वीजप्रश्नी राष्ट्रवादीचा सरकारला आठ दिवसांचा अल्टीमेटम

By Admin | Updated: April 19, 2016 00:14 IST2016-04-19T00:06:48+5:302016-04-19T00:14:07+5:30

अहमदनगर : जायकवाडी धरणातून मद्यनिर्मितीच्या कारखान्यांना पाणी मिळते, मग, पिण्यासाठी का नाही, असा सवाल उपस्थित करत

Eight-day ultimatum to the President of the Nationalist Congress Party | वीजप्रश्नी राष्ट्रवादीचा सरकारला आठ दिवसांचा अल्टीमेटम

वीजप्रश्नी राष्ट्रवादीचा सरकारला आठ दिवसांचा अल्टीमेटम

अहमदनगर : जायकवाडी धरणातून मद्यनिर्मितीच्या कारखान्यांना पाणी मिळते, मग, पिण्यासाठी का नाही, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी आठ दिवसांत या भागातील वीज पुरवठा पूर्ववत करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना पत्रकार परिषदेत दिला़
जायकवाडी जलाशय परिसरातील रोहित्र उतरविण्यात आले आहे़ त्यामुळे प्रशासन व शेतकऱ्यांत नव्या वादाला तोंड फुटले आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसचे घुले यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली़ काकासाहेब नरवडे, सोमनाथ धूत यावेळी उपस्थित होते़
नगर व औरंगाबाद जिल्ह्यातील चार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या त्यागातून जायकवाडी धरणाची निर्मिती झाली़ लाभक्षेत्रातील नेवासा, शेवगाव, गंगापूर आणि पैठण तालुक्यातील ३५ हजार हेक्टर जमीन धरणात गेली़ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी योजनांना परवानगी मिळाली़ शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज घेऊन पाणी योजना सुरू केल्या़ धरणातील पाण्याचा सर्वप्रथम पिण्यासाठी, नंतर शेती आणि उद्योग, असा प्राधान्यक्रम ठरला आहे़ मात्र, उद्योगाला प्राधान्य दिले जात आहे़ विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्यापेक्षा मद्यनिर्मिती सरकारच्यादृष्टीने महत्वाची असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला़ पिण्यासाठी आणि नंतर शेतीसाठी, असा प्राधान्यक्रम असताना वीज पुरवठा खंडित करणे, योग्य नाही, हा अन्याय आहे़ वीज पुरवठाच खंडित करायचा असेल तर शेतकऱ्यांचे कर्ज सरकारने माफ करावे, अशी मागणी यावेळी घुले यांनी केली़ जायकवाडीतील पाण्यावर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा हक्क आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Eight-day ultimatum to the President of the Nationalist Congress Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.