शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

करंजी-मिरी-तिसगाव पाणी योजना कुचकामी; ऐन दिवाळीत २७ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:41 IST

पाथर्डी तालुक्यातील करंजीसह अनेक गावातील पाणी पुरवठा करणा-या विहिरींना पाणी अजूनही पाणी आले नाही. तसेच २७ गावांना पाणी पुरवठा करणारी करंजी -मिरी -तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनाच कुचकामी ठरत आहे. ऐन दिवाळीच्या सणाला करंजीसह अनेक गावाना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. 

अशोक मोरे । करंजी : पाथर्डी तालुक्यातील करंजीसह अनेक गावातील पाणी पुरवठा करणा-या विहिरींना पाणी अजूनही पाणी आले नाही. तसेच २७ गावांना पाणी पुरवठा करणारी करंजी -मिरी -तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनाच कुचकामी ठरत आहे. ऐन दिवाळीच्या सणाला करंजीसह अनेक गावाना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.   पावसाळ्याचे तीन महिने गेले तरी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजी, भोसे, लोहसर, दगडवाडीसह अनेक गावात जोरदार पाऊस झाला नव्हता. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात या भागात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे या गावांना पाणी पुरवठा करणा-या विहिरींना अद्यापही पाणी वाढले नाही. या भागातील २७ गावांना पाणी पुरवठा करणारी करंजी- मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरत आहे. या योजनेव्दारे एक-एक महिना पाणी पुरवठा होत नसल्याने ऐन दिवाळीच्या सणात या गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागाला पाणी पुरवठा करणा-या या संस्थेची चौकशी करुन ही संस्था बरखास्त करून योजना शासनाकडे हस्तांतरीत करावी, अशी मागणी होत आहे. पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजी, मिरी, तिसगाव परिसरातील गावात नेहमीच पाणी टंचाई जाणवत असते. यामुळे या भागातील २७ गावांना मुळा धरणातून पाणी आणून पांढरी पुलावरील टाकीत पाणी सोडण्यात येते. तेथून या गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतू नियोजनाच्या अभावामुळे या योजनेला १-१ महिना पाणी येत नाही. पाणी येत नसल्याने  मागील आठवड्यात टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. संस्था बरखास्त करण्याची मागणीपिण्याच्या पाण्याची योजना असूनही ऐन दिवाळीच्या सणाला करंजीसह अनेक गावांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागाला पाणी पुरवठा करणा-या संस्थेची चौकशी करून संस्था बरखास्त करावी, अशी मागणी प्रकाश शेलार, संदीप अकोलकर, मच्छिंद्र अकोलकर, राजेंद्र मरकड, राजेंद्र अकोलकर, बाबा मोरे, अशोक टेमकरसह अनेक कार्यकर्त्यांनी केली आहे.विद्युत मोटारी जळाल्या करंजी-मिरी-तिसगाव पाणी पुरवठा करणा-या योजनेच्या विद्युत मोटारी जळाल्या होत्या. आता त्या दुरुस्त करण्यात आल्या असून योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे  प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे सचिव भाऊसाहेब सावंत यांनी सांगितले.    दिवाळीत करंजीत पाणी टंचाई करंजी-मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना एक महिन्यापासून बंद आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर करंजी परिसरातील अनेक गावात पाण्याची टंचाई निर्माण आहे. पाणी योजनेचे नियोजन कोलमडले आहे. यामुळे ही संस्था बरखास्त करावी, असे ग्रामस्थ प्रकाश शेलार यांनी सांगितले.      

टॅग्स :WaterपाणीAhmednagarअहमदनगर