शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने हिरवले ३४ मुलांचे आई-बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST

आई अथवा वडिलांचा मृत्यू झालेले बालके हे नगर शहरासह श्रीगोंदा, पारनेर, राहता व पाथर्डी तालुक्यातील आहेत. कोरोना संसर्गामुळे ज्या ...

आई अथवा वडिलांचा मृत्यू झालेले बालके हे नगर शहरासह श्रीगोंदा, पारनेर, राहता व पाथर्डी तालुक्यातील आहेत. कोरोना संसर्गामुळे ज्या बालकांनी आपले पालक गमावले आहेत त्यांना संरक्षण मिळावे तसेच ही बालके शोषणास बळी पडू नयेत, तस्करीत ओढले जाऊ नयेत यासाठी शासन आदेशाप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निराधार बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी १७ मे रोजी टास्क फोर्स गठित करण्यात आली आहे. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख हे टास्क फोर्सचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. गेल्या दहा दिवसात टास्क फोर्सकडे ० ते १८ वयोगटातील ३४ बालकांची माहिती प्राप्त झाली आहे. यामध्ये पूर्णतः निराधार झालेल्या बालकांचे महिला व बालकल्याण समिती अंतर्गत असलेल्या बालगृहात संगोपन केले जाणार आहे. तसेच ज्या बालकांचा कमावता पालक आई किंवा वडील यांचा मृत्यू झाला आहे त्यांना बालसंगोपन योजनेअंतर्गत आर्थिक साहाय्य केले जाणार आहे.

........

निराधार बालकांची माहिती

पाठविण्याचे आवाहन

कोरोनामुळे ज्या बालकांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे अथवा ज्या बालकांची काळजी घेण्यास कोणीही नाही अशा बालकांच्या संदर्भात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख यांच्या ९९२१११२९११ व बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख यांच्या ९०११०२०१७७ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

..........

‘त्या’ बालकांनाही मिळणार निवारा

ज्या बालकांचे आई-वडील कोरोना संसर्गामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत व त्यांच्या बालकांना सांभाळण्यास कोणी नाही, अशा बालकांनाही महिला व बालकल्याण विभागामार्फत निवारा दिला जाणार आहे.

........

जुळ्या मुलांची बालगृहात व्यवस्था

नगर शहर परिसरातील जुळ्या मुलांच्या मातेचे कोरोनामुळे निधन झाले. त्या मुलांचे संगोपन करणे वडिलांनाही शक्य नसल्याने या मुलांची टास्क फोर्समार्फत ढवळपुरी येथील बालगृहात व्यवस्था करण्यात आली आहे.

............

कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या बालकांच्या संगोपनाची जबाबदारी महिला व बाल विकास विभागामार्फत घेतली जात आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे. अशा निराधार बालकांबाबत जनतेने माहिती कळवावी. अशा बालकांना गरजेप्रमाणे तत्काळ निवारा व बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे.

-वैभव देशमुख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी

..........

डमी आहे