तीन शाळकरी मुलांचे अपहरण
By Admin | Updated: March 13, 2016 14:14 IST2016-03-13T14:08:23+5:302016-03-13T14:14:35+5:30
अहमदनगर : एका खासगी क्लासला जाणाऱ्या तीन शाळकरी मुलांचे शुक्रवारी दुपारी एक वाजता नगर शहरातील महाजन गल्लीतून अपहरण झाले.

तीन शाळकरी मुलांचे अपहरण
अहमदनगर : एका खासगी क्लासला जाणाऱ्या तीन शाळकरी मुलांचे शुक्रवारी दुपारी एक वाजता नगर शहरातील महाजन गल्लीतून अपहरण झाले.
तेजस संभाजी निमसे (वय १४, रा. मांडवे, ता. नगर), अभिषेक चंद्रकांत म्याना (वय १४, रा. भराडगल्ली, तोफखाना), विशाल रवींद्र जाधव (वय १४, रा. पानसरे गल्ली, अर्बन बँक चौक) असे अपहरण झालेल्या मुलांची नावे आहेत. शुक्रवारी दुपारी ही मुले हरवल्याची तक्रार तेजसचे वडील संभाजी निमसे यांनी कोतवाली पोलिसांत दिली. पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. मुले हरवली की त्यांचे अपहरण झाले, याचा पोलीस शोध घेत आहेत. तेजस हा शाळेसाठी मांडवे येथून बसने येतो़ अन्य दोघे नगरचे आहेत. तिघेही खासगी क्लासला पायी जात असताना त्यांचे अपहरण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर, सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी शहरात शोधमोहीम हाती घेतली, मात्र शोध लागला नाही़
रेल्वेने गेले फिरायला
तिन्ही मुले १४ वर्षांची असल्याने अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही मुलांकडे प्रवास करण्याइतपत पैसे होते. ही मुले रेल्वेत बसून कुठेतरी फिरायला गेली आहेत. नगर-मनमाड, नगर-पुणे, नगर-सोलापूर मार्गावरील रेल्वे जंक्शनवर मुलांचा शोध घेतला. मात्र नक्की कोणत्या रेल्वेत बसून गेली, याचा शोध लागलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.