नगरकरांना दिलासा : आणखी २० जणांनी केली कोरोनावर मात; बरे झालेल्या रुग्णांची संख्या १६१ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 11:38 IST2020-06-10T11:37:21+5:302020-06-10T11:38:15+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील आणखी २० रुग्णानी कोरोनावर मात केली. यशस्वी उपचार घेऊन बुधवारी (दि.१० जून) घरी परतले. या व्यक्तींना वैद्यकीय तपासणीनंतर बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

नगरकरांना दिलासा : आणखी २० जणांनी केली कोरोनावर मात; बरे झालेल्या रुग्णांची संख्या १६१ वर
अहमदनगर : जिल्ह्यातील आणखी २० रुग्णानी कोरोनावर मात केली. यशस्वी उपचार घेऊन बुधवारी (दि.१० जून) घरी परतले. या व्यक्तींना वैद्यकीय तपासणीनंतर बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.
यामध्ये अकोले ७, नगर महापालिका क्षेत्रातील ७, संगमनेर ४, राहाता १ आणि श्रीगोंदा येथील १ अशा २० व्यक्तींचा समावेश आहे. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १६१ झाली आहे.
सध्या कोरोनाबाधित व्यक्तिंची संख्या २२६ असून सध्या उपचार घेण्या-यांची संख्या आता पन्नासवर आली आहे.
नगर शहरातील कोरोनाची साखळी तुटल्याने शहराला मोठा दिलासा मिळाला आहे.