शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

'त्या' दिवट्याचं धोतर फेडायला वेळ लागणार नाही; अजित पवारांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 16:31 IST

सरकारने पाच वर्षात अडीच लाख कोटी कर्ज काढले. हा पैसा गेला कुठे?

अकोले : राष्ट्रवादीने अकोलेला भरभरुन दिले आहे. पाण्याचे प्रश्न सोडविले. निळवंडे धरण पूर्णत्वास येण्यासाठी काम केले. विशेष बाब म्हणून पिंपळगाव खांड पूर्ण केले. जिल्हा बँकेच अध्यक्षपद दिले. जिल्हा परिषदेत महत्वाचे खाते दिले. पण दिवट्यांनी काळा चष्मा काढला आणि त्यांची काळी बाजू समोर दिसू लागल्याने त्यांनी पक्ष सोडला. त्यांचे धोतरं फेडायला वेळ लागणार नाही? असा इशारा पवार यांनी अप्रत्यक्षपणे आमदार वैभव पिचड यांना  दिला.

अकोले बाजारतळावर सोमवारी झालेल्या सभेत पवार बोलत होते. स्वत:च्या चुकांवर पांघरुन घालण्यासाठी त्यांनी पक्ष बदलला. मात्र अकोलेची जनता राष्ट्रवादीबरोबरच आहे. तालुक्यात आघाडी सरकारने अनेक विकास कामे केली आहेत. राज्यात पुन्हा सत्तेवर येताच शेतक-यांचा सातबारा कोरा करु, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

तालुक्यात आरोग्य व शिक्षण याच्या सुविधा नाहीत. औद्योगिक वसाहत नाही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. येथील नेतृत्वाने सहकारी संस्थांचा उपयोग स्वत:ची तुंबडी भरण्यासाठी केला. भाजपची सत्तेची मस्ती जिरवण्यासाठी युवकांनी कंबर कसावी.

सरकारने पाच वर्षात अडीच लाख कोटी कर्ज काढले. हा पैसा गेला कुठे? असा सवाल करीत भाजप सरकार भ्रष्टाचारी असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी चांगले काम केले असते तर त्यांच्यावर शेतक-यांच्या मुलीने शाई फेकली नसती. शेतक-यांच्या मुलांनी त्यांच्या यात्रेला काळे झेंडे दाखवले नसते अशी टीका करीत भाजपच्या फसव्या जाहिरातींना बळी पडू नका? असे आवाहन पवार यांनी केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AhmednagarअहमदनगरAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस