पाचपुतेंचा बंदोबस्त करणार
By Admin | Updated: June 24, 2014 00:05 IST2014-06-23T23:43:38+5:302014-06-24T00:05:04+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंद्याचा आमदार कोण होईल हे मला माहित नाही. परंतू श्रीगोंद्याचे वाळवंट करणारे आ. बबनराव पाचपुते यांचा विधानसभा निवडणूकीत बंदोबस्त करणार आहे,
पाचपुतेंचा बंदोबस्त करणार
श्रीगोंदा : श्रीगोंद्याचा आमदार कोण होईल हे मला माहित नाही. परंतू श्रीगोंद्याचे वाळवंट करणारे आ. बबनराव पाचपुते यांचा विधानसभा निवडणूकीत बंदोबस्त करणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँगे्रसचे माजी जिल्हाध्यक्ष घन:श्याम शेलार यांनी दिला.
सोमवारी (दि़२३) श्रीगोंदा येथे कुकडी, घोडचे आवर्तन, वीज व साकळाई प्रश्नावर आयोजित धरणे आंदोलन प्रसंगी शेलारांनी तालुक्यातील विविध प्रश्नांवरुन पाचपुतेंवर टीका केली़ शेलार म्हणाले, २००९ ला पिंपळगाव जोगा धरणाच्या पाण्यासाठी मी राजीनामा दिला होता. आणि आता ‘कुकडी-घोड’च्या पाणी प्रश्नावरुन बाहेर पडलो आहे. मी २००९ च्या निवडणुकीत मदत केली नसती तर पाचपुते आमदार झाले नसते़ आणि आता हेच पाचपुते मला कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतून बाहेर काढले असते, असा दम भरीत आहेत़ वीज प्रश्न सोडण्यासाठी कोट्यवधी रुपये आल्याचे सांगितले जाते. मात्र शेतकऱ्यांना रोहित्र बसविण्यासाठी पैसे मोजावे लागतात. घोड नदीवरील बंधाऱ्याच्या फळ्या काढून आवर्तन सोडावे अन्यथा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार आहे़ तसेच पिंपळगाव जोगा व डिंबे धरणाातून पाणी सोडून कुकडीचे आवर्तन सोडावे़ अन्यथा ३० जूनला रास्तारोकोचा इशारा शेलारांनी दिला. यावेळी बाबासाहेब इथापे, हेमंत नलगे, रावसाहेब काकडे, अॅड. डी. डी. घोरपडे, संतोष रायकर यांची भाषणे झाली. (तालुका प्रतिनिधी)
राष्ट्रवादीच्या विरोधात लढावेच लागेल
राष्ट्रवादी पार्टीचे नेते अजित पवारांना शेतकऱ्यांचा कळवळा आहे़ परंतू सध्या त्यांचीही कोडी झाली आहे. ना. दिलीप वळसे, आ. वल्लभ बेनके हे राष्ट्रवादीचे नेते कुकडीचे पाणी अडवितात. त्याच्या विरोधात लढाई करावी लागेल. ऊस जळतोय म्हणून मी राजीनामा दिला. पाचपुतेंनी आमदारकीचा राजीनामा का दिला नाही? माझ्या राजीनाम्याची चुकीची चर्चा केल्यास रत्नागिरीच्या पालकमंत्रीपदावरुन का काढले याचा गौप्यस्फोट करण्याचा इशारा शेलारांनी दिला़
आमचा माणूस मिळाला
घन:शाम शेलार यांनी राष्ट्रवादी काँगे्रसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला म्हणून रावसाहेब काकडे यांनी धरणे आंदोलनाप्रसंगी पेढे वाटले.
कोळगावचे राजेंद्र नलगे म्हणाले, आमचा माणूस आम्हाला मिळाला आहे़
घोटवीचे सरपंच जालिंदर निंभोरे म्हणाले, तुम्ही आतापर्यंत शेतकऱ्यांची कामे केली. आता शेतकरी तुमच्यासाठी काय करणार आहेत?