शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मंत्रालयात स्टेटससाठी येऊ नका; जनतेची कामे घेऊन या : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 06:37 IST

Devendra Fadnavis : भाजपची सदस्य नोंदणी ४३ लाख झाली आहे, २० जानेवारीपर्यंत ती दीड कोटींवर न्या, असे आवाहन फडणवीस यांनी केले. 

शिर्डी : मंत्रालयात जनतेच्या हिताची कामे घेऊन जरूर या, पण स्टेट्स सिम्बॉल म्हणून येऊ नका. आपली संस्कृती वेगळी आहे, अशा शब्दात कान टोचत  सरकार आणि पक्ष यांच्यात सेतू म्हणून काम करा आणि सरकारची कामे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे आयोजित भाजपच्या प्रदेश अधिवेशनात पक्षजनांना केले. 

आगामी शंभर दिवसांत करावयाच्या कामांकडे लक्ष्य दिले आहे. सरकारचा कारभार पारदर्शक आणि प्रामाणिक राहील. त्यासाठी आपल्याला भाजप पक्षसंघटनेची साथ लागेल. ‘श्रद्धा, सबुरी’चा अर्थ समजून घ्या. हा अर्थ ‘राष्ट्र प्रथम, अंत मे मै’ या भाजपच्या ब्रीदवाक्यातही आहे. ज्यांना तो समजला नाही, त्यांची अवस्था वाईट झाली, असा चिमटा फडणवीस यांनी काढला. भाजपची सदस्य नोंदणी ४३ लाख झाली आहे, २० जानेवारीपर्यंत ती दीड कोटींवर न्या, असे आवाहन फडणवीस यांनी केले. 

शिंदे, पवारांना घेऊनच वाटचाल एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन नेत्यांना सोबत घेऊनच महायुतीची वाटचाल सुरू राहील. रिपाइंसारख्या लहान पक्षांनाही सोबतच ठेवू, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.  

व्होट जिहाद २चे आव्हानमालेगावमधील बांगलादेशी घुसखोरांच्या प्रकरणाचा उल्लेख करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मालेगाव, अंजनगाव  यासारख्या ठिकाणी एकेका दिवसात ५०-६० जन्माचे दाखले दिले गेल्याचे समोर आले आहे. हे व्होट जिहाद पार्ट २ आहे आणि त्याचा बीमोड करावाच लागेल, एकाही घुसखोराला देशात ठेवता कामा नये. जात - पंथावरून दुफळी कशी माजेल, याचा प्रयत्न अराजकतावादी शक्ती करत आहेत. त्यांच्याविरूद्धची आमची लढाई सुरूच राहील. विधानसभा निवडणुकीत आमचे नेते नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’चा नारा दिला, साधूसंतांच्या आशीर्वादाने भगवी लाट निर्माण झाली, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाshirdiशिर्डी