेतात. सोबत पिण्यासाठी पाणी दुधाच्या कॅनमधे घेतले जाते  अन् सुरू होतो उसाच्या फडाकडे प्रवास. मुकादम विष्णू दशरथ बडे यांच्यासह टोळीतील त्यांचे सहकारी बुवासाहेब बडे, अशोक त्रिंबक बडे, गणेश आजीनाथ बडे, संजय होडशीळ, शाहीराम महादेव बडे, मारुती अर्जुन कावळे हे पत्नीसह कारखान्यापासून रात्री १ वाजून ३६ मिनिटांनी घोटण, खुंटेफळमार्गे दादेगावकडे बैलगाड्यांचा ताफा घेऊन निघाले. पहाटे ४ वाजता उसाच्या फडावर पोहोचले. तेथे बैलांना वाढे टाकून सर्वांनी कोयत्याने सापसप ऊस तोडायला सुरवात केली. प्रत्येक जोडप्याने सºया वाटून घेतल्या होत्या. सकाळी सूर्य उगवल्यावर सातच्या सुमारास ऊस तोडायचे थांबवले. महिलांनी उसापासून वेगळे केलेले वाढे गोळा करत पेंढ्या बांधण्यास सुरवात केली. पुरुषांनी ऊस बांधत बैल गाडीत टाकण्यास सुरवात केली. मध्ये पाच मिनिटाचा ब्रेक घेत सोबत आणलेले बिस्किट पाण्याबरोबर खाल्ले व पुन्हा काम सुरू केले. पुरुष मंडळींइतकीच मेहनत महिलाही घेत होत्या.दहाच्या सुमारास गाडीत भरलेला ऊस दोरीच्या सहाय्याने बांधत बैलांना जुंपले. पुन्हा कारखान्याकडे परतीचा प्रवास सुरू झाला. प्रवासात न्याहारी करत दुपारी साडेबाराच्या सुमारास कारखान्याच्या वजन काट्यावर गाड्या पोहोचल्या. जवळपास सगळ्यांनी दोन टन ऊस गव्हाणीत टाकला होता. ९०० ते १००० रूपयांची कमाई झाली होती. ती कमाई दोघांची नव्हती तर चौघांची होती. दोन टनापेक्षा जास्त ओझे बैलांच्या मानगुटीवर होते. त्यांचीही मेहनत त्यात होती. बारा तासात प्रत्येकाने २०० ते २५० रूपये कमावले होते. कोपीमध्ये परतल्यावर बैलाच्या पाठीवर थाप टाकून प्रत्येकाने त्यांना पेंड खायला दिली.बैलगाडीचे कार्यक्षेत्र १७ किलोमीटरचे...कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील १७ किमीपर्यंतच ऊस टायर बैल गाडीला आणता येतो. ऊस तोडणे आणि भरणे यासाठी १२ किलोमीटरला प्रतिटन ४४०.४ रूपये मिळतात. वाढीव प्रत्येक किलोमीटर मागे १२ रूपये जास्त मिळतात. ट्रॅक्टर, जिटी, ट्रक वरील टोळ्यांना वेगळा दर मिळतो. ऊस तोडणे व भरणे यासाठी ट्रॅक्टर टोळीला प्रतिटन २६७ रूपये मिळतात. ऊस खाली करण्यासाठी प्रत्येकाच्या वेगळ्या रांगा व नंबर दिला जातो.कोणत्याच योजनेबद्दल माहिती नाहीऊस तोडणी मजुरांच्या योजनांबद्दल किंचितही कल्पना त्यांना नव्हती. केवळ ऊस तोडायचा, किती वजन भरले अन् किती रूपये मिळाले इतकेच त्यांच्या रोजच्या जगण्यातील गणित आहे. कष्ट करतांना मोलाची साथ देणाºया बैलाच्या जोडीची प्रचंड काळजी त्यांच्यात दिसली.घेतलेली उचल फे डायची कशी?बहुतांश मजूर जोडप्यांनी मुलांना घरी आई, वडिलांच्या जवळ ठेवलेले होते. काहींनी वसतिगृहामध्ये ठेवले होते. उसाच्या कमतरतेमुळे गळीत हंगाम यंदा लवकर उरकणार याची चिंता सतावत होती. मुकादमाकडून घेतलेली उचल फेडायची तरी कशी अन् पट्टा पडल्यावर घरी जाऊन करायचे तरी काय? महिनाभरानंतर दुसरे काम शोधावे लागणार या काळजीत मजूर दिसत होते. लोकमत प्रतिनिधी २७ तास उसाच्या थळात‘लोकमत’ प्रतिनिधी अनिल साठे हे गंगामाई (ता. शेवगाव) साखर कारखान्याच्या एका सात कोयत्याच्या टोळीत ऊस तोडणी मजुरांच्या सानिध्यात तब्बल २७ तास राहिले. त्यांच्यासोबत राहुन मजुरांचे काम अनुभवले. चिंचपूर (ता. पाथर्डी) येथील मजूर त्यांच्यासोबत होते. त्यांच्यासोबत काम करून, त्यांच्यासोबत भाजी-भाकरी खात त्यांच्या व्यथा, अडचणी जाणून घेतल्या. अंधार, रात्रीची थंडी मजुरांसोबत अनुभवत त्यांचे जीवन किती खडतर आहे, प्रत्यक्ष अनुभवले. त्यांच्या या आपुलकीचे मजुरांनीही कौतुक केले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेShevgaonशेवगावLabourकामगार