शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचे सर्व्हर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 22:26 IST

सरकारच्या आॅनलाईन सेवेचा शहरी व ग्रामीण भागात बोजवारा उडाला आहे़ गेल्या दोन दिवसांपासून आपले सरकार पोर्टल डाऊन आहे़ त्यामुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी अडथळे येत असून, शेतीची कामे सोडून महाईसेवा केंद्रातच मुक्काम ठोकण्याची वेळ शेतक-यांवर ओढावली आहे़ 

ठळक मुद्देदोन दिवसांपासून सेवा ठप्प५० टक्के अर्जांचे संगणकीकरणशेतक-यांचा केंद्रात मुक्काम 

अहमदनगर: सरकारच्या आॅनलाईन सेवेचा शहरी व ग्रामीण भागात बोजवारा उडाला आहे़ गेल्या दोन दिवसांपासून आपले सरकार पोर्टल डाऊन आहे़ त्यामुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी अडथळे येत असून, शेतीची कामे सोडून महाईसेवा केंद्रातच मुक्काम ठोकण्याची वेळ शेतक-यांवर ओढावली आहे़ सरकारने छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे़ कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करण्यास अंतिम मुदत १५ सप्टेंबर आहे़ जिल्ह्यातून सुमारे ५ लाख अर्ज दाखल होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहेत़ त्यापैकी ५० ते ६० टक्के अर्ज  अत्तापर्यंत दाखल झाले आहेत़ अर्ज दाखल करण्यासाठी पंधरा दिवस उरले आहेत़ त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी बाहेर पडले आहेत़ कर्जमाफीचा, अधारकार्ड आणि बँक पास बुक घेवून शेतकरी आॅनलाईन माहिती भरण्यासाठी महाईसेवा केंद्राचा रस्ता धरतात़ परंतु, त्यांना सर्व्हर डाऊन आहे, उद्या या, असे सांगितले जाते़ गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच महाईसेवा केंद्रांतील सेवा ठप्प झाल्या आहेत़ शेतकºयांचा आधार क्रमांक आणि त्यांच्या बोटाचे ठसे, जुळत नाहीत़ त्यामुळे आपले सरकार पोर्टलवर ही माहिती अपलोड होणे तर दूरचे़ पण ते ओपन होत नसल्याचे कें्रद चालकांचे म्हणने आहे़कालावधी कमी राहिल्याने केंद्रांवरील गर्दी वाढू लागली आहे़ पण, शहरी व ग्रामीण भागात आपले सरकार पोर्टल सुरू होताना दिसत नाही़ ते कधी उपलब्ध होईल, याची खात्री कोण देणार, याबाबतही प्रशासकीय यंत्रणेकडून कोणतीही माहिती शेतक-यांना दिली जात नाही़  त्यामुळे शेतकरीही मेटाकुटीस आले आहेत़ दिवसभरात एकही अर्ज भरला जात नाही़ त्यामुळे नगर शहरातील केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत शेतक-यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात़  आपले सरकार पोर्टल ठप्प असल्याने महाईसेवा केंद्र चालकांनी अर्ज घेणे बंद केले आहे़ पोर्टल कधी सुरू होईल, याचाही नेम नाही़ त्यामुळे तेही अर्ज घेत नाहीत़ अर्ज घेवून पतीपत्नी दोघे सोबत या, असे त्यांच्याकडून सांगितले जाते़ केंद्रावर पोहोचल्यानंतर पुन्हा तेच उत्तर सर्व्हर डाऊन, अशी स्थिती शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून आहे़ ़