शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

मजुरांना न्यायला आलिशान कार; पिण्यासाठी जारचे पाणी अन् चहा, फळबाग काम करणाऱ्यांना 'अच्छे दिन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 12:23 IST

कुकडी, घोड, भीमा, सीनेच्या पाण्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील ७७ टक्के क्षेत्र ओलिताखाली आले.

- बाळासाहेब काकडे

श्रीगोंदा : एक काळ असा होता की एखाद्या साहेबाला नेण्यासाठी कार यायची. पण, बदलत्या काळात श्रीगोंदा तालुक्यात शेतीत काम करणाऱ्या मजुरांना महत्त्व आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. अगदी सकाळीच मजुरांच्या दारी आलिशान कार उभ्या राहत आहेत आणि शेतात गेले की पिण्याच्या पाण्यासाठी जार आणि दोन वेळा गरमागरम चहाही दिला जात आहे.

कुकडी, घोड, भीमा, सीनेच्या पाण्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील ७७ टक्के क्षेत्र ओलिताखाली आले. ऊस फळबागांनी तालुका बहरला. यांत्रिकीकरण बांधकामाचा वेग वाढला आणि प्रगतीचे चक्र फिरले. तालुक्यात युवा वर्ग शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहराकडे झुकला. तसा शेतात मजुरांचा तुटवडा भासू लागला. 

शेतात काम करण्यासाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली. अशा परिस्थितीत परप्रांतीय मराठवाडा, खान्देशमधील मजुरांचे लोंढे श्रीगोंद्याच्या कृषी पंढरीत स्थिरावले आहेत. काही जणांनी मजुरीवर शेती विकत घेण्यास सुरुवात केली आहे. द्राक्षे व डाळिंब भागातील कामे अतिशय कसरतीची असल्याने ही कामे परप्रांतीय मजूर 'धोका' पत्करून करतात. त्यांना श्रमाचा मोबदलाही त्या प्रमाणात मिळतो. सध्या अशा मजुरांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. 

बागायतदार मंडळींना मजुरांना शेतात कामाला आणण्यासाठी आपली आलिशान कार घेऊन मजुरांकडे जावे लागते. कार नसेल मजूर दुसरीकडे कामाला जातात. त्यामुळे मजुरांच्या दारी अगदी सकाळीच कार येतात. संध्याकाळी पुन्हा वेळेत घरी आणून सोडतात. तसेच दिवसभरात दोनदा चहाही द्यावा लागतो. तसेच पिण्यासाठी जारचे शुद्ध पाणी द्यावे लागते. त्यामुळे मजुरांच्या श्रमाला चांगलीच प्रतिष्ठा निर्माण झाली आहे.

आम्ही गुजरात राज्यातून महाराष्ट्रात शेतीच्या कामासाठी येतो. प्रवासात वेळ जाऊ नये यासाठी चारचाकी वाहनातून कामाला जातो. यामध्ये शेतकयांचा फायदा होतो. आमच्या मुलांच्या शिक्षणाचा व राहण्याचा प्रश्न अवघड आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. - अजय तुळशीराम भवर, रा. निरवळ, ता. कोपराडा, जि. वलसाड, गुजरात

नैसर्गिक समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे औषधे आणि नियोजन विना शेती राहिली नाही. मजुरांचा तुटवडा आहे. त्यामुळे मजुरांना महत्त्व आले आहे. मजुरांना आणण्यासाठी कार घेऊन जावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी जारची व्यवस्था करावी लागते.- दत्तात्रय जगताप, लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"   

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी