शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नगर जिल्ह्यात एकाच दिवसी दोन कर्जबाजारी शेतक-यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 19:01 IST

नगर तालुक्यातील मेहेकरी गावात सुभाष आप्पा बडे (वय ५०)  या शेतक-याने सावकाराच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. जामखेड तालुक्यातही शेतकरी बाबासाहेब राऊ गोयकर (वय ४८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देएकाच दिवसात दोन शेतक-यांनी संपविली जीवनयात्रा नगर तालुक्यात सावकारी जाचाला कंटाळून घेतला गळफासजामखेड तालुक्यातही कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

केडगाव/ जामखेड : नगर तालुक्यातील मेहेकरी गावात सुभाष आप्पा बडे (वय ५०)  या शेतक-याने सावकाराच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. जामखेड तालुक्यातील गोयकरवाडी येथील शेतकरी बाबासाहेब राऊ गोयकर (वय ४८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सावकाराने बडे यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे बडे कुटुंबाकडून सांगण्यात येत आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. बडे यांच्या जवळ सावकाराच्या नावाने चिठ्ठी सापडली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.मयत सुभाष बडे यांच्या खिशात ही चिठ्ठी सापडल्याने पोलीस आता खासगी सावकारांच्या विरोधात काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेहेकरी येथील गावक-यांनी बडे यांना शिवीगाळ करणा-या सावकाराच्या विरोधात संताप व्यक्त केल्याने तो फरार झाल्याचीही माहिती समजली आहे. मयत बडे यांच्यावर खासगी सावकाराकडून घेतलेले कर्ज जवळपास एक ते दीड लाख रुपये होते. तो सावकार त्यांच्याकडून दहा ते पंधरा टक्के  व्याजाने पैसे वसूल करीत होता. सध्या आर्थिकदृष्ट्या बडे अडचणीत असल्याने वेळोवेळी व्याज देता येत नसल्याने सावकाराने थेट बडे यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली होती. याचा त्रास बडे यांना झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचे त्यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण असून सावकाराला योग्य शिक्षा व्हावी अशी मागणी गावातून केली जात आहे. दरम्यान बडे यांच्या आत्महत्येबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . या घटनेमुळे मेहेकरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

खासगी सावकारांची वसुुली

नगर तालुक्यातील अनेक गावांत काही ठराविक सावकार दहा ते पंधरा टक्क्याने गोरगरिबांना पैसे देऊन दामदुप्पट वसूल करतात. त्यामुळे वेळेत पैसा सावकाराकडे जात नाही. त्यामुळे आणखीच शेतकरी कर्जबाजारी होतो आहे. कर्जाचा आकडा दिवसेंदिवस फुगत जाऊन ते फेडणे गोरगरिबांना अशक्य होते. सावकाराचा वसुलीसाठी जाच सुरू होतो.या त्रासातून गोरगरीब आत्महत्या करीत असल्याने या सावकारशाही विरोधात आता कार्यवाही होणार का असा प्रश्न सर्वसामान्य व्यक्त करीत आहेत.

गोयकरवाडीतही कर्जबाजारी शेतक-याने घेतला गळफास

जामखेड : तालुक्यातील गोयकरवाडी येथील शेतकरी बाबासाहेब राऊ गोयकर (वय ४८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.  हा प्रकार बुधवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आला. गोयकर यांनी स्वत:च्या शेतातच आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. गोयकर यांना अडीच एकर जमीन आहे. त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान याबाबतची खबर पोलीस पाटील कांतिलाल वाळुंजकर यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल चव्हाण यांनी पंचनामा केला. बुधवारी दुपारी गोयकर यांच्यावर त्यांच्याच शेतात अंत्यविधी करण्यात आला. गोयकर यांच्यामागे वडील, एक भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर