विद्यार्थ्यांसाठी तात्काळ मिळणार दाखले

By Admin | Updated: July 3, 2014 00:58 IST2014-07-03T00:31:41+5:302014-07-03T00:58:27+5:30

अहमदनगर : इयत्ता दहावी व बारावीचे निकाल लागल्यानंतर तहसील कार्यालयात नागरिक व विद्यार्थी विविध प्रकारच्या दाखल्यासाठी येतात.

Examinations will be available for students immediately | विद्यार्थ्यांसाठी तात्काळ मिळणार दाखले

विद्यार्थ्यांसाठी तात्काळ मिळणार दाखले

अहमदनगर : इयत्ता दहावी व बारावीचे निकाल लागल्यानंतर तहसील कार्यालयात नागरिक व विद्यार्थी विविध प्रकारच्या दाखल्यासाठी येतात. त्यांना तात्काळ दाखले द्यावेत, असा आदेश प्रांताधिकारी वामन कदम यांनी दिला.
नगर तहसील कार्यालयासमोरील महा-ई सेवा केंद्र क्रमांक २१ उपविभागीय अधिकारी कदम यांनी बंद केले आहे. या ई-सेवा केंद्रातील तयार दाखल्यांचे वाटप तहसील कार्यालयात सुरू आहे. परंतु काही दाखले तयार झालेले नाहीत. बंद केलेल्या ई-सेवा केंद्रातील ज्या विद्यार्थी व नागरिकांचे दाखले मिळाले नाहीत अशा विद्यार्थी व नागरिकांसाठी तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहे.
ज्या विद्यार्थी व नागरिकांना दाखले मिळाले नाहीत, त्यांनी तक्रार निवारण केंद्रात तक्रार नोंदवावी. या तक्रारीनुसार विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी इतर महा ई सेवा केंद्रामार्फत तात्काळ दाखले उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Examinations will be available for students immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.