शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

शेतकऱ्यांच्या उसाच्या भावासाठी प्रहार संघटना मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:45 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांना मागील उसाचे पेमेंट दिले नाही. त्यामुळे जोपर्यंत थकीत रक्कम मिळत नाही, तोपर्यंत ...

अहमदनगर : जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांना मागील उसाचे पेमेंट दिले नाही. त्यामुळे जोपर्यंत थकीत रक्कम मिळत नाही, तोपर्यंत कारखान्यांना गाळपासाठी परवानगी देऊ नये, अशी भूमिका प्रहार जनशक्ती संघटनेने घेतली असून, त्याबाबत मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या ऊस भावाची रक्कम मिळण्यासाठी प्रहार संघटना गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी प्रादेशिक सहसंचालक कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या. थकीत रक्कम असलेल्या कारखान्यांना परवानगी देऊ नये, जे कारखाने रीतसर भाव आणि वेळेवर पैसे देतील त्यांना ऊस द्यावा, कारखान्यांचे वजन काटे निरीक्षण करताना निरीक्षण पथकाबरोबर शेतकरी प्रतिनिधी असावा, कारखान्यांनी हंगाम सुरू होण्याअगोदर उसाचा भाव जाहीर करावा, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना कडक निकष लावण्यात यावेत, ऊस कारखान्याला, तर वाढे शेतकऱ्यांना द्यावेत, कारखान्यांनी अगोदर आपल्या गटातील ऊस न्यावा, नंतर इतर उसाला प्राधान्य द्यावे, शेतकरीनिहाय यादी आयुक्त कार्यालयाला सादर करावी, कारखान्यांच्या ऊस भावात तफावत नसावी, ऊस तोडीची कार्यवाही जशा नोंदी आल्यात तशीच व्हावी, अशा अनेक मागण्या प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी साखर सहसंचालकांकडे मांडल्या. मात्र, त्यांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत दोषी कारखान्यांवर कडक कारवाईच्या सूचना दिल्या. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी, जिल्हा सचिव प्रकाश बेरड, सल्लागार मालोजी शिकारे, शेवगाव तालुकाध्यक्ष संदीप बामदळे, भीमराव पाटील, बंडू उगले आदी उपस्थित होते. -----------------

फोटो मेल प्रहार संघटना

शेतकऱ्यांना उसाचे थकीत पेमेंट मिळावे यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.