शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

सहकार घोटाळा दबणार नाही, कारवाई होणारच, सरकार बदलले तरीही फरक नाही - प्रकाश आंबेडकर

By शिवाजी पवार | Updated: August 10, 2023 13:12 IST

  आंबेडकर म्हणाले, केंद्र सरकारने नामार्डच्या माध्यमातून पैसे दिले होते. त्यामुळे केंद्राने ४८ हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी पूर्ण केली आहे. केवळ सहकार विभागाने ही बाब मान्य केलेली नाही. मात्र उद्या केंद्रात कोणतेही सरकार आले तरीही कायद्याने कारवाई थांबणार नाही.

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : सहकारातील ४८ हजार कोटी रुपयांचा घोटाळ्यात नाबार्डची चौकशी पूर्ण झाली आहे. केंद्रात कोणतेही सरकार आले तरीही सरकारमध्ये सामील झालेल्या राज्यातील नेत्यांवरील कारवाई अटळ आहे, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला. तुर्तास अटकेपासून बचाव करण्यासाठी हे नेते भाजपबरोबर गेले असून त्यात नगर जिल्ह्यातील नेत्यांचाही समावेश असल्याचे ते म्हणाले. येथील शासकीय विश्रामगृहावर बुधवारी संध्याकाळी उशिरा आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. देशात लवकरच लोकसभेची निवडणूक जाहीर होईल, असे भाकित त्यांनी यावेळी केले.आंबेडकर म्हणाले, केंद्र सरकारने नामार्डच्या माध्यमातून पैसे दिले होते. त्यामुळे केंद्राने ४८ हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी पूर्ण केली आहे. केवळ सहकार विभागाने ही बाब मान्य केलेली नाही. मात्र उद्या केंद्रात कोणतेही सरकार आले तरीही कायद्याने कारवाई थांबणार नाही.राज्यात शिवसेनेच्या बळावरच भाजपला ग्रामीण मतदारांवर प्रभाव टाकता येत होता. त्यामुळे दोन्ही पक्ष निवडणुकांमध्ये विजयी झाले. आता मात्र भाजपकडे कोणतेही प्रभावशाली नेतृत्व राहिलेले नसून हा पक्ष येत्या विधानसभेला सपाटून मार खाणार आहे, असा दावा आंबेडकर यांनी केला.अजित पवार ५ टक्केही नाहीतज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तुलनेत अजित पवार यांची क्षमता पाच टक्के सुद्धा नाही. शरद पवार यांनी सन्मानाने राजकारणातून निवृत्त व्हायला हवे, असे मानणारा मोठा वर्ग आहे. तो अजित पवार यांना कधीही स्वीकारणार नाही, असे आंबेडकर म्हणाले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaharashtraमहाराष्ट्रVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी