अहमदनगर : राष्ट्रीय कृषी विमा योजना खरीप हंगाम २०१४-१५ साठी राबविण्याचे धोरण राज्य सरकारने घेतले आहे. या योजनेत जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर यांनी केले.या विमा योजनेत बाजरी, सोयाबीन, मूग, कापूस, भात, तूर, उडिद, भुईमूग व कांदा या पिकांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाल्यास त्यांना या विमा योजनेचा फायदा मिळणार आहे.अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना योजनेतील सर्व पिकांसाठी दहा टक्के अनुदान देण्यात येणार आहे. योजनेत जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी ३१ जुलै पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरण्यासाठी बँकेशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)तालुकानिहाय पीक विमाअकोले : बाजरी, भुईमूग आणि भात.संगमनेर : सोयाबीन, मूग, तूर,भुईमूग, कापूस, कांदा.कोपरगाव : बाजरी, तूर, सोयाबीन, कापूस, कांदा.राहाता : बाजरी, तूर, भुईमूग, सोयाबीन, कापूस, कांदा.राहुरी : बाजरी, तूर, भुईमूग, सोयाबीन, कापूस, कांदा.नेवासा : बाजरी, तूर, भुईमूग, कापूस, कांदा.श्रीरामपूर : बाजरी, सोयाबीन, तूर, भुईमूग, कांदानगर : बाजरी, तूर, मूग, भुईमूग, कांदा.शेवगाव : कापूस, भुईमूग, मूग, बाजरी.पाथर्डी : कापूस, कांदा, भुईमूग, मूग, तूर, बाजरी.पारनेर : बाजरी, तूर, उडिद, भुईमूग, कांदा.कर्जत : बाजरी, तूर,मूग. जामखेड : बाजरी, तूर, मूग, उडिद, भुईमूग, कापूस. श्रीगोंदा- बाजरी, तूर, मूग, कांदा यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभागी व्हावे
By admin | Updated: July 13, 2014 00:17 IST