आमदार डॉ.किरण लहामटे, जेष्ठ नेते अशोक भांगरे, संदीप वर्पे, कपिल पवार, भानुदास तिकांडे, सुरेश गडाख, रवी मालुंजकर, प्रा.चंद्रभान नवले, राजेंद्र कुमकर, विकास बंगाळ आदी उपस्थिती होते.
कोतुळ पूल, ३२ गाव पाणी पुरवठा योजना, पुनर्वसन मूल्यांकन, निळवंडे कालवे संदर्भातील प्रश्न, एमआयडीसी, तालुका पर्यटन, जिल्हा उपरुग्णांलय याबाबत मंत्री पाटील यांनी माहिती घेतली व निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली.
भविष्यात येणारी निवडणूकांना एकसंघपणे सामोरे जा असा सल्ला पाटील यांनी दिला.
आमदार लहामटे म्हणाले, त्यांनी विकासाची कामे केली असती तर मी आमदार झालो नसतो. विरोधाक म्हणतात या नव्या आमदाराने किमान एक बांध घालून दाखवावा? याला उत्तर म्हणून जलसंपदा मंत्री यांनी तालुक्यातील आढळा भागात एक बंधारा, पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी हिवरा नाला प्रकल्प, कोतुळ पूल , बिताका प्रकल्प, बदगी बंधारा पूर्ण व्हावे अशी मागणी केली. आदिवासी लोक नारायणगावला शेती कामासाठी जातात त्यांची रोजगारासाठी होणारी भटकंती थांबण्यासाठी औद्योगिक वसाहत प्रश्न तातडीने मार्गी लावा अशीही मागणी केली.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांनी प्रास्ताविक केले.