शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

साईबाबांच्या जन्मस्थानाचा मुद्दा; नव्या वादाला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 13:04 IST

‘साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरीचा विकास करण्यात येईल’ असे सांगून साईभक्त असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नकळत जुन्या वादाला नव्याने जन्म दिला.

प्रमोद आहेर ।  शिर्डी : ‘साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरीचा विकास करण्यात येईल’ असे सांगून साईभक्त असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नकळत जुन्या वादाला नव्याने जन्म दिला.‘ऋषींचे कुळ आणि नदीचं मूळ’ शोधू नये म्हणतात़ साईबाबांनी आपल्या हयातीत भक्तांनी अनेकदा विचारूनही आपले नाव, जात, धर्म कधीही उघड केला नाही़. भविष्यात जात, धर्मच माणुसकीचे मोठे अडसर ठरतील हे त्यांना माहीत असेल. हिंदू त्यांना ‘संत ’तर मुस्लिम त्यांना ‘पीर’ समजत़ म्हाळसापतींनी आगमन प्रसंगी दिलेले नावच त्यांनी अंगीकारले. धुळे कोर्टातील एका खटल्यात कमिशनवर साक्ष देतांना साईबाबांनी आपला पंथ किंवा धर्म ‘कबीर’ (हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले संत) आणि जात ‘परवरदिगार’ ( अल्ला किंवा ईश्वर) असल्याचे सांगितले होते. जात, धर्म माहीत नसल्याने साईबाबा जगभरातील भाविकांसाठी सर्वधर्म समभावाचे प्रतिक आहेत. दाभोळकर लिखित मूळ चरित्रही हेच सांगते.  जन्मस्थळाबाबत स्पष्टीकरणसंत दासगणू लिखित सेलुच्या केशवराज बाबासाहेब महाराजांच्या चरित्रात साईबाबा पाथरीला जन्मल्याचा व बाबासाहेब उर्फ गोपाळराव साईबाबांचे गुरू असल्याचा उल्लेख आहे. हाच धागा पकडून १९७५ च्या सुमारास विश्वास खेरांनी साईबाबांचे नाव हरिभाऊ भुसारी असून ब्राम्हण कुटुंबात जन्मल्याचा तर्क लावला. मात्र मधील दोन पिढ्यांची माहिती मिळाली नसल्याने तेही साशंक होते. वास्तविक गोपाळराव महाराजांचे निर्वाण मंगळवार, १५ डिसेंबर १८०१ रोजी साईबाबांच्या जन्माच्या आधीच झाले.बाबांचा जन्म तामिळनाडूत श्रीवैकुंठम येथे झाल्याचे सांगतात. एका तमिळ चरित्रात साठेशास्त्री व लक्ष्मीबाईच्या पोटी साईबाबा जन्मल्याचा उल्लेख आहे. गुजराती साईसुधा बाबांचा जन्म ११ आॅगस्ट १८५८ रोजी गुजराती ब्राम्हण कुटुंबात नंदलाल व जमनाबाई यांच्या पोटी जेरुसलेमच्या जाफा दरवाजात झाल्याचा व तेथून ते पाथरीला गेल्याचे सांगते. मंगळवेढ्यात एक दिंगबर नावाचे बुवा होते. तेच साईबाबा असल्याचीही चर्चा त्यावेळी होती़.साई शरणानंद लिखित चरित्रात बाबांचा जन्म पाथरीला गंगाभव व देवगिरी अम्मा यांच्या पोटी झाला आहे. साईबाबा १८५७ च्या बंडानंतर परागंदा झालेले नानासाहेब पेशवे असावेत, असाही संशय व्यक्त झाला. शिर्डीत आलेल्या पाथरीच्या माणसाकडे बाबांनी तिकडची माहिती विचारली याचा अर्थ त्यांना पाथरीची माहिती होती. मात्र ते पाथरीचेच असे म्हणणे धाडसाचे ठरेल. ब्रिटिशांनाही याबाबत शोध घेता आला नाही. त्यांचे कुणी नातेवाईकही फिरकले नाहीत. एकूणच जन्मस्थानाचे व आई-वडिलांबाबतचे दावे तर्कावर आधारित आहेत. अनेक महात्म्ये, संत जातीचे लेबल लावल्याने मर्यादित झाले. साईबाबांनाही तथाकथित जन्मस्थानाच्या माध्यमातून जाती, धर्माचे लेबल लागणे मानवतेच्या हिताचे नाही.साईबाबांनी गोपनीय ठेवलेल्या बाबींवर भाष्य करणे साईबाबांवर अन्याय करणारे व करोडो भाविकांच्या श्रद्धा दुखावणारे ठरेल. पाथरीच्या साईमंदिराचा विकास झाला तर आनंदच आहे. मात्र तथाकथित जन्मस्थानाच्या ओळखीतून साईबाबांची सर्वधर्म समभावाची ओळख पुसायला नको, असे साईभक्तांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरsaibabaसाईबाबाshirdiशिर्डीUddhav Thackerayउद्धव ठाकरे