शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

काढ्याचा अति व चुकीचा वापर आरोग्यास धोकादायक; डॉ. सिमरन वधवा यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 15:15 IST

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक व घरच्या घरी तयार केलेला काढा अत्यंत उपयुक्त आहे. मात्र त्याचा अतिरेकी व चुकीचा वापर धोकादायक आहे, असा इशारा येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.सिमरन वधवा यांनी दिला आहे. 

संडे स्पेशल मुलाखत 

अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काढा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अति काढा घेतल्याने अनेकांना इतर आजारांना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर लोकमतने स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सिमरन वधवा यांच्याशी संवाद साधला. 

काढा कसा केला जातो?

डॉक्टर- आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी स्वच्छ पाणी, तुळशीची पाने, लवंग, काळी मिरी, छोटी विलायची, आले, मसाला इलायची, गवती चहा, पुदिना, गूळ आवश्यक आहेत. अश्वगंधा, गिलॉय आणि कळमेघ पावडरचा वापर काढयामध्ये करावा. सर्व प्रथम पाणी गरम करा. पाणी उकळण्यास सुरुवात झाल्यावर चवीनुसार मीठ, लवंग, मिरपूड, इलायची, आले आणि गूळ घाला. थोड्या वेळाने तुळशीची पाने आणि चहाची किंवा गवती चहाची पाने घाला. चहाची पाने व पाणी अर्धा राहिले की गॅस बंद करा आणि पाणी गाळून घ्या.

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे इतर काही उपाय?

डॉक्टर- रोगप्रतिकारशक्ती टिकविण्यासाठी कोमट पाण्याचा रस, आवळा, कोरफड, गिलॉय, लिंबू इत्यादींचा रस प्यावा. तुळशीच्या रसातील काही थेंब पाण्यात टाकणे किंवा कोमट दुधात हळद मिसळून प्यावे. तुळशीची पाने, चार काळी मिरी, तीन लवंग, एक चमचा आल्याचा रस मधाबरोबर घेता येतो. तुळशीची १०-१५ पाने, ७ काळी मिरी, थोडी दालचिनी आणि  आले, चहा देखील वापरता येतो. 

काढा किती फायदेशीर?

डॉक्टर- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक काढा पिण्याचा सल्ला दिला आहे.  एकाच वेळी बºयाच विकारांमध्ये काढा काम करेल. प्रतिकारशक्ती मजबूत करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पौष्टिक आहार. नैसर्गिक पौष्टिक घटकांपासून तयार केलेला काढा आरोग्यास अनेक फायदे पुरवतो. सर्दी, खोकला आणि सर्दीपासून बचाव करण्यासाठी देखील काढा प्रभावी आहे. तापामुळे शरीरात येणारा अशक्तपणा देखील यामुळे बरा होतो.

अतिसेवनाचे परिणाम

काढा उबदार आणि गरम असल्याने अतिसेवनामुळे समस्या वाढवतो. काढा बनवण्यासाठी वापरल्या जाणा-या सर्व गोष्टी उष्ण परिणाम देतात. अतिसेवनामुळे अंगावर फोड येणे, आंबटपणा, घशात जळजळ होऊ शकते.  काळी मिरी आणि दालचिनीचे जास्त सेवन केल्याने ओटीपोटात वेदना होऊ शकते. गिलॉय, मुलेथी आणि अश्वगंधा या आयुर्वेदिक औषधांचा जास्त प्रमाणात सेवन केल्यास कावीळ होण्याचा धोका संभवतो. योग्य गुणोत्तर महत्वाचे आहे. प्रत्येक साहित्य योग्य प्रमाणात वापरणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरinterviewमुलाखतdoctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्या