शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबांच्या जन्मस्थानाचा मुद्दा; नव्या वादाला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 13:04 IST

‘साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरीचा विकास करण्यात येईल’ असे सांगून साईभक्त असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नकळत जुन्या वादाला नव्याने जन्म दिला.

प्रमोद आहेर ।  शिर्डी : ‘साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरीचा विकास करण्यात येईल’ असे सांगून साईभक्त असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नकळत जुन्या वादाला नव्याने जन्म दिला.‘ऋषींचे कुळ आणि नदीचं मूळ’ शोधू नये म्हणतात़ साईबाबांनी आपल्या हयातीत भक्तांनी अनेकदा विचारूनही आपले नाव, जात, धर्म कधीही उघड केला नाही़. भविष्यात जात, धर्मच माणुसकीचे मोठे अडसर ठरतील हे त्यांना माहीत असेल. हिंदू त्यांना ‘संत ’तर मुस्लिम त्यांना ‘पीर’ समजत़ म्हाळसापतींनी आगमन प्रसंगी दिलेले नावच त्यांनी अंगीकारले. धुळे कोर्टातील एका खटल्यात कमिशनवर साक्ष देतांना साईबाबांनी आपला पंथ किंवा धर्म ‘कबीर’ (हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले संत) आणि जात ‘परवरदिगार’ ( अल्ला किंवा ईश्वर) असल्याचे सांगितले होते. जात, धर्म माहीत नसल्याने साईबाबा जगभरातील भाविकांसाठी सर्वधर्म समभावाचे प्रतिक आहेत. दाभोळकर लिखित मूळ चरित्रही हेच सांगते.  जन्मस्थळाबाबत स्पष्टीकरणसंत दासगणू लिखित सेलुच्या केशवराज बाबासाहेब महाराजांच्या चरित्रात साईबाबा पाथरीला जन्मल्याचा व बाबासाहेब उर्फ गोपाळराव साईबाबांचे गुरू असल्याचा उल्लेख आहे. हाच धागा पकडून १९७५ च्या सुमारास विश्वास खेरांनी साईबाबांचे नाव हरिभाऊ भुसारी असून ब्राम्हण कुटुंबात जन्मल्याचा तर्क लावला. मात्र मधील दोन पिढ्यांची माहिती मिळाली नसल्याने तेही साशंक होते. वास्तविक गोपाळराव महाराजांचे निर्वाण मंगळवार, १५ डिसेंबर १८०१ रोजी साईबाबांच्या जन्माच्या आधीच झाले.बाबांचा जन्म तामिळनाडूत श्रीवैकुंठम येथे झाल्याचे सांगतात. एका तमिळ चरित्रात साठेशास्त्री व लक्ष्मीबाईच्या पोटी साईबाबा जन्मल्याचा उल्लेख आहे. गुजराती साईसुधा बाबांचा जन्म ११ आॅगस्ट १८५८ रोजी गुजराती ब्राम्हण कुटुंबात नंदलाल व जमनाबाई यांच्या पोटी जेरुसलेमच्या जाफा दरवाजात झाल्याचा व तेथून ते पाथरीला गेल्याचे सांगते. मंगळवेढ्यात एक दिंगबर नावाचे बुवा होते. तेच साईबाबा असल्याचीही चर्चा त्यावेळी होती़.साई शरणानंद लिखित चरित्रात बाबांचा जन्म पाथरीला गंगाभव व देवगिरी अम्मा यांच्या पोटी झाला आहे. साईबाबा १८५७ च्या बंडानंतर परागंदा झालेले नानासाहेब पेशवे असावेत, असाही संशय व्यक्त झाला. शिर्डीत आलेल्या पाथरीच्या माणसाकडे बाबांनी तिकडची माहिती विचारली याचा अर्थ त्यांना पाथरीची माहिती होती. मात्र ते पाथरीचेच असे म्हणणे धाडसाचे ठरेल. ब्रिटिशांनाही याबाबत शोध घेता आला नाही. त्यांचे कुणी नातेवाईकही फिरकले नाहीत. एकूणच जन्मस्थानाचे व आई-वडिलांबाबतचे दावे तर्कावर आधारित आहेत. अनेक महात्म्ये, संत जातीचे लेबल लावल्याने मर्यादित झाले. साईबाबांनाही तथाकथित जन्मस्थानाच्या माध्यमातून जाती, धर्माचे लेबल लागणे मानवतेच्या हिताचे नाही.साईबाबांनी गोपनीय ठेवलेल्या बाबींवर भाष्य करणे साईबाबांवर अन्याय करणारे व करोडो भाविकांच्या श्रद्धा दुखावणारे ठरेल. पाथरीच्या साईमंदिराचा विकास झाला तर आनंदच आहे. मात्र तथाकथित जन्मस्थानाच्या ओळखीतून साईबाबांची सर्वधर्म समभावाची ओळख पुसायला नको, असे साईभक्तांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरsaibabaसाईबाबाshirdiशिर्डीUddhav Thackerayउद्धव ठाकरे