शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

‘राहिलेल्यां’ना मिळणार खरीप अनुदान; ४२ कोटी प्रशासनाला प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 18:58 IST

काही कारणास्तव अनुदान न मिळालेल्या शेतकºयांना आता शासनाने अनुदान मंजूर केले असून त्यापोटी जिल्हा प्रशासनाकडे ४२ कोटी ९० लाख रूपये प्राप्त झाले आहेत. 

अहमदनगर : मागील वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानीसाठी बाधित शेतक-यांना आतापर्यंत सुमारे ४०० कोटींचे वाटप झालेले आहे. मात्र यातून काही कारणास्तव अनुदान न मिळालेल्या शेतकºयांना आता शासनाने अनुदान मंजूर केले असून त्यापोटी जिल्हा प्रशासनाकडे ४२ कोटी ९० लाख रूपये प्राप्त झाले आहेत. अल्प पावसामुळे मागील वर्षीचा खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे दुष्काळाने बाधित झालेल्या शेतकºयांना मदत करण्यासाठी नगर जिल्ह्यात शासनाकडून दोन टप्प्यात ४७२ कोटी रूपये प्राप्त झाले होते. दोन टप्प्यात हे अनुदान जिल्हा प्रशासनाने संबंधित तहसीलदारांकडे वर्ग केले. सर्व तहसीलदारांनी ३१ मार्च २०१८ अखेर सुमारे ४०० कोटी रूपये शेतक-यांच्या खात्यावर जमा केले. परंतु यातील काही शेतक-यांना तांत्रिक कारणामुळे अनुदान मिळू शकले नाही. यात काही शेतक-यांची बँक खातीच नव्हती, तर काही शेतकºयांची खाती जुळत नव्हती. पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांतील बरेचशे शेतकरी ऊस तोडणीसाठी परजिल्ह्यात गेल्याने त्यांचे अनुदान वाटप होऊ शकले नाही. परिणामी मार्चअखेर जिल्हा प्रशासनाला ७२ कोटी रूपये शासनाकडे समर्पित करावे लागले. त्यानंतर प्रशासनाने वंचित राहिलेल्या शेतक-यांची माहिती पुन्हा गोळा करून त्यांच्यासाठी ४२ कोटी ९० लाख ७९ हजार रूपये अनुदानाची मागणी शासनाकडे फेब्रुवारी २०१९ मध्ये केली होती. ती रक्कम आता प्राप्त झाली आहे. यात पारनेर, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, नेवासा, संगमनेर या सहा तालुक्यांतील शेतक-यांचा समावेश आहे. यात सर्वाधिक १६ कोटी ५३ लाख अनुदान पारनेर, तर १४ कोटी ७८ लाख रूपये पाथर्डी तालुक्यासाठी आले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीAhmednagarअहमदनगर