शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

‘राहिलेल्यां’ना मिळणार खरीप अनुदान; ४२ कोटी प्रशासनाला प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 18:58 IST

काही कारणास्तव अनुदान न मिळालेल्या शेतकºयांना आता शासनाने अनुदान मंजूर केले असून त्यापोटी जिल्हा प्रशासनाकडे ४२ कोटी ९० लाख रूपये प्राप्त झाले आहेत. 

अहमदनगर : मागील वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानीसाठी बाधित शेतक-यांना आतापर्यंत सुमारे ४०० कोटींचे वाटप झालेले आहे. मात्र यातून काही कारणास्तव अनुदान न मिळालेल्या शेतकºयांना आता शासनाने अनुदान मंजूर केले असून त्यापोटी जिल्हा प्रशासनाकडे ४२ कोटी ९० लाख रूपये प्राप्त झाले आहेत. अल्प पावसामुळे मागील वर्षीचा खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे दुष्काळाने बाधित झालेल्या शेतकºयांना मदत करण्यासाठी नगर जिल्ह्यात शासनाकडून दोन टप्प्यात ४७२ कोटी रूपये प्राप्त झाले होते. दोन टप्प्यात हे अनुदान जिल्हा प्रशासनाने संबंधित तहसीलदारांकडे वर्ग केले. सर्व तहसीलदारांनी ३१ मार्च २०१८ अखेर सुमारे ४०० कोटी रूपये शेतक-यांच्या खात्यावर जमा केले. परंतु यातील काही शेतक-यांना तांत्रिक कारणामुळे अनुदान मिळू शकले नाही. यात काही शेतक-यांची बँक खातीच नव्हती, तर काही शेतकºयांची खाती जुळत नव्हती. पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांतील बरेचशे शेतकरी ऊस तोडणीसाठी परजिल्ह्यात गेल्याने त्यांचे अनुदान वाटप होऊ शकले नाही. परिणामी मार्चअखेर जिल्हा प्रशासनाला ७२ कोटी रूपये शासनाकडे समर्पित करावे लागले. त्यानंतर प्रशासनाने वंचित राहिलेल्या शेतक-यांची माहिती पुन्हा गोळा करून त्यांच्यासाठी ४२ कोटी ९० लाख ७९ हजार रूपये अनुदानाची मागणी शासनाकडे फेब्रुवारी २०१९ मध्ये केली होती. ती रक्कम आता प्राप्त झाली आहे. यात पारनेर, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, नेवासा, संगमनेर या सहा तालुक्यांतील शेतक-यांचा समावेश आहे. यात सर्वाधिक १६ कोटी ५३ लाख अनुदान पारनेर, तर १४ कोटी ७८ लाख रूपये पाथर्डी तालुक्यासाठी आले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीAhmednagarअहमदनगर