शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

मजुरांना न्यायला आलिशान कार; पिण्यासाठी जारचे पाणी अन् चहा, फळबाग काम करणाऱ्यांना 'अच्छे दिन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 12:23 IST

कुकडी, घोड, भीमा, सीनेच्या पाण्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील ७७ टक्के क्षेत्र ओलिताखाली आले.

- बाळासाहेब काकडे

श्रीगोंदा : एक काळ असा होता की एखाद्या साहेबाला नेण्यासाठी कार यायची. पण, बदलत्या काळात श्रीगोंदा तालुक्यात शेतीत काम करणाऱ्या मजुरांना महत्त्व आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. अगदी सकाळीच मजुरांच्या दारी आलिशान कार उभ्या राहत आहेत आणि शेतात गेले की पिण्याच्या पाण्यासाठी जार आणि दोन वेळा गरमागरम चहाही दिला जात आहे.

कुकडी, घोड, भीमा, सीनेच्या पाण्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील ७७ टक्के क्षेत्र ओलिताखाली आले. ऊस फळबागांनी तालुका बहरला. यांत्रिकीकरण बांधकामाचा वेग वाढला आणि प्रगतीचे चक्र फिरले. तालुक्यात युवा वर्ग शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहराकडे झुकला. तसा शेतात मजुरांचा तुटवडा भासू लागला. 

शेतात काम करण्यासाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली. अशा परिस्थितीत परप्रांतीय मराठवाडा, खान्देशमधील मजुरांचे लोंढे श्रीगोंद्याच्या कृषी पंढरीत स्थिरावले आहेत. काही जणांनी मजुरीवर शेती विकत घेण्यास सुरुवात केली आहे. द्राक्षे व डाळिंब भागातील कामे अतिशय कसरतीची असल्याने ही कामे परप्रांतीय मजूर 'धोका' पत्करून करतात. त्यांना श्रमाचा मोबदलाही त्या प्रमाणात मिळतो. सध्या अशा मजुरांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. 

बागायतदार मंडळींना मजुरांना शेतात कामाला आणण्यासाठी आपली आलिशान कार घेऊन मजुरांकडे जावे लागते. कार नसेल मजूर दुसरीकडे कामाला जातात. त्यामुळे मजुरांच्या दारी अगदी सकाळीच कार येतात. संध्याकाळी पुन्हा वेळेत घरी आणून सोडतात. तसेच दिवसभरात दोनदा चहाही द्यावा लागतो. तसेच पिण्यासाठी जारचे शुद्ध पाणी द्यावे लागते. त्यामुळे मजुरांच्या श्रमाला चांगलीच प्रतिष्ठा निर्माण झाली आहे.

आम्ही गुजरात राज्यातून महाराष्ट्रात शेतीच्या कामासाठी येतो. प्रवासात वेळ जाऊ नये यासाठी चारचाकी वाहनातून कामाला जातो. यामध्ये शेतकयांचा फायदा होतो. आमच्या मुलांच्या शिक्षणाचा व राहण्याचा प्रश्न अवघड आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. - अजय तुळशीराम भवर, रा. निरवळ, ता. कोपराडा, जि. वलसाड, गुजरात

नैसर्गिक समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे औषधे आणि नियोजन विना शेती राहिली नाही. मजुरांचा तुटवडा आहे. त्यामुळे मजुरांना महत्त्व आले आहे. मजुरांना आणण्यासाठी कार घेऊन जावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी जारची व्यवस्था करावी लागते.- दत्तात्रय जगताप, लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"   

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी