महामार्ग रोखला

By Admin | Updated: June 18, 2014 01:23 IST2014-06-18T00:41:19+5:302014-06-18T01:23:03+5:30

तिसगाव : रस्ते, पाणी, वीज याप्रश्नी पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथील गावकऱ्यांनी मंगळवारी कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर मंगळवारी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.

Highway stopped | महामार्ग रोखला

महामार्ग रोखला

तिसगाव : रस्ते, पाणी, वीज याप्रश्नी पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथील गावकऱ्यांनी मंगळवारी कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर मंगळवारी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.
सरपंच सविता ससे, उपसरपंच हरिश्चंद्र मरकड, अशोक मरकड, आसाराम ससे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. सुमारे वर्षापूर्वी वेळोवेळी निवडुंगे येथे झालेल्या आंदोलनादरम्यान समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात कार्यवाही होत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी यावेळी संताप व्यक्त केला. आश्वासने दिलेल्या लेखीप्रतीच समोर ठेवल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना निरुत्तर व्हावे लागले.
पाणी योजनेतील दोष, दुरुस्ती त्रूटी यावर आजच तात्काळ मात करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन शाखा अभियंता बबन खोले, उपअभियंता आर.एम. फुंदे, तहसीलदार एस.बी. भाटे यांनी संयुक्तरित्या दिल्यानंतर आंदोलक रस्त्यावरुन बाजुला झाले. दरम्यान, शाखा अभियंता बबन खोले यांनी २७ मार्च २०१२ रोजी निवडुंगे येथे याच प्रश्नावरुन झालेल्या रास्ता रोकोप्रसंगी याच प्रकारचे लेखी आश्वासन दिले होते. तर आजच्या या आंदोलनालाच तेच हजर नव्हते. त्यामुळे नागरिकांचा सर्वाधिक रोषही त्यांच्यावर होता.
तहसीलदार एस.बी. भाटे यांनी भ्रमणध्वनीवरुन शाखा अभियंता खोले यांना सुनावले. त्यानंतर खोले आंदोलनस्थळी आले. त्यावेळी महिलांनीच त्यांच्यावर तोंडसुख घेतले. तीन दिवसात बृहत वर्षाचा हा प्रलंबित प्रश्न मार्गी न लागल्यास पुन्हा रास्ता रोको करण्याचा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी झालेल्या चर्चेत सर्वस्वी सरपंच ससे, गयाबाई वाघमोडे, मुक्ताबाई सातपुते, अलका जाधव, लिलाबाई बोरुडे, भारती घोडके, निर्मला भवार, ग्रामपंचायत सदस्य शंकर गोंधणे, चंद्रकांत मरकड, विठ्ठल मरकड, खंडू कोलते, भाऊसाहेब साळवे यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)
आंदोलकांची माणुसकी
ज्वलंत वीज, पाणी प्रश्नी आक्रमक भूमिका असलेल्या आंदोलकांनी शालेय विद्यार्थ्यांची वाहने, रुग्णवाहिका तसेच महिलांची दुचाकी वाहने यांना मात्र स्वयंस्फूर्तीने वाट करुन दिली.
निवडुंगे प्रादेशिक पाणी योजनेवरील बेकायदा नळ कनेक्शन तोडण्याचे आदेश पंचायत समितीने दोन वर्षापूर्वीच दिले आहेत. तरीही आदेशाचे पालन होत नाही. याबाबत दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी जेणेकरून अशा जनभावनेचा रोष ओढवणार नाही.
- आसाराम ससे, ग्रामपंचायत सत्ताधारी, आघाडीचे नेते

Web Title: Highway stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.