शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काढ्याचा अति व चुकीचा वापर आरोग्यास धोकादायक; डॉ. सिमरन वधवा यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 15:15 IST

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक व घरच्या घरी तयार केलेला काढा अत्यंत उपयुक्त आहे. मात्र त्याचा अतिरेकी व चुकीचा वापर धोकादायक आहे, असा इशारा येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.सिमरन वधवा यांनी दिला आहे. 

संडे स्पेशल मुलाखत 

अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काढा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अति काढा घेतल्याने अनेकांना इतर आजारांना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर लोकमतने स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सिमरन वधवा यांच्याशी संवाद साधला. 

काढा कसा केला जातो?

डॉक्टर- आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी स्वच्छ पाणी, तुळशीची पाने, लवंग, काळी मिरी, छोटी विलायची, आले, मसाला इलायची, गवती चहा, पुदिना, गूळ आवश्यक आहेत. अश्वगंधा, गिलॉय आणि कळमेघ पावडरचा वापर काढयामध्ये करावा. सर्व प्रथम पाणी गरम करा. पाणी उकळण्यास सुरुवात झाल्यावर चवीनुसार मीठ, लवंग, मिरपूड, इलायची, आले आणि गूळ घाला. थोड्या वेळाने तुळशीची पाने आणि चहाची किंवा गवती चहाची पाने घाला. चहाची पाने व पाणी अर्धा राहिले की गॅस बंद करा आणि पाणी गाळून घ्या.

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे इतर काही उपाय?

डॉक्टर- रोगप्रतिकारशक्ती टिकविण्यासाठी कोमट पाण्याचा रस, आवळा, कोरफड, गिलॉय, लिंबू इत्यादींचा रस प्यावा. तुळशीच्या रसातील काही थेंब पाण्यात टाकणे किंवा कोमट दुधात हळद मिसळून प्यावे. तुळशीची पाने, चार काळी मिरी, तीन लवंग, एक चमचा आल्याचा रस मधाबरोबर घेता येतो. तुळशीची १०-१५ पाने, ७ काळी मिरी, थोडी दालचिनी आणि  आले, चहा देखील वापरता येतो. 

काढा किती फायदेशीर?

डॉक्टर- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक काढा पिण्याचा सल्ला दिला आहे.  एकाच वेळी बºयाच विकारांमध्ये काढा काम करेल. प्रतिकारशक्ती मजबूत करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पौष्टिक आहार. नैसर्गिक पौष्टिक घटकांपासून तयार केलेला काढा आरोग्यास अनेक फायदे पुरवतो. सर्दी, खोकला आणि सर्दीपासून बचाव करण्यासाठी देखील काढा प्रभावी आहे. तापामुळे शरीरात येणारा अशक्तपणा देखील यामुळे बरा होतो.

अतिसेवनाचे परिणाम

काढा उबदार आणि गरम असल्याने अतिसेवनामुळे समस्या वाढवतो. काढा बनवण्यासाठी वापरल्या जाणा-या सर्व गोष्टी उष्ण परिणाम देतात. अतिसेवनामुळे अंगावर फोड येणे, आंबटपणा, घशात जळजळ होऊ शकते.  काळी मिरी आणि दालचिनीचे जास्त सेवन केल्याने ओटीपोटात वेदना होऊ शकते. गिलॉय, मुलेथी आणि अश्वगंधा या आयुर्वेदिक औषधांचा जास्त प्रमाणात सेवन केल्यास कावीळ होण्याचा धोका संभवतो. योग्य गुणोत्तर महत्वाचे आहे. प्रत्येक साहित्य योग्य प्रमाणात वापरणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरinterviewमुलाखतdoctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्या