शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

काढ्याचा अति व चुकीचा वापर आरोग्यास धोकादायक; डॉ. सिमरन वधवा यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 15:15 IST

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक व घरच्या घरी तयार केलेला काढा अत्यंत उपयुक्त आहे. मात्र त्याचा अतिरेकी व चुकीचा वापर धोकादायक आहे, असा इशारा येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.सिमरन वधवा यांनी दिला आहे. 

संडे स्पेशल मुलाखत 

अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काढा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अति काढा घेतल्याने अनेकांना इतर आजारांना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर लोकमतने स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सिमरन वधवा यांच्याशी संवाद साधला. 

काढा कसा केला जातो?

डॉक्टर- आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी स्वच्छ पाणी, तुळशीची पाने, लवंग, काळी मिरी, छोटी विलायची, आले, मसाला इलायची, गवती चहा, पुदिना, गूळ आवश्यक आहेत. अश्वगंधा, गिलॉय आणि कळमेघ पावडरचा वापर काढयामध्ये करावा. सर्व प्रथम पाणी गरम करा. पाणी उकळण्यास सुरुवात झाल्यावर चवीनुसार मीठ, लवंग, मिरपूड, इलायची, आले आणि गूळ घाला. थोड्या वेळाने तुळशीची पाने आणि चहाची किंवा गवती चहाची पाने घाला. चहाची पाने व पाणी अर्धा राहिले की गॅस बंद करा आणि पाणी गाळून घ्या.

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे इतर काही उपाय?

डॉक्टर- रोगप्रतिकारशक्ती टिकविण्यासाठी कोमट पाण्याचा रस, आवळा, कोरफड, गिलॉय, लिंबू इत्यादींचा रस प्यावा. तुळशीच्या रसातील काही थेंब पाण्यात टाकणे किंवा कोमट दुधात हळद मिसळून प्यावे. तुळशीची पाने, चार काळी मिरी, तीन लवंग, एक चमचा आल्याचा रस मधाबरोबर घेता येतो. तुळशीची १०-१५ पाने, ७ काळी मिरी, थोडी दालचिनी आणि  आले, चहा देखील वापरता येतो. 

काढा किती फायदेशीर?

डॉक्टर- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक काढा पिण्याचा सल्ला दिला आहे.  एकाच वेळी बºयाच विकारांमध्ये काढा काम करेल. प्रतिकारशक्ती मजबूत करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पौष्टिक आहार. नैसर्गिक पौष्टिक घटकांपासून तयार केलेला काढा आरोग्यास अनेक फायदे पुरवतो. सर्दी, खोकला आणि सर्दीपासून बचाव करण्यासाठी देखील काढा प्रभावी आहे. तापामुळे शरीरात येणारा अशक्तपणा देखील यामुळे बरा होतो.

अतिसेवनाचे परिणाम

काढा उबदार आणि गरम असल्याने अतिसेवनामुळे समस्या वाढवतो. काढा बनवण्यासाठी वापरल्या जाणा-या सर्व गोष्टी उष्ण परिणाम देतात. अतिसेवनामुळे अंगावर फोड येणे, आंबटपणा, घशात जळजळ होऊ शकते.  काळी मिरी आणि दालचिनीचे जास्त सेवन केल्याने ओटीपोटात वेदना होऊ शकते. गिलॉय, मुलेथी आणि अश्वगंधा या आयुर्वेदिक औषधांचा जास्त प्रमाणात सेवन केल्यास कावीळ होण्याचा धोका संभवतो. योग्य गुणोत्तर महत्वाचे आहे. प्रत्येक साहित्य योग्य प्रमाणात वापरणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरinterviewमुलाखतdoctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्या