शहरं
Join us  
Trending Stories
1
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
2
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
3
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
4
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
5
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
6
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
7
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
8
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
9
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
10
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
11
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
12
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
13
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
14
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
15
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
16
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
17
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
18
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
19
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
20
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा

भुयारी गटार योजनेला राज्य सरकारची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 22:34 IST

अहमदनगर : अनेक वर्षांपासून रखडलेल्या संपूर्ण शहराच्या भुयारी गटार योजनेच्या प्रकल्प आराखड्याला अखेर राज्यस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. एकूण ३२० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात १३६ कोटी रुपयांची कामे मार्गी लागणार आहेत. पाणी पुरवठा विभागाने केलेले बिनचूक सादरीकरण आणि हरित लवादाच्या दट्ट्यामुळे राज्य शासनालाही तत्काळ प्रकल्पाला मंजुरी द्यावी लागली. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील कामांसाठी महापालिकेला निविदा प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : अनेक वर्षांपासून रखडलेल्या संपूर्ण शहराच्या भुयारी गटार योजनेच्या प्रकल्प आराखड्याला अखेर राज्यस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. एकूण ३२० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात १३६ कोटी रुपयांची कामे मार्गी लागणार आहेत. पाणी पुरवठा विभागाने केलेले बिनचूक सादरीकरण आणि हरित लवादाच्या दट्ट्यामुळे राज्य शासनालाही तत्काळ प्रकल्पाला मंजुरी द्यावी लागली. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील कामांसाठी महापालिकेला निविदा प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे.अमृत (अटल मिशन) योजनेंतर्गत मलनिस्सारण प्रकल्प व भुयारी गटार योजनेचा प्रकल्प विकास आराखडा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एका खासगी संस्थेमार्फत तयार करून तो राज्य शासनाला सादर केला होता. या आराखड्याचे गुरुवारी मंत्रालयात सादरीकरण झाले. नगरविकास खात्याच्या प्रधान सचिन मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य तांत्रिक मान्यता समितीची (स्टेट लेवल टेक्निकल कमिटी) बैठक झाली. या बैठकीला राज्यातील नऊ महापालिकांनी त्यांचे प्रकल्पाचे सादरीकरण केले. पहिला क्रमांक अहमदनगर महापालिकेचा होता. आयुक्त घनश्याम मंगळे, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता महादेव काकडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता अहिरे यांची या बैठकीला उपस्थिती होती. प्रकल्पाच्या सादरीकरणामध्ये डेमो दाखविण्यात आला. प्रकल्पाचा नकाशा, क्षेत्रनिहाय सादरीकरण करण्यात आले. समितीच्या प्रत्येक प्रश्नाला अभियंत्यांनी अचूक उत्तरे दिली. त्यामुळे समितीचे समाधान होऊन प्रकल्पाला मान्यता मिळाली. भुयारी गटार योजनेच्या संपूर्ण ३२० कोटीच्या आराखड्यालाच तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. सादरीकरणानंतर पहिल्या टप्प्यात १३६ कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली. राज्य समितीने मान्यता दिल्यानंतर हा आराखडा केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. तत्पूर्वी १३६ कोटीच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यास समितीने हिरवा कंदील दाखविला आहे.सीना नदी प्रदूषणाबाबत हरित लवादाकडे याचिका दाखल असून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. हरित लवादाने वारंवार दिलेल्या आदेशाने मलनिस्सारण प्रकल्पाबाबत महापालिकेला तयारी करावी लागली. नदी प्रदूषणमुक्त करण्याचे सरकारचे धोरण असल्याने समितीनेही नगरच्या प्रकल्पाला मान्यता दिली. ----------------------