शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

करंजी-मिरी-तिसगाव पाणी योजना कुचकामी; ऐन दिवाळीत २७ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:41 IST

पाथर्डी तालुक्यातील करंजीसह अनेक गावातील पाणी पुरवठा करणा-या विहिरींना पाणी अजूनही पाणी आले नाही. तसेच २७ गावांना पाणी पुरवठा करणारी करंजी -मिरी -तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनाच कुचकामी ठरत आहे. ऐन दिवाळीच्या सणाला करंजीसह अनेक गावाना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. 

अशोक मोरे । करंजी : पाथर्डी तालुक्यातील करंजीसह अनेक गावातील पाणी पुरवठा करणा-या विहिरींना पाणी अजूनही पाणी आले नाही. तसेच २७ गावांना पाणी पुरवठा करणारी करंजी -मिरी -तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनाच कुचकामी ठरत आहे. ऐन दिवाळीच्या सणाला करंजीसह अनेक गावाना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.   पावसाळ्याचे तीन महिने गेले तरी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजी, भोसे, लोहसर, दगडवाडीसह अनेक गावात जोरदार पाऊस झाला नव्हता. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात या भागात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे या गावांना पाणी पुरवठा करणा-या विहिरींना अद्यापही पाणी वाढले नाही. या भागातील २७ गावांना पाणी पुरवठा करणारी करंजी- मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरत आहे. या योजनेव्दारे एक-एक महिना पाणी पुरवठा होत नसल्याने ऐन दिवाळीच्या सणात या गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागाला पाणी पुरवठा करणा-या या संस्थेची चौकशी करुन ही संस्था बरखास्त करून योजना शासनाकडे हस्तांतरीत करावी, अशी मागणी होत आहे. पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजी, मिरी, तिसगाव परिसरातील गावात नेहमीच पाणी टंचाई जाणवत असते. यामुळे या भागातील २७ गावांना मुळा धरणातून पाणी आणून पांढरी पुलावरील टाकीत पाणी सोडण्यात येते. तेथून या गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतू नियोजनाच्या अभावामुळे या योजनेला १-१ महिना पाणी येत नाही. पाणी येत नसल्याने  मागील आठवड्यात टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. संस्था बरखास्त करण्याची मागणीपिण्याच्या पाण्याची योजना असूनही ऐन दिवाळीच्या सणाला करंजीसह अनेक गावांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागाला पाणी पुरवठा करणा-या संस्थेची चौकशी करून संस्था बरखास्त करावी, अशी मागणी प्रकाश शेलार, संदीप अकोलकर, मच्छिंद्र अकोलकर, राजेंद्र मरकड, राजेंद्र अकोलकर, बाबा मोरे, अशोक टेमकरसह अनेक कार्यकर्त्यांनी केली आहे.विद्युत मोटारी जळाल्या करंजी-मिरी-तिसगाव पाणी पुरवठा करणा-या योजनेच्या विद्युत मोटारी जळाल्या होत्या. आता त्या दुरुस्त करण्यात आल्या असून योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे  प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे सचिव भाऊसाहेब सावंत यांनी सांगितले.    दिवाळीत करंजीत पाणी टंचाई करंजी-मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना एक महिन्यापासून बंद आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर करंजी परिसरातील अनेक गावात पाण्याची टंचाई निर्माण आहे. पाणी योजनेचे नियोजन कोलमडले आहे. यामुळे ही संस्था बरखास्त करावी, असे ग्रामस्थ प्रकाश शेलार यांनी सांगितले.      

टॅग्स :WaterपाणीAhmednagarअहमदनगर