कर्जमाफीचे भरलेले अर्ज मंगळवारपासून नेटवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 19:50 IST2017-09-11T19:46:13+5:302017-09-11T19:50:17+5:30

अहमदनगर : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना-२०१७ अंतर्गत शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकºयांनी आॅनलाइन भरलेले अर्ज मंगळवार १२ सप्टेंबरपासून शेतकºयांना इंटरनेटवर पाहावयास मिळणार आहे.

The debt waiver application is valid from Tuesday on the Net | कर्जमाफीचे भरलेले अर्ज मंगळवारपासून नेटवर

कर्जमाफीचे भरलेले अर्ज मंगळवारपासून नेटवर

ठळक मुद्देयादी उपलब्धशेतक-यांना माहितीची पडताळणी करता येणार

अहमदनगर : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना-२०१७ अंतर्गत शेतकरी कर्जमाफीसाठी शेतक-यांनी आॅनलाइन भरलेले अर्ज मंगळवार १२ सप्टेंबरपासून शेतकºयांना इंटरनेटवर पाहावयास मिळणार आहे.
‘आपले सरकार’ वेब पोर्टलवर हे अर्ज दिसणार आहेत. त्यातून शेतकºयांना आपले नाव आॅनलाइन यादीत आहे की नाही, यासोबतच आपण भरलेली माहिती अचूक आहे की नाही, याची देखील पडताळणी करता येणार आहे.
४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात आपले सरकार केंद्रातून ८६ हजार ३२९ शेतकºयांनी आॅनलाइन व १९५६ आॅफलाइन, नागरी सेवा केंद्रातून १ लाख ११ हजार ५०० आॅनलाइन, १५ हजार १५० आॅफलाइन, महा ई सेवा केंद्रातून १५ हजार ६८९ आॅनलाइन व ४ हजार ८९७ आॅफलाइन असे एकूण २ लाख १३ हजार ५१८ आॅनलाइन व २२ हजार ३ आॅफलाइन अर्ज कर्जमाफीसाठी भरले गेले आहेत. या केंद्रांसोबतच जिल्ह्यात १ हजार ९५ पॉस मशिन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 
१५ सप्टेंबरपर्यंत मुदत
जर या यादीत आपले नाव नसेल, तर अशा शेतक-यांना पुन्हा १५ सप्टेंबरपर्यंत आपला अर्ज आपले सरकार वेब पोर्टलवर तातडीणे भरणे आवश्यक आहे. कोणत्याही शेतक-यांना याबाबत काही अडचणी आल्यास त्यांनी तालुका स्तरावरील सहायक निबंधकांशी संपर्क साधावा.
-अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा उपनिबंधक, अहमदनगर.
४ लाख ८५ हजार जणांची नावनोंदणी
थकबाकीदार शेतक-यांना १० हजार रुपयांपर्यंत तातडीचे कर्ज वाटप करण्याच्या सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा सहकारी बँकेने १३ हजार ७७३ शेतकºयांना १३ कोटी १३ लाख ७९ हजार रुपये मंजूर केले आहेत. यापैकी ५ हजार २२६ शेतकºयांनी ५ कोटी १८ लाख रुपयांची रक्कम प्रत्यक्ष घेतली आहे. व्यापारी बँकांनी २५० शेतक-यांना २५ लाख मंजूर केले असून, ही कर्जाची रक्कम शेतक-यांनी पूर्णपणे घेतली आहे. या कर्जासाठी ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत देण्यात आलेली होती.
१० सप्टेंबरअखेर जिल्ह्यात ४ लाख ८५ हजार ४१६ शेतकºयांची नावनोंदणी झाली आहे. तर २ लाख ३३ हजार ८६३ अर्ज आॅनलाइन अपलोड झाले आहेत.
जिल्ह्यातील ५ लाख ६८ हजार ८६८ शेतकºयांना २६४०.०९ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. 

Web Title: The debt waiver application is valid from Tuesday on the Net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.