छोट्या व्यापाऱ्यावर केलेला अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:21 IST2021-04-08T04:21:20+5:302021-04-08T04:21:20+5:30
कोपरगाव : राज्य शासनाने नुकताच जाहीर केलेला लॉकडाऊन हा सर्वच प्रकारच्या छोट्या व्यापाऱ्यावर अन्याय करणारा ठरत आहे. त्यामुळे असा ...

छोट्या व्यापाऱ्यावर केलेला अन्याय
कोपरगाव : राज्य शासनाने नुकताच जाहीर केलेला लॉकडाऊन हा सर्वच प्रकारच्या छोट्या व्यापाऱ्यावर अन्याय करणारा ठरत आहे. त्यामुळे असा निर्णय घेताना शासनाने छोट्या व्यापाऱ्यांनादेखील विश्वासात घेणे गरजेचे होते; परंतु तसे झाले नाही, त्यामुळे येत्या दोन दिवसात कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार असल्याचे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे यांनी म्हटले आहे.
कोयटे म्हणाले, ६ ते ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. हा लॉकडाऊन जाहीर करताना शासनाने भांडवलदार, उद्योजक, चित्रपट निर्मात्याशी चर्चा केली; परंतु छोट्या व्यापाऱ्यांशी चर्चा केली नाही. या संदर्भात जे शासकीय आदेश काढण्यात आले, त्यात कोणते दुकान सुरू ठेवायचे, कोणते बंद ठेवायचे, यात कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे व्यापारी वर्गात संभ्रम आहे.
कोरोना विरुद्ध आपल्याला निश्चितच लढायचे आहे; परंतु छोटे व्यापारी कोरोनाला कारणीभूत नाहीत. प्रादुर्भावासाठी लग्नसोहळे, साखरपुडे, राजकीय मेळावे, अंत्यविधीला झालेली मोठी गर्दी कारणीभूत आहे. या लॉकडाऊनमुळे मात्र मोबाइल विक्रेते, इलेक्ट्रॉनिक दुकानदार, सोनार, चप्पल विक्रेते, नाभिक दुकानदार, छोटे हॉटेलचालक, हातगाडीवरील विक्रेते यांच्यासह इतरही छोट्या व्यापाऱ्यांवर अन्याय झाला आहे.
या लॉकडाऊनमध्ये लग्न सोहळ्यांना ५०, अंत्यविधीला २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे; मात्र छोट्या व्यापाऱ्यांच्या दुकानात एका वेळेस दोन ते तीन ग्राहक असतात; परंतु त्यांना परवानगी नाही. छोटे-छोटे व्यापारीदेखील रोजगार निर्मिती करणारे आहेत. आता पाडवा सन आला आहे. त्यासाठी लागणारे गाठीकडे निर्मितीसाठी शेकडो कुटुंब गेली तीन-चार महिने मेहनत घेत आहे. आता लॉकडाऊन झाला आहे. त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाची विक्री कशी करायची, हीदेखील मोठी समस्या आहे.