शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

गद्दार बारसकरला दोन महिन्यांपूर्वीच हाकलला; दागंटांनी सांगितलं काय घडलं

By अण्णा नवथर | Updated: February 22, 2024 13:57 IST

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय बारसकर याने आरोप केले आहेत. पण...

अहमदनगर - मराठ्यांशी गद्दारी करणारा अजय बारसकर हा मनोज जरांगे पाटील यांच्या टिममध्ये नव्हता. त्याला मराठा मोर्चातून दोन महिन्यांपूर्वी हकलेले आहे. त्यान मराठा समाजाशी गद्दारी केलेली आहे. त्याला समाज कधीही माफ करणार नाही, असल्याची माहिती अहमदनगर सकल मराठा समाजाचे ॲड. गजेंद्र दांगट यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय बारसकरने आरोप केले आहेत. या आरोपाला अहमदनगर मराठा सकल समाजाने उत्तर दिले. गजेंद्र दांगट पुढे म्हणाले, अजय बारसकर कधीही मोर्चात सहभागी नव्हता. तो जिथे आंदोलन सुरू असते. तिथे जातो आणि भाषण करतो. मराठा मोर्चातील माहिती घेऊन तो सरकारला पुरवित होता. मराठा आंदोलनामुळे मराठा नेते संपले तर आपले काय होईल, याची त्याला चिंता आहे. त्याला जर मराठा समाजाची चिंता असती तर त्याने स्वतंत्र आंदोलन केले असते. मात्र त्याने स्वतंत्र आंदोलन करता मराठा आंदोलनात फुट पाडण्याची सरकारकडून सुपारी घेतली आहे.  मागील चार दिवसांत एका नेत्यांच्यासोबत हेलिकॅप्टरमध्ये फिरत होता, अशी माहिती आहे.त्याचवेळी हे षडयंत्र रचले गेले असून, त्यानुसारच बारसकर जरांगे पाटील यांच्यावर आरोप करतो आहे. त्याने मुंबई पत्रकार परिषद घेतली. त्याच्या बातम्याही प्रसिध्द होत असून, यामागे मोठी शक्ती आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.

तुकाराम महाराजांनी बारसकरला हेच शिकवले का

तुकाराम महाराज यांच्या नावाने बारसकर हा दुकानदारी करतो. तो सांगतो कि मी तुकाराम महाराजांचा भक्त आहे. तुकाराम महाराज यांचे मराठा समाजासाठी मोठे योगदान आहे. तुकाराम महाराज यांनी बारसकरला हे शिकविले का, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. 

टॅग्स :marathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील