शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

चिलापीने गिळले इतर प्रजातींचे मासे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:26 IST

श्रीरामपूर : जिल्ह्यातील गोदावरी, प्रवरा, मुळा, सीना, ढोरा या नद्यांमध्ये आता केवळ चिलापी याच प्रजातीचा मासा व तोही मोठ्या ...

श्रीरामपूर : जिल्ह्यातील गोदावरी, प्रवरा, मुळा, सीना, ढोरा या नद्यांमध्ये आता केवळ चिलापी याच प्रजातीचा मासा व तोही मोठ्या संख्येने मिळून येत आहे. प्रदूषित पाण्यातही चिलापी तग धरून राहतो व गुणाकारात वाढतो. इतर माशांना मात्र तो जगू देत नाही. त्यामुळे खवय्यांना खुणावणारे गावरान वाम, कटला, रावस, मरळ, खवली हे मासे जलाशयांतून हद्दपार झाले आहेत.

या वर्षी उशिराने का होईना सर्वदूर पाऊस झाला आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मासेमारीला चांगले दिवस आले आहेत. जिल्ह्यातून दररोज ३० टन माशांची विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्याबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, मालेगाव तसेच भिवंडी, दादर येथून माशांना मागणी आहे.

मिळून येणाऱ्या माशांमध्ये चिलापीचा समावेश आहे. इतर सर्वच मासे आता नामशेष झाल्यात जमा आहेत. जाळे टाकले की त्यात केवळ चिलापी अडकणार हे ठरलेले. इतर प्रजातीचे केवळ चार-दोन मासेच मिळून येतात. ३० टनांमध्ये अवघे ५ ते १० टक्के इतर मासे आढळून येत आहेत. पूर्वी चिलापी हा केवळ उजनी धरणापुरताच मर्यादित होता. इंदापूर, भिगवण हे चिलापीचे मुख्य बाजारकेंद्र. आता मात्र त्याने जिल्ह्यातील सीना ते गोदावरी या सर्वच नद्यांचा ताबा घेतला आहे. डुक्करमासा या नावानेच त्याची वेगळी ओळख आहे. खाऱ्या, गोड्या किंवा अतिशय प्रदूषित पाण्यातही तो टिकून राहतो. त्यामुळेच डुक्करमासा हे नाव त्याला चिकटले.

एखाद्या नदीत अथवा जलाशयांत तो घुसला की तेथे स्वत:चे प्रस्थ वाढवितो. पाण्यातील शेवाळ तर खातोच, मात्र वेळप्रसंगी इतर माशांची अंडीही फस्त करतो. चिलापीची उत्पादनक्षमता अफाट आहे. त्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळे इतर माशांवर मात्र संक्रांत आली आहे. ते नामशेष होण्याची भीती व्यापारी व्यक्त करत आहेत.

--------

गरिबांचा मेवा

चिलापीला गरिबांचा मेवा म्हटले जाते. कारण अवघ्या ४० ते ५० रुपये किलो दरामध्ये तो उपलब्ध होतो. ६०० ते ८०० रुपये किलोच्या सुरमई व पापलेटपेक्षा चिलापीवरच ताव मारलेला बरा, असे खवय्ये म्हणतात. अगदी मुंबईतील गरीब व मध्यमवर्गीय घटकांना तो परडवतो.

------------

मासेमारीत अनेकांना रोजगार

चिलापीचे पीक जोमाने बहरले आहे. त्यामुळे नद्या व जलाशयांमध्ये हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. चारशे रुपयांचे दहा किलो मासे हातोहात ८०० रुपयांना व्यापाऱ्यांना विकून मोकळे होता येते व रोजंदारी सुटते.

---------

चिलापीचे आक्रमण थोपविणे गरजेचे आहे. स्थानिक माशांच्या जाती जतन कराव्या लागतील. त्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात. अन्यथा फार उशीर होईल.

-इम्रान शेख, मासे व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते.

श्रीरामपूूर.

----