शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मजुरांना न्यायला आलिशान कार; पिण्यासाठी जारचे पाणी अन् चहा, फळबाग काम करणाऱ्यांना 'अच्छे दिन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 12:23 IST

कुकडी, घोड, भीमा, सीनेच्या पाण्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील ७७ टक्के क्षेत्र ओलिताखाली आले.

- बाळासाहेब काकडे

श्रीगोंदा : एक काळ असा होता की एखाद्या साहेबाला नेण्यासाठी कार यायची. पण, बदलत्या काळात श्रीगोंदा तालुक्यात शेतीत काम करणाऱ्या मजुरांना महत्त्व आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. अगदी सकाळीच मजुरांच्या दारी आलिशान कार उभ्या राहत आहेत आणि शेतात गेले की पिण्याच्या पाण्यासाठी जार आणि दोन वेळा गरमागरम चहाही दिला जात आहे.

कुकडी, घोड, भीमा, सीनेच्या पाण्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील ७७ टक्के क्षेत्र ओलिताखाली आले. ऊस फळबागांनी तालुका बहरला. यांत्रिकीकरण बांधकामाचा वेग वाढला आणि प्रगतीचे चक्र फिरले. तालुक्यात युवा वर्ग शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहराकडे झुकला. तसा शेतात मजुरांचा तुटवडा भासू लागला. 

शेतात काम करण्यासाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली. अशा परिस्थितीत परप्रांतीय मराठवाडा, खान्देशमधील मजुरांचे लोंढे श्रीगोंद्याच्या कृषी पंढरीत स्थिरावले आहेत. काही जणांनी मजुरीवर शेती विकत घेण्यास सुरुवात केली आहे. द्राक्षे व डाळिंब भागातील कामे अतिशय कसरतीची असल्याने ही कामे परप्रांतीय मजूर 'धोका' पत्करून करतात. त्यांना श्रमाचा मोबदलाही त्या प्रमाणात मिळतो. सध्या अशा मजुरांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. 

बागायतदार मंडळींना मजुरांना शेतात कामाला आणण्यासाठी आपली आलिशान कार घेऊन मजुरांकडे जावे लागते. कार नसेल मजूर दुसरीकडे कामाला जातात. त्यामुळे मजुरांच्या दारी अगदी सकाळीच कार येतात. संध्याकाळी पुन्हा वेळेत घरी आणून सोडतात. तसेच दिवसभरात दोनदा चहाही द्यावा लागतो. तसेच पिण्यासाठी जारचे शुद्ध पाणी द्यावे लागते. त्यामुळे मजुरांच्या श्रमाला चांगलीच प्रतिष्ठा निर्माण झाली आहे.

आम्ही गुजरात राज्यातून महाराष्ट्रात शेतीच्या कामासाठी येतो. प्रवासात वेळ जाऊ नये यासाठी चारचाकी वाहनातून कामाला जातो. यामध्ये शेतकयांचा फायदा होतो. आमच्या मुलांच्या शिक्षणाचा व राहण्याचा प्रश्न अवघड आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. - अजय तुळशीराम भवर, रा. निरवळ, ता. कोपराडा, जि. वलसाड, गुजरात

नैसर्गिक समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे औषधे आणि नियोजन विना शेती राहिली नाही. मजुरांचा तुटवडा आहे. त्यामुळे मजुरांना महत्त्व आले आहे. मजुरांना आणण्यासाठी कार घेऊन जावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी जारची व्यवस्था करावी लागते.- दत्तात्रय जगताप, लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"   

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी