शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

गावोगोवी 'वणवा' प्रतिबंधक पथके निर्माण करा; पद्मश्री पोपटराव पवार यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 10:55 IST

गावोगावी 'वणवे प्रतिबंधक पथके' निर्माण करण्याची गरज असल्याचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले.

अहमदनगर - दरवर्षी मार्च, एप्रिल व मे महिन्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात वणवे लागतात. त्याला मुख्य कारण म्हणजे शेताची मशागत करताना शेतकरी बांध पेटवून देतात तसेच रस्त्याने जाणारे वाटसरु किंवा वाहनांच्या सायल्न्ससर मधून ठिणगी पडून मोठ्या प्रमाणात वणवे लागून नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान होते. हे रोखण्यासाठी गावोगावी 'वणवे प्रतिबंधक पथके' निर्माण करण्याची गरज असल्याचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले.

रविवारी नगर तालुक्यातील हिवरे बाजार शेजारील गावांतील शेतक-यांनी शेतातील बांध  पेटविल्याने गिरीमहाराज मंदिर परिसरातील जंगलाला आग लागली.वनक्षेत्रालाआग लागल्याचा संदेश ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून येताच हिवरे बाजार येथील ग्रामवन समिति हिवरे बाजार व वणवा प्रतिबंधक पथक हिवरे बाजार व ग्रामस्थ अवघ्या काही मिनिटातच वनक्षेत्रातील आगीच्या ठिकाणी हजर झाले व आग आटोक्यात आणली.सदर आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीत मोर,हरणे, ससे, रानडुकरे, लांडगे व इतर वन्यजीव  आपला जीव वाचवण्यासाठी धावत होते. मानवी भविष्यासाठी  वनांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी वणवे आटोक्यात आणण्यासाठी गावोगावी स्व्यंप्रेरनेने वणवा प्रतीबंधक पथके तयार करावीत. असे आवाहन यावेळी पवार यांनी केले.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागfireआगAhmednagarअहमदनगर