शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

कोपरगावात समृद्धी महामार्गाचे मुदतीत काम करण्यात अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 10:39 IST

शिर्डी जोडणार कधी?; ३० पैकी केवळ ८ किमी रस्ता झाला पूर्ण.

ठळक मुद्देशिर्डी जोडणार कधी?; ३० पैकी केवळ ८ किमी रस्ता झाला पूर्ण

रोहित टेकेभाग ३कोपरगाव (जि. अहमदनगर) : अहमदनगर जिह्याच्या दहा गावांतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ३० किलोमीटर आहे. त्यापैकी पुलांचे अंतर २.५ किलोमीटर आहे. मात्र, काम सुरू झाल्यापासूनच गायत्री प्रोजेक्ट लि., हैदराबाद या ठेकेदार कंपनीचा प्रवास धीम्यागतीचा व तितकाच वादग्रस्त राहिला आहे.

सद्य:स्थितीत ५० टक्केच मातीच्या भरावाचे काम झाले आहे. अवघ्या ८ किलोमीटर सिमेंटच्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे डिसेंबर २०२१ पर्यंत मुदत वाढून मिळूनही कंपनी वेळेत काम करण्यात अपयशी ठरली आहे. कंपनीने अनेक उप-ठेकेदारांना काम दिलेले आहे. हे काम करताना निर्बंधांचे पालन न केल्याने भरावासाठी मातीची वाहतूक करताना धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे रस्त्याच्या भरावासाठी मुरुमाऐवजी वापरण्यात आलेल्या मातीसंदर्भात स्थानिक कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारातून माहिती मिळवली. मंत्रालय स्तरावर तक्रारी केल्या. मात्र, कोणीही त्याची दखल घेतली नाही.

३० किलोमीटर मार्गात लहान- मोठे एकूण १३७ पूल आहेत. त्यापैकी सर्वांत मोठे दोन इंटर चेंज आहेत. गोदावरी नदी, कोळ नदी, खडकी नदी, मनमाड- दौंड रेल्वेमार्ग, चांदेकसारे येथे राष्ट्रीय महामार्गावर दोन, देर्डे- कोऱ्हाळे येथे दोन, असे एकूण आठ मोठे उड्डाणपूल आहेत. १०० बोगद्यांचे काम सुरू आहे. 

ठेकेदार कंपनीला ४६ कोटींचा दंड!महामार्गाच्या भरावासाठी लागणाऱ्या माती-मुरुमाचे तालुक्यातील देर्डे - कोऱ्हाळे व धोत्रे येथील शेतकऱ्यांच्या शेतातून मर्यादेपेक्षा जास्त उत्खनन केल्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी गायत्री प्रोजेक्ट लि. कंपनीला ४५ कोटी ७७ लाख २९ हजार ६०० रुपये, तर डाऊच बुद्रुक येथील उत्खननासाठी रॅण्डबॅण्ड इन्फ्रा प्रा.लि. या कंपनीला १३ लाख, असे दोन्ही मिळून ४५ कोटी ९० लाख २९ हजार ६०० रुपयांचा दंड केला. गेल्या वर्षी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये एकत्रित दंड ठोठावत पुढील कारवाईसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे पाठविला आहे.

भरावासाठी मुरूम वापरणे अभिप्रेत होते; परंतु सर्रासपणे मातीचा वापर केला आहे. हे सर्व माहिती अधिकारातून उघड झाले आहे. ही बाब संबंधित कंपनीसह शासकीय अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिली; परंतु काहीच कारवाई झाली नाही. यासंदर्भात मी लवकरच न्यायालयात खटला दाखल करणार आहे.बाळासाहेब जाधव, सामजिक कार्यकर्ते, कोकमठाण, कोपरगाव

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMaharashtraमहाराष्ट्रshirdiशिर्डीAhmednagarअहमदनगर